चेन्नई : तामिळनाडूचा मुख्यमंत्री म्हणून थलपती विजय उर्फ चंद्रशेखरन जोसेफ विजय रविवारी सकाळी दहा वाजता शपथ घेणार आहे. राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी थलपती विजयला सत्ता स्थापनेची संधी दिली आहे. राज्यपालांनी विजयला बुधवार १३ मे २०२६ पर्यंत विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश दिले आहेत.
- ईडीने संजीव अरोरा यांच्याशी संबंधित १५७ कोटी रुपयांची मालमत्ता तात्पुरती केली जप्त पंजाब : अंमलबजावणी संचालनालयाने म्हणजेच ईडीने आज शनिवार ९ मे ...
याआधी संध्याकाळी थलपती विजयने राज्यपालांना भेटून १२१ आमदारांच्या पाठिंब्याच्या जोरावर सत्ता स्थापनेचा दावा केला. सत्तेसाठी थलपती विजयच्या टीव्हीके या पक्षाने एकूण पाच पक्षांचा पाठिंबा मिळवला आहे. यामुळे सत्ताधारी आमदारांची संख्या १२१ च्या घरात पोहोचली आहे. टीव्हीकेला काँग्रेस, सीपीआय, सीपीआय(एम), व्हीसीके आणि आययूएमएल यांनी पाठिंबा जाहीर केला आहे. टीव्हीकेचे १०८ आमदार निवडून आले आहेत. पण विजय दोन मतदारसंघात विजयी झाला आहे. यामुळे पुढील काही दिवसांत तो एका मतदारसंघातील आमदारकीचा राजीनामा देईल आणि तिथे पोटनिवडणूक होईल. अद्याप हा राजीनामा आलेला नसल्यामुळे कागदोपत्री टीव्हीकेचे १०८, काँग्रेसचे ५ तर सीपीआय, सीपीआय(एम), व्हीसीके आणि आययूएमएल यांचे प्रत्येकी दोन असे एकूण १२१ आमदार आहेत. यामुळे २३४ आमदारांच्या तामिळनाडू विधानसभेत विजयकडे बहुमत असल्याचे दिसत आहे.
मुंबई : नाशिकमधील बहुराष्ट्रीय कंपनीतील ‘कॉर्पोरेट जिहाद’' (Corporate Jihad') प्रकरणी सखोल चौकशी करून राष्ट्रीय महिला आयोगाने (National Commission for Women) तयार केलेला ५० ...
तामिळनाडूत सत्तास्थापनेसाठी २३४ आमदारांच्या विधानसभेत ११८ आमदारांचा पाठिंबा आवश्यक आहे. विजयकडे यापेक्षा जास्त आमदार आहेत. विजयने दोन पैकी एका मतदारसंघातील आमदारकीचा राजीनामा दिला तर पोटनिवडणुकीचा निकाल येऊन नव्या आमदाराने शपथ घेईपर्यंत सभागृहाची सदस्य संख्या २३३ असेल आणि बहुमताचा जादुई आकडा (मॅजिक फिगर) ११७ असेल.
पुदुचेरी : केंद्रशासित प्रदेश पुदुचेरीमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (राजग) बहुमत मिळाल्यानंतर एन. रंगास्वामी 13 मे रोजी पाचव्यांदा ...
विजयने पहिल्यांदा राज्यपालांची भेट घेतली त्यावेळी राज्यातील सर्वात मोठा पक्ष म्हणून सत्ता स्थापनेची संधी मिळावी अशा स्वरुपाचे पत्र दिले नव्हते. त्याने स्वतःच्या १०८ आमदारांसह काँग्रेसच्या ५ आमदारांचा पाठिंबा असल्याचे ११२ जणांच्या पाठिंब्याचे पत्र सादर केले होते. यामुळेच राज्यपालांनी विजयला बहुमत घेऊन ये आणि सत्ता स्थापनेचा दावा कर अशी सूचना केली. आता विजयने १२१ आमदारांची जुळवाजुळव झाल्यानंतर राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केला.
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीनंतर पश्चिम बंगालमध्ये भाजपने सरकार स्थापन केले आहे. शुभेंदू अधिकारी यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. पुदुच्चेरीत एनडीएचीच सत्ता सलग दुसऱ्यांदा आली आहे. एन. रंगास्वामी यांच्या नेतृत्वात भाजपची युती पुन्हा सत्तेत आली आहे. रंगास्वामी १३ मे रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. तर आसाममध्ये भाजपने हॅटट्रिक केली आहे. पुढील एक दोन दिवसांत आसाम सरकारच्या शपथविधीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. पण केरळमध्ये मुख्यमंत्री कोण होणार यावरून पेच निर्माण झाला आहे. काँग्रेस पक्ष हा गंभीर प्रश्न सोडवण्यात गुंतला आहे.