Oath Ceremony : हिमंता सरमा आसामचे, रंगास्वामी पुदुच्चेरीचे सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्री होणार, शपथविधीच्या तारखा जाहीर

नवी दिल्ली : देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीनंतर पश्चिम बंगालमध्ये शनिवार नऊ मे रोजी भाजपने सरकार स्थापन केले आहे. शुभेंदू अधिकारी यांनी मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेतली आहे. तर आज म्हणजेच रविवार १० मे रोजी तामिळनाडूत टीव्हीके पक्षाचे सर्वोच्च नेते थलपती विजय उर्फ चंद्रशेखरन जोसेफ विजय यांनी पहिल्यांदाच मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेतली. आता मंगळवार १२ मे रोजी आसाम आणि १३ मे रोजी पुदुच्चेरीत शपथविधी होणार आहे.



आसाममध्ये भाजपने हॅटट्रिक केली आहे. भाजपच्या नेतृत्वात पहिल्यांदा आसाममध्ये सत्ता स्थापन झाली त्यावेळी सर्बानंद सोनोवाल यांनी सरकारचे नेतृत्व केले. यानंतर भाजपच्या दुसर्‍या कार्यकाळात (टर्म) हिमंता बिस्वा सरमा यांनी सरकारचे नेतृत्व केले. आता सलग दुसऱ्यांदा ते आसामचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. सरमा सरकारचा शपथविधी मंगळवार १२ मे रोजी होणार आहे.



पुदुच्चेरीत एनडीएचीच सत्ता सलग दुसऱ्यांदा आली आहे. एन. रंगास्वामी यांच्या नेतृत्वात भाजपची युती पुन्हा सत्तेत आली आहे. रंगास्वामी १३ मे रोजी सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेणार आहेत.



केरळमध्ये मुख्यमंत्री कोण होणार यावरून पेच निर्माण झाला आहे. काँग्रेस पक्ष हा गंभीर प्रश्न सोडवण्यात गुंतला आहे. यामुळे विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन आठवडा उलटला तरी केरळमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी ठोस हालचाल झालेली नाही. मागील पाच वर्षांपासून विरोधी पक्षनेते म्हणून यूडीएफचे नेतृत्व करणाऱ्या व्ही. डी. सतीशन यांच्याकडे काही आमदारांचा पाठिंबा आहे. के. सी. वेणुगोपाल हे एआयसीसी सरचिटणीस आणि राहुल गांधींचे निकटवर्तीय आहेत, त्यांनाही काही आमदारांचा पाठिंबा आहे. तर रमेश चेन्निथला हे माजी विरोधी पक्षनेते आणि अनुभवी नेते म्हणून ओळखले जातात आणि त्यांच्या नावालाही निवडक आमदारांचा पाठिंबा आहे. यामुळे केरळमध्ये व्ही. डी. सतीशन, के. सी. वेणुगोपाल आणि रमेश चेन्निथला यांच्यापैकी कोण मुख्यमंत्री होणार यावरून चर्चेला उधाण आहे.



विधानसभा निवडणूक निकाल २०२६


पुदुच्चेरी - एकूण जागा ३०


एआयएनआरसी १२


द्रमुक ५


भाजप ४


टीव्हीके २


काँग्रेस १


एलजेके १


अण्णाद्रमुक १


एनवायएमके १


अपक्ष ३


आसाम - एकूण जागा १२६


भाजप ८२


काँग्रेस १९


बीओपीएफ १०


एजीपी १०


एआययूडीएफ २


आरजेआरडी २


तृणमूल काँग्रेस १


केरळ - एकूण जागा १४०


काँग्रेस ६३


सीपीआय एम २६


आययूएमएल २२


सीपीआय ८


केईसी ७


आरएसपी ३


भाजप ३


आरजेडी १


आरएमपीओआय १


केरळ काँग्रेस जेकब १


कम्युनिस्ट मार्क्सवादी पक्ष केरळ राज्य समिती १


अपक्ष १


तामिळनाडू - एकूण जागा २३४


टीव्हीके १०८


द्रमुक ५९


अण्णाद्रमुक ४७


काँग्रेस ५


पीएमके ४


आययूएमएल २


सीपीआय २


व्हीसीके २


सीपीआय(एम) २


भाजप १


डीएमडीके १


अम्मा मक्कल मुनेत्र कझागम १


पश्चिम बंगाल - एकूण जागा २९४ पैकी २९३ जागांचे निकाल जाहीर


भाजप २०७


तृणमूल काँग्रेस ८०


काँग्रेस २


आम जनता उन्नयन पार्टी २


सीपीआय(एम) १


एआयएसएफ १

Comments
Add Comment

Mumbai Crime : मुंबई लोकल बनतेय धर्मांतर, भोंदूगिरीचा अड्डा!

मुंबई : लाखो चाकरमान्यांची 'जीवनवाहिनी' असलेली मुंबईची उपनगरीय रेल्वे सध्या अत्यंत गंभीर आणि समाजविघातक

NEET : रविवारी नीट-यूजी फेरपरीक्षा, पेपरफुटी रोखण्यासाठी अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था

पुणे  : राष्ट्रीय परीक्षा प्राधिकरणाच्या (एनटीए) वतीने वैद्यकीय पदवी प्रवेशासाठीची नीट-यूजी फेरपरीक्षा रविवारी

Yoga Day : आंतरराष्ट्रीय योग दिनासाठी देश सज्ज, २३ राज्यांतील १०० वारसा स्थळांवर सामूहिक योगाभ्यास

नवी दिल्ली : देशभरात रविवारी, २१ जून रोजी १२ व्या आंतरराष्ट्रीय योग दिन २०२६ ची जय्यत तयारी सुरू असताना, आयुष

Amit Shah Speech : महाराष्ट्रातील सहकार क्षेत्राला 3,000 कोटींची मोठी चालना

कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्रातील सहकार आणि साखर उद्योगाला नवे बळ देणारी महत्त्वपूर्ण घोषणा करत केंद्रीय गृह व

Election in Maharashtra : राज्यातील नगरपरिषदा/नगरपंचायतींमधील ३८ रिक्त जागांसाठी झाले मतदान, मतमोजणी रविवारी

मुंबई : राज्यातील १४ जिल्ह्यांतील ८ नगरपरिषदा व १४ नगरपंचायतींमधील एकूण ४७ रिक्त पदांसाठी निवडणूक कार्यक्रम

काँगोमध्ये इबोलाचा कहर: ८९६ बाधित, २३२ जणांचा मृत्यू

युगांडाला यूएनकडून ४ दशलक्ष डॉलर्सची मदत किंशासा : डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो (डीआरसी)मध्ये इबोला विषाणूचा