एल निनो’शी दोन हात करण्यासाठी राज्यात टास्क फोर्स

मुंबई : राज्यावर घोंगावणाऱ्या 'एल निनो'च्या संभाव्य संकटाचा मुकाबला करण्यासाठी राज्य सरकारने विशेष नियोजन सुरू केले आहे. एल निनोमुळे ओढवणाऱ्या टंचाईवर मात करण्यासाठी आणि जलसंधारणाच्या कामांमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली 'राज्यस्तरीय कृती दल' (टास्क फोर्स) गठित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मृद व जलसंधारण विभागाने घेतला आहे.


गेल्या महिन्यात २० एप्रिल रोजी सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली एल निनोच्या परिणामांवरील उपाययोजनांबाबत आढावा बैठक पार पडली होती. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी जलसंधारणाशी संबंधित विविध विभागांमध्ये समन्वय राखण्यासाठी जिल्हाधिकारी स्तरावर बैठका घेण्याचे आणि राज्यस्तरावर स्वतंत्र टास्क फोर्स स्थापन करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार ही कार्यवाही करण्यात आली आहे.राज्याचे मुख्य सचिव या टास्क फोर्सचे अध्यक्ष असतील. यामध्ये कृषी, महसूल व वन, ग्राम विकास, जलसंपदा, पाणी पुरवठा व स्वच्छता आणि रोहयो विभागाचे अपर मुख्य सचिव किंवा सचिव सदस्य म्हणून काम पाहतील. मृद व जलसंधारण विभागाचे सचिव या कृती दलाचे सदस्य सचिव असतील. हे कृती दल प्रामुख्याने पुढील ३ महिन्यांत मृद व जलसंधारण योजनांतर्गत पूर्ण करावयाच्या सर्व कामांच्या नियोजनाचे संनियंत्रण करेल. आवश्यकतेनुसार संबंधित सर्व विभागांना कामांबाबत तातडीने सूचना देईल.




 

मिशन मोडवर काम करणार

जलसंधारणाची कामे विहित कालमर्यादेत पूर्ण करण्यासाठी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश देणे आणि त्यांच्या कामाचा आढावा घेणे. क्षेत्रीय स्तरावर कामांची अंमलबजावणी करताना येणाऱ्या तांत्रिक किंवा प्रशासकीय अडचणींचे निराकरण करण्याची जबाबदारी टास्क फोर्सवर असेल. राज्यातील पाणी टंचाईचे संकट गडद होऊ नये आणि पावसाळ्यापूर्वी जलसंधारणाची कामे मार्गी लागावीत, यासाठी हे टास्क फोर्स 'मिशन मोड'वर काम करणार आहे.

Comments
Add Comment

Narender Modi : हेलिकॉप्टर घटनेबद्दल पंतप्रधान मोदींनी केली एकनाथ शिंदेंची विचारपूस

मुंबई : खराब हवामानामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हेलिकॉप्टर भरकटल्याची बातमी गुरुवारी देशभरात

Action by State Govt : बोगस परवाने वाटणाऱ्या विद्युत निरीक्षकाला निलंबनाचा 'शॉक'

राज्य सरकारची कारवाई; प्रत्यक्ष पाहणी न करता सव्वा महिन्यात १ हजार ५८६ उद्वाहनांना परवाने मुंबई : पुण्यातील आयटी

Minister Nitesh Rane : हिंदूराष्ट्रात साधू-संतांबद्दल अपशब्द उच्चारल्यास शाईफेक होणारच!

मंत्री नितेश राणे यांचा इशारा; ‘बापू अभिमान आहे!’ म्हणत संग्राम भंडारे यांना दर्शवला पाठिंबा मुंबई : "

Iran - America War : अमेरिका - इराण हल्ल्यात भारतीय जहाज बुडाले: एकाचा मृत्यू

होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये अमेरिका आणि इराण यांच्यात झालेल्या ताज्या संघर्षात एका भारतीय मालवाहू जहाजावर

Minister Sanjay Shirsat : नाशिकमधील 'टीसीएस'प्रकरण म्हणजे धर्मांतर, लव्ह जिहाद आणि ड्रग्जचे रॅकेट, मंत्री संजय शिरसाट यांचा दावा

मुंबई : "नाशिकच्या 'टीसीएस' कंपनीतील धर्मांतर प्रकरण केवळ निदा खानपुरते मर्यादित नसून, यात धर्मांतर, लव्ह जिहाद

Valvan Mahotsav 2026 : महिला बचत गटांच्या हाताची चव पोहोचणार थेट मुंबईकरांच्या घरापर्यंत

येत्या ११ आणि १२ मे २०२६ रोजी ‘वाळवण महोत्सव' मुंबई (विशेष प्रतिनिधी) महिला सक्षमीकरण आणि स्थानिक उत्पादनांना