Food Adulteration : फळे आणि भाज्यांमध्ये घातक रसायनांचा वापर करणारे रडारवर

- दोषींचे परवाने रद्द होणार; पणन मंत्री जयकुमार रावल यांचा इशारा


मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या दर्जेदार फळे आणि भाजीपाल्यामध्ये घातक रसायनांची भेसळ करून ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांविरोधात राज्य सरकारने कठोर पावले उचलली आहेत. फळांची गोडी वाढवण्यासाठी किंवा ती आकर्षक दिसण्यासाठी रसायनांचा वापर करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असून, दोषींचे परवानेही रद्द केले जातील, असा इशारा पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिला आहे.



अनेक ठिकाणी फळे कृत्रिमरीत्या पिकवण्यासाठी किंवा भाजीपाल्याला गडद रंग देण्यासाठी घातक रसायनांचा वापर केला जात असल्याच्या तक्रारी शासनाकडे प्राप्त झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर, पणन संचालनालयाने राज्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्या, खासगी बाजार समित्या आणि थेट पणन परवानाधारकांसाठी महत्त्वपूर्ण परिपत्रक जारी केले आहे. बाजार समित्यांनी नियमित तपासणी करावी आणि अन्नामध्ये भेसळ आढळल्यास ‘अन्न व औषध प्रशासन’ विभागाशी समन्वय साधून अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ अंतर्गत गुन्हे दाखल करावेत, असे निर्देश देण्यात आले आहेत.



शेतमालाच्या साठवणुकीत वापरल्या जाणाऱ्या पर्यावरणास घातक वस्तूंवरही शासनाने लक्ष केंद्रित केले आहे. भाजीपाला व फळांच्या वाहतुकीसाठी कमी जाडीच्या प्लास्टिक आणि थर्माकोलच्या वापरावर प्रतिबंध घालण्यात आला असून, त्याऐवजी पर्यावरणपूरक साहित्याला प्रोत्साहन देण्याचे आदेश पणन मंत्र्यांनी दिले आहेत.



विनापरवाना व्यवहारांवर चाप :


शेतमाल खरेदी-विक्रीच्या व्यवहारात पारदर्शकता आणण्यासाठी परवाना सक्ती अधिक कडक करण्यात आली आहे. काही व्यापारी, संस्था आणि शेतकरी उत्पादक कंपन्या कोणत्याही कायदेशीर परवान्याशिवाय शेतमाल खरेदी-विक्री करत असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा विनापरवाना व्यवहारांमुळे शेतकऱ्यांच्या हिताला बाधा पोहोचू शकते, त्यामुळे लायसनशिवाय व्यापार करणाऱ्यांवर आता कायदेशीर कारवाई केली जाईल," असे रावल यांनी स्पष्ट केले.




Comments
Add Comment

Women Empowerment : महिला सक्षमीकरणासाठी महसूल विभागाचा पुढाकार

शासकीय पडीक जमिनी आता भाडेपट्ट्याने महिला बचत गटांना 'राजमाता जिजाऊ महिला सक्षमीकरण योजना' सुरू चारा आणि बांबू

Return of the Monsoon: सुस्तावलेला पाऊस पुन्हा सक्रीय, महाराष्ट्रासह मध्य भारतात पावसाचा जोर वाढणार

Monsoon Update: गेल्या दोन आठवड्यांपासून देशातील विविध राज्यांमध्ये मान्सूनची प्रगती मंदावली होती, ज्यामुळे पावसाची तूट

Parabharani : मंदिराचे सभामंडप कोसळले आणि होत्याचे नव्हते झाले... धक्कादायक घटनेचे इत्यंभूत वृत्त

परभरणी : मानवत तालुक्यातील यशवाडी परिसरात हनुमान मंदिर उभारण्याचे काम सुरू आहे. या मंदिराच्या सभामंडपाचे छत

Agriculture Minister Dattatray Bharne : राज्यातील ९० लाखांहून अधिक शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर मोठा दिलासा मिळणार

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या २३ व्या हप्त्याचे वितरणः कृषी मंत्री दत्तात्रय भरणे राज्यातील ९०.८५

Ahilyanagar : धरणांतील पाणी ३० सप्टेंबरपर्यंत पिण्यासाठी राखीव; बेकायदा पाणीउपसा तात्काळ बंद करण्याचे आदेश

Ahilyanagar :  एल-निनोच्या संभाव्य परिणामांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पाणीटंचाईची स्थिती लक्षात घेऊन धरणांतील

Ahilyanagar : वारीच्या नियोजनासाठी दिंड्यांची माहिती २५ जूनपर्यंत द्या; पाणी बचतीचे मंत्री विखे पाटील यांचे आवाहन

Ahilyanagar : आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर दिंड्या आणि वारकऱ्यांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येक