Himanta Biswa Sarma : हिमंता बिस्वा सरमा पुन्हा होणार आसामचे मुख्यमंत्री, सलग दुसऱ्यांदा विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड

आसाम : आसामच्या राजकारणात पुन्हा एकदा हिमंता बिस्वा सरमा (Himanta Biswa Sarma) यांचे वर्चस्व कायम राहिले असून, त्यांची भाजप विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी एकमताने निवड करण्यात आली आहे. यामुळे हिमंता बिस्वा सरमा सलग दुसऱ्यांदा आसामचे मुख्यमंत्री बनणार आहेत. १२ मे रोजी गुवाहाटी येथे होणाऱ्या भव्य शपथविधी सोहळ्यात ते मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.


गुवाहाटी येथे भाजप आणि एनडीए आमदारांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीसाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा (J. P. Nadda) हे केंद्रीय निरीक्षक म्हणून उपस्थित होते. बैठकीनंतर नड्डा यांनी हिमंता बिस्वा सरमा यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली.



जेपी नड्डा यांनी सांगितले की, विधानसभा पक्षनेतेपदासाठी एकूण आठ प्रस्ताव सादर करण्यात आले होते. रणजित कुमार दास, विश्वजित, अजंता निओ, रामेश्वर तेली, राजदीप राय, अशोक सिंघल, पियुष हजारिका आणि चक्रधर गोगोई यांनी हिमंता बिस्वा सरमा यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. विशेष म्हणजे या सर्व प्रस्तावांना भाजप तसेच मित्रपक्षांच्या आमदारांनी एकमताने पाठिंबा दिला.


एनडीएतील मित्रपक्षांचे नेते आणि आमदार देखील बैठकीला उपस्थित होते. आसाम गण परिषदचे नेते अतुल बोरा (Atul Bora) यांनीही हिमंता यांच्या नावाला समर्थन दिले. त्यामुळे कोणतीही मतभिन्नता न होता हिमंता बिस्वा सरमा यांची एकमताने विधिमंडळ पक्षनेते म्हणून निवड निश्चित झाली.


या निवडणुकीत हिमंता बिस्वा सरमा यांनी संपूर्ण प्रचार मोहिमेचे नेतृत्व केले होते. त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपने आसाममध्ये दमदार कामगिरी करत १२६ सदस्यीय विधानसभेत एकट्याने ८२ जागा जिंकल्या. तर भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडीने तब्बल १०२ जागांवर विजय मिळवत प्रचंड बहुमत मिळवले.



राजकीय विश्लेषकांच्या मते, हिमंता बिस्वा सरमा यांच्या नेतृत्वाखालील सरकारने गेल्या कार्यकाळात कायदा-सुव्यवस्था, पायाभूत सुविधा, गुंतवणूक आणि ईशान्य भारतातील विकासाच्या मुद्द्यांवर भर दिला. याच कामगिरीच्या जोरावर भाजपला पुन्हा जनतेचा कौल मिळाल्याचे मानले जात आहे.





शपथविधी सोहळ्यासाठी भाजपचे अनेक केंद्रीय नेते, एनडीएतील मित्रपक्षांचे प्रमुख तसेच विविध राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहण्याची शक्यता आहे. गुवाहाटीमध्ये या सोहळ्याची जोरदार तयारी सुरू झाली असून, भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.


सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी मिळाल्यानंतर हिमंता बिस्वा सरमा यांच्यासमोर रोजगार, पूरस्थिती, उद्योगवाढ आणि सीमावाद यांसारख्या महत्त्वाच्या प्रश्नांवर काम करण्याचे मोठे आव्हान असणार आहे.



आसाममधील भाजपचे मुख्यमंत्री


सर्बानंद सोनोवाल - २४ मे २०१६ ते १० मे २०२१ - ४ वर्षे, ३५१ दिवस
हिमंता बिस्वा सरमा - १० मे २०२१ पासून... - ५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण
हिमंता बिस्वा सरमा - १२ मे २०२६ रोजी सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेणार
Comments
Add Comment

IPL 2026 Final : विराटची दमदार खेळी, RCB सलग दुसऱ्यांदा चॅम्पियन; गुजरातचा 5 विकेट्सने पराभव

Ahemdabad : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (RCB) आयपीएल 2026 च्या अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सचा 5 विकेट्सने पराभव करत सलग दुसऱ्या

BJP MLC Candidates : विधानपरिषदेसाठी भाजपची यादी जाहीर

मुंबई : विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघा एक दिवस

म्यानमारमध्ये इमारतीत स्फोट, ४५ ठार

म्यानमार : म्यानमारमधील नामखाम टाऊनशिपमधील काउंटुप येथे एका इमारतीत दुपारी स्फोट झाला. या स्फोटात ४५ जणांचा

Suman Kalyanpur : भावगीतांची सम्राज्ञी ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांचे निधन

मुंबई : मधुर आणि सुश्राव्य आवाजाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांनी

IPL Final 2026 : गुजरात 155 धावांत गारद; RCB समोर 156 धावांचे लक्ष्य

Ahemdabad : आयपीएल 2026 च्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या गोलंदाजांनी भेदक मारा करत गुजरात टायटन्सला 20

Energy from Coal : भारत कोळशापासून ऊर्जेची निर्मिती करणार

नवी दिल्ली : भारत देशाच्या ऊर्जा सुरक्षेला बळकटी देण्यासाठी आणि आयात इंधनावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी