Thalapathy Vijay : तामिळनाडूचा मुख्यमंत्री म्हणून थलपती विजय रविवारी सकाळी शपथ घेणार

चेन्नई : तामिळनाडूचा मुख्यमंत्री म्हणून थलपती विजय उर्फ चंद्रशेखरन जोसेफ विजय रविवारी सकाळी दहा वाजता शपथ घेणार आहे. राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी थलपती विजयला सत्ता स्थापनेची संधी दिली आहे. राज्यपालांनी विजयला बुधवार १३ मे २०२६ पर्यंत विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश दिले आहेत.



याआधी संध्याकाळी थलपती विजयने राज्यपालांना भेटून १२१ आमदारांच्या पाठिंब्याच्या जोरावर सत्ता स्थापनेचा दावा केला. सत्तेसाठी थलपती विजयच्या टीव्हीके या पक्षाने एकूण पाच पक्षांचा पाठिंबा मिळवला आहे. यामुळे सत्ताधारी आमदारांची संख्या १२१ च्या घरात पोहोचली आहे. टीव्हीकेला काँग्रेस, सीपीआय, सीपीआय(एम), व्हीसीके आणि आययूएमएल यांनी पाठिंबा जाहीर केला आहे. टीव्हीकेचे १०८ आमदार निवडून आले आहेत. पण विजय दोन मतदारसंघात विजयी झाला आहे. यामुळे पुढील काही दिवसांत तो एका मतदारसंघातील आमदारकीचा राजीनामा देईल आणि तिथे पोटनिवडणूक होईल. अद्याप हा राजीनामा आलेला नसल्यामुळे कागदोपत्री टीव्हीकेचे १०८, काँग्रेसचे ५ तर सीपीआय, सीपीआय(एम), व्हीसीके आणि आययूएमएल यांचे प्रत्येकी दोन असे एकूण १२१ आमदार आहेत. यामुळे २३४ आमदारांच्या तामिळनाडू विधानसभेत विजयकडे बहुमत असल्याचे दिसत आहे.



तामिळनाडूत सत्तास्थापनेसाठी २३४ आमदारांच्या विधानसभेत ११८ आमदारांचा पाठिंबा आवश्यक आहे. विजयकडे यापेक्षा जास्त आमदार आहेत. विजयने दोन पैकी एका मतदारसंघातील आमदारकीचा राजीनामा दिला तर पोटनिवडणुकीचा निकाल येऊन नव्या आमदाराने शपथ घेईपर्यंत सभागृहाची सदस्य संख्या २३३ असेल आणि बहुमताचा जादुई आकडा (मॅजिक फिगर) ११७ असेल.



विजयने पहिल्यांदा राज्यपालांची भेट घेतली त्यावेळी राज्यातील सर्वात मोठा पक्ष म्हणून सत्ता स्थापनेची संधी मिळावी अशा स्वरुपाचे पत्र दिले नव्हते. त्याने स्वतःच्या १०८ आमदारांसह काँग्रेसच्या ५ आमदारांचा पाठिंबा असल्याचे ११२ जणांच्या पाठिंब्याचे पत्र सादर केले होते. यामुळेच राज्यपालांनी विजयला बहुमत घेऊन ये आणि सत्ता स्थापनेचा दावा कर अशी सूचना केली. आता विजयने १२१ आमदारांची जुळवाजुळव झाल्यानंतर राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केला.


पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीनंतर पश्चिम बंगालमध्ये भाजपने सरकार स्थापन केले आहे. शुभेंदू अधिकारी यांनी मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेतली आहे. पुदुच्चेरीत एनडीएचीच सत्ता सलग दुसऱ्यांदा आली आहे. एन. रंगास्वामी यांच्या नेतृत्वात भाजपची युती पुन्हा सत्तेत आली आहे. रंगास्वामी १३ मे रोजी मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेणार आहेत. तर आसाममध्ये भाजपने हॅटट्रिक केली आहे. पुढील एक दोन दिवसांत आसाम सरकारच्या शपथविधीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. पण केरळमध्ये मुख्यमंत्री कोण होणार यावरून पेच निर्माण झाला आहे. काँग्रेस पक्ष हा गंभीर प्रश्न सोडवण्यात गुंतला आहे.

Comments
Add Comment

BMC News : जन्म व मृत्यूशी संबंधित विविध अर्जांची नोंद आता स्वतंत्र संगणकात; जुने जन्म / मृत्यू प्रमाणपत्र नवीन क्युआर कोडयुक्त प्रमाणपत्र

स्वतंत्र खिडकीद्वारे स्वीकारणार अर्ज https://prahaar.in/2026/08/06/residents-of-worli-prabhadevi-and-lower-parel-will-face-garbage-related-issues-for-3-to-4-days/ मुंबई (विशेष प्रतिनिधी) :

Water Supply Cut News : वांद्रे पूर्व ते अंधेरी पूर्व भागांत येत्या मंगळवार, बुधवार पाणीकपात

मुंबई (विशेष प्रतिनिधी) अंधेरी पूर्व ते वांद्रे पूर्व के दक्षिण आणि एच पूर्व विभागातील पाणीपुरवठा

Best Budget Bike : दिखाऊपणा कशाला? ७० किमी मायलेज आणि ५५ हजारांपासून किंमत; बजेटमधील ५ सर्वोत्तम बाईक!

सध्याच्या काळात महागाई आणि सतत वाढणारे इंधनाचे दर यामुळे सर्वसामान्य मध्यमवर्गीय नागरि

BMC News : वरळी, प्रभादेवी आणि लोअर परळ मधील नागरिकांना ३ ते ४ दिवस कचऱ्याची राहणार समस्या

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरपालिकेच्या ‘जी दक्षिण’ प्रशासकीय विभागात कचरा संकलन आणि वाहतुकीसाठी

Panchkula Murder Case : पंचकुलात खळबळ! मोलकरणीनेच केली रिटायर्ड कॅप्टनच्या पत्नीची हत्या; सीसीटीव्हीमुळे बिंग फुटले

Haryana : हरियाणामधील पंचकुला येथे घडलेल्या एका थरारक आणि खळबळजनक हत्याप्रकरणाचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.

Eknath Shinde : 'शिवसेना कोणाची?' जनतेनेच दिला कौल; ४० चे ६० आमदार करून जनतेने शिक्कामोर्तब केलं

मुंबई : शिवसेना पक्षाच्या मालकीबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)