नवी दिल्ली : देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीनंतर पश्चिम बंगालमध्ये शनिवार नऊ मे रोजी भाजपने सरकार स्थापन केले आहे. शुभेंदू अधिकारी यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. तर आज म्हणजेच रविवार १० मे रोजी तामिळनाडूत टीव्हीके पक्षाचे सर्वोच्च नेते थलपती विजय उर्फ चंद्रशेखरन जोसेफ विजय यांनी पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. आता मंगळवार १२ मे रोजी आसाम आणि १३ मे रोजी पुदुच्चेरीत शपथविधी होणार आहे.
आसाम : आसामच्या राजकारणात पुन्हा एकदा हिमंता बिस्वा सरमा (Himanta Biswa Sarma) यांचे वर्चस्व कायम राहिले असून, त्यांची भाजप विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी एकमताने ...
आसाममध्ये भाजपने हॅटट्रिक केली आहे. भाजपच्या नेतृत्वात पहिल्यांदा आसाममध्ये सत्ता स्थापन झाली त्यावेळी सर्बानंद सोनोवाल यांनी सरकारचे नेतृत्व केले. यानंतर भाजपच्या दुसर्या कार्यकाळात (टर्म) हिमंता बिस्वा सरमा यांनी सरकारचे नेतृत्व केले. आता सलग दुसऱ्यांदा ते आसामचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. सरमा सरकारचा शपथविधी मंगळवार १२ मे रोजी होणार आहे.
तमिळगा वेत्री कळघम (TVK) चे अध्यक्ष विजय थलपती यांनी आज म्हणजेच रविवार १० मे रोजी तामिळनाडूचे नवीन मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. थलपतीच्या पक्षाने ...
पुदुच्चेरीत एनडीएचीच सत्ता सलग दुसऱ्यांदा आली आहे. एन. रंगास्वामी यांच्या नेतृत्वात भाजपची युती पुन्हा सत्तेत आली आहे. रंगास्वामी १३ मे रोजी सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी म्हटले की, काँग्रेस फक्त खोटेपणा आणि विश्वासघाताचे राजकारण करते. काँग्रेसच्या सत्तेच्या पुस्तकात ...
केरळमध्ये मुख्यमंत्री कोण होणार यावरून पेच निर्माण झाला आहे. काँग्रेस पक्ष हा गंभीर प्रश्न सोडवण्यात गुंतला आहे. यामुळे विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन आठवडा उलटला तरी केरळमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी ठोस हालचाल झालेली नाही. मागील पाच वर्षांपासून विरोधी पक्षनेते म्हणून यूडीएफचे नेतृत्व करणाऱ्या व्ही. डी. सतीशन यांच्याकडे काही आमदारांचा पाठिंबा आहे. के. सी. वेणुगोपाल हे एआयसीसी सरचिटणीस आणि राहुल गांधींचे निकटवर्तीय आहेत, त्यांनाही काही आमदारांचा पाठिंबा आहे. तर रमेश चेन्निथला हे माजी विरोधी पक्षनेते आणि अनुभवी नेते म्हणून ओळखले जातात आणि त्यांच्या नावालाही निवडक आमदारांचा पाठिंबा आहे. यामुळे केरळमध्ये व्ही. डी. सतीशन, के. सी. वेणुगोपाल आणि रमेश चेन्निथला यांच्यापैकी कोण मुख्यमंत्री होणार यावरून चर्चेला उधाण आहे.
- 'कॉर्पोरेट जिहाद' प्रकरणातील आरोपी निदा खानच्या समर्थनावरून ‘एमआयएम’वर टीका मुंबई : नाशिकमधील टीसीएस कंपनीत घडलेल्या 'कॉर्पोरेट जिहाद' प्रकरणातील ...
विधानसभा निवडणूक निकाल २०२६
पुदुच्चेरी - एकूण जागा ३०
एआयएनआरसी १२
द्रमुक ५
भाजप ४
टीव्हीके २
काँग्रेस १
एलजेके १
अण्णाद्रमुक १
एनवायएमके १
अपक्ष ३
आसाम - एकूण जागा १२६
भाजप ८२
काँग्रेस १९
बीओपीएफ १०
एजीपी १०
एआययूडीएफ २
आरजेआरडी २
तृणमूल काँग्रेस १
केरळ - एकूण जागा १४०
काँग्रेस ६३
सीपीआय एम २६
आययूएमएल २२
सीपीआय ८
केईसी ७
आरएसपी ३
भाजप ३
आरजेडी १
आरएमपीओआय १
केरळ काँग्रेस जेकब १
कम्युनिस्ट मार्क्सवादी पक्ष केरळ राज्य समिती १
अपक्ष १
तामिळनाडू - एकूण जागा २३४
टीव्हीके १०८
द्रमुक ५९
अण्णाद्रमुक ४७
काँग्रेस ५
पीएमके ४
आययूएमएल २
सीपीआय २
व्हीसीके २
सीपीआय(एम) २
भाजप १
डीएमडीके १
अम्मा मक्कल मुनेत्र कझागम १
पश्चिम बंगाल - एकूण जागा २९४ पैकी २९३ जागांचे निकाल जाहीर
भाजप २०७
तृणमूल काँग्रेस ८०
काँग्रेस २
आम जनता उन्नयन पार्टी २
सीपीआय(एम) १
एआयएसएफ १