Ratnagiri : रत्नागिरीत वादळाने विद्युतपुरवठा विस्कळित

रत्नागिरी : रत्नागिरीत आज संध्याकाळी अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे सर्वांची दाणादाण उडाली. यावर्षी आतापर्यंत जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली असली, तरी रत्नागिरी तालुक्यात फारसा पाऊस पडला नव्हता. आज रत्नागिरी शहरासह तालुक्यात अनेक ठिकाणी अर्ध्या तासात खूप पाऊस पडला. पाऊस पडण्याच्या १५ ते २० मिनिटे आधी अचानक अंधारून आले आणि सोसाट्याचा वारा वावटळीसारखा आला. त्यामुळे सर्वत्र धुळीचे साम्राज्य पसरले होते. दुकानदार, रस्त्यावरचे भाजीविक्रेते आणि वाहनचालक अशा सर्वांचीच तारांबळ उडाली. दरम्यान, जिल्ह्यात अवकाळी पावसाचा हा सलग तिसरा दिवस आहे. वाढलेला उकाडा कमी व्हायला या पावसामुळे हातभार लागला; मात्र आंबा बागायतदारांचे मोठे नुकसान झाले आहे.



संगमेश्वर तालुक्यात आज अनेक ठिकाणी सलग तिसऱ्या दिवशी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडला. आजच्या पावसामुळे संगमेश्वरला येणाऱ्या दोन मुख्य वीजवाहिन्यांमधून होणारा वीजपुरवठा खंडित झाला आहे. अनेक ठिकाणी खांब पडले असून, ताराही तुटल्या आहेत. महावितरणकडून तातडीने दुरुस्तीला सुरुवात करण्यात आली आहे; मात्र बिघाडाची व्याप्ती पाहता वीजपुरवठा लवकर सुरळित होण्याची शक्यता कमी आहे.


प्रचंड मोठ्या वादळ वाऱ्यामुळे संगमेश्वर उपकेंद्राला येणारी 33 केव्ही निवळी व 33 केवी आरवली या दोन्ही लाइन बंद पडलेल्या आहेत. आरवली लाइनचा दोष सापडला असून तेथे कामाची सुरुवात झाली आहे. अनेक ठिकाणचे खांब मोडून पडलेले आहेत. तसेच तारादेखील तुटलेल्या आहेत. रत्नागिरी तालुक्यातही अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडीत झाला आहे.

Comments
Add Comment

Pramod Jathar : कोकणात भाजपा अधिक मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांनी झोकून देऊन काम करावे

रत्नागिरी : भविष्यात संपूर्ण कोकणात भारतीय जनता पक्षाचे संघटन अधिक बळकट व भक्कम करण्याचा निर्धार पक्षाने केला

कोकणची पोरं हुश्शार ! बारावी प्रमाणे दहावीच्या निकालातही ९७.६२ टक्क्यांसह राज्यात कोकणच अव्वल

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या दहावीच्या निकालात कोकण

Kokan Railway trains : कोकण रेल्वेच्या पाच गाड्यांना संगमेश्वर येथे थांबा मिळण्याची शक्यता!

रत्नागिरी : कोकण रेल्वेसंदर्भात पार पडलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत संगमेश्वर रेल्वे स्थानकासाठी दिलासादायक

​Sawantwadi : सावंतवाडी शहराला वादळाचा तडाखा

रामेश्वर प्लाझा इमारतीचे पत्रे उडाले पंचम खेमराज महाविद्यालयाच्या जुने इमारतीचे अतोनात नुकसान सावंतवाडी :

Eknath Shinde : 'पात्र लाडक्या बहिणी लाभापासून वंचित राहणार नाहीत'

रायगड : बोरीचा माळ सारख्या छोट्या गावात लक्ष्मी नारायणाचे मंदिर उभे राहिले आहे. त्यामुळे आता तुम्हाला रोज

Ratnagiri : चार वाहनांना धडक देऊन ट्रक कोसळला विहिरीत

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावर आज पहाटे हातखंबा येथे चार वाहनांचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत एक जण गंभीर