Ratnagiri : रत्नागिरीत वादळाने विद्युतपुरवठा विस्कळित

रत्नागिरी : रत्नागिरीत आज संध्याकाळी अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे सर्वांची दाणादाण उडाली. यावर्षी आतापर्यंत जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली असली, तरी रत्नागिरी तालुक्यात फारसा पाऊस पडला नव्हता. आज रत्नागिरी शहरासह तालुक्यात अनेक ठिकाणी अर्ध्या तासात खूप पाऊस पडला. पाऊस पडण्याच्या १५ ते २० मिनिटे आधी अचानक अंधारून आले आणि सोसाट्याचा वारा वावटळीसारखा आला. त्यामुळे सर्वत्र धुळीचे साम्राज्य पसरले होते. दुकानदार, रस्त्यावरचे भाजीविक्रेते आणि वाहनचालक अशा सर्वांचीच तारांबळ उडाली. दरम्यान, जिल्ह्यात अवकाळी पावसाचा हा सलग तिसरा दिवस आहे. वाढलेला उकाडा कमी व्हायला या पावसामुळे हातभार लागला; मात्र आंबा बागायतदारांचे मोठे नुकसान झाले आहे.



संगमेश्वर तालुक्यात आज अनेक ठिकाणी सलग तिसऱ्या दिवशी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडला. आजच्या पावसामुळे संगमेश्वरला येणाऱ्या दोन मुख्य वीजवाहिन्यांमधून होणारा वीजपुरवठा खंडित झाला आहे. अनेक ठिकाणी खांब पडले असून, ताराही तुटल्या आहेत. महावितरणकडून तातडीने दुरुस्तीला सुरुवात करण्यात आली आहे; मात्र बिघाडाची व्याप्ती पाहता वीजपुरवठा लवकर सुरळित होण्याची शक्यता कमी आहे.


प्रचंड मोठ्या वादळ वाऱ्यामुळे संगमेश्वर उपकेंद्राला येणारी 33 केव्ही निवळी व 33 केवी आरवली या दोन्ही लाइन बंद पडलेल्या आहेत. आरवली लाइनचा दोष सापडला असून तेथे कामाची सुरुवात झाली आहे. अनेक ठिकाणचे खांब मोडून पडलेले आहेत. तसेच तारादेखील तुटलेल्या आहेत. रत्नागिरी तालुक्यातही अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडीत झाला आहे.

Comments
Add Comment

गणपतीपुळे दुर्घटनेतील पाचपैकी एकाचा मृतदेह सापडला

रत्नागिरी : गणपतीपुळे येथे आज सकाळी घडलेल्या दुर्घटनेत बेपत्ता झालेल्या पाच पर्यटकांपैकी एका तरुणाचा मृतदेह

रत्नागिरी : गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर पाच पर्यटकांचा बुडून मृत्यू

रत्नागिरी : गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी आलेल्या संभाजीनगर येथील पर्यटकांपैकी पाच जण बुडून मरण पावले. ही दुर्घटना

Coronation of Shivaji Maharaj : शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे'

रायगड : दुर्गराज रायगडावर तिथीनुसार २७ जून २०२६ रोजी साजऱ्या होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या तयारीला

Mantri Nitesh Rane : कोकणातील तीर्थस्थळे जलमार्गांनी जोडणार!

मंत्री नितेश राणे यांची संकल्पना; आंगणेवाडी, कुणकेश्वर, गणपतीपुळे, पाली बल्लाळेश्वर मंदिराचा समावेश मुंबई :

Narendra Modi : सिंधुदुर्ग आणि नाशिक जागतिक पर्यटन स्थळे म्हणून विकसित करणार!

नीती आयोगाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी मांडला रोडमॅप; २०४७ पर्यंत ५ ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट

Mumbai-Goa Highway Accident : उभ्या कंटेनरला कारची भीषण धडक; दोन जणांचा जागीच मृत्यू, कुटुंबावर दुःखाचा डोंगर...

पोलादपूर: मुंबई-गोवा महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघाताची घटना घडली आहे. पोलादपूरजवळ झालेल्या या अपघातात दोन