Ratnagiri : रत्नागिरीत वादळाने विद्युतपुरवठा विस्कळित

रत्नागिरी : रत्नागिरीत आज संध्याकाळी अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे सर्वांची दाणादाण उडाली. यावर्षी आतापर्यंत जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली असली, तरी रत्नागिरी तालुक्यात फारसा पाऊस पडला नव्हता. आज रत्नागिरी शहरासह तालुक्यात अनेक ठिकाणी अर्ध्या तासात खूप पाऊस पडला. पाऊस पडण्याच्या १५ ते २० मिनिटे आधी अचानक अंधारून आले आणि सोसाट्याचा वारा वावटळीसारखा आला. त्यामुळे सर्वत्र धुळीचे साम्राज्य पसरले होते. दुकानदार, रस्त्यावरचे भाजीविक्रेते आणि वाहनचालक अशा सर्वांचीच तारांबळ उडाली. दरम्यान, जिल्ह्यात अवकाळी पावसाचा हा सलग तिसरा दिवस आहे. वाढलेला उकाडा कमी व्हायला या पावसामुळे हातभार लागला; मात्र आंबा बागायतदारांचे मोठे नुकसान झाले आहे.



संगमेश्वर तालुक्यात आज अनेक ठिकाणी सलग तिसऱ्या दिवशी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडला. आजच्या पावसामुळे संगमेश्वरला येणाऱ्या दोन मुख्य वीजवाहिन्यांमधून होणारा वीजपुरवठा खंडित झाला आहे. अनेक ठिकाणी खांब पडले असून, ताराही तुटल्या आहेत. महावितरणकडून तातडीने दुरुस्तीला सुरुवात करण्यात आली आहे; मात्र बिघाडाची व्याप्ती पाहता वीजपुरवठा लवकर सुरळित होण्याची शक्यता कमी आहे.


प्रचंड मोठ्या वादळ वाऱ्यामुळे संगमेश्वर उपकेंद्राला येणारी 33 केव्ही निवळी व 33 केवी आरवली या दोन्ही लाइन बंद पडलेल्या आहेत. आरवली लाइनचा दोष सापडला असून तेथे कामाची सुरुवात झाली आहे. अनेक ठिकाणचे खांब मोडून पडलेले आहेत. तसेच तारादेखील तुटलेल्या आहेत. रत्नागिरी तालुक्यातही अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडीत झाला आहे.

Comments
Add Comment

Mumbai-Goa Highway Accident : उभ्या कंटेनरला कारची भीषण धडक; दोन जणांचा जागीच मृत्यू, कुटुंबावर दुःखाचा डोंगर...

पोलादपूर: मुंबई-गोवा महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघाताची घटना घडली आहे. पोलादपूरजवळ झालेल्या या अपघातात दोन

Raigad Crime :मुंबईकर मुलीची माणगावमध्ये निर्घृण हत्या, मृतदेह जंगलात फेकला, परिसरात भीतीचं वातावरण

MANGAON : रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात एका १५ वर्षीय मुलीची निर्घृण हत्या करून तिचा मृतदेह जंगलात फेकून

Konkan Railway Alert : मांडवी, तेजस, मत्स्यगंधासह अनेक गाड्यांच्या वेळेत १५ जूनपासून मोठे बदल...

Mumbai-Goa Trains : कोकण रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आली आहे. पावसाळ्याचा विचार

सावंतवाडी रेल्वे स्थानकाला मधु दंडवते यांचे नाव

 मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय; शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना मुदतवाढ मुंबई : कोकण रेल्वेचे शिल्पकार आणि देशाचे

जहाज बांधणी क्षेत्रात २०३० पर्यंत ४० हजार नोकऱ्या- मंत्री नितेश राणे

रत्नागिरी, रायगड आणि पालघरच्या किनाऱ्यावर उभे राहणार विशाल 'शिप बिल्डिंग' प्रकल्प मुंबई (सुहास शेलार) :

Kokan Railway News : कोकणवासियांसाठी खुशखबर! पावसाळ्यापूर्वी कोकण रेल्वेची मोठी तयारी, युद्धपातळीवर कामे सुरू

नवी मुंबई : कोकणवासियांसाठी आणि कोकण रेल्वे (Konkan Railway) मार्गावरून प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी एक महत्त्वाची