Pramod Jathar : कोकणात भाजपा अधिक मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांनी झोकून देऊन काम करावे

रत्नागिरी : भविष्यात संपूर्ण कोकणात भारतीय जनता पक्षाचे संघटन अधिक बळकट व भक्कम करण्याचा निर्धार पक्षाने केला असून प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्त्याने पक्षासाठी झोकून देऊन काम करावे, असे आवाहन विधानपरिषदेचे नवनिर्वाचित आमदार प्रमोद जठार यांनी राजापूर येथे केले. आपल्याला मिळालेली विधानपरिषदेची आमदारकी हा वैयक्तिक सन्मान नसून पक्षासाठी निष्ठेने काम करणाऱ्या ज्येष्ठ तसेच सर्वसामान्य कार्यकर्त्यांना समर्पित असल्याचेही त्यांनी सांगितले.जठार रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असून राजापूरपासून त्यांनी दौऱ्याची सुरुवात केली. राजापुरात भाजपाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. शहरात आगमन होताच त्यांनी जवाहर चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासही त्यांनी पुष्पहार अर्पण केला.


केंद्रात आणि राज्यात भाजपा महायुतीची सत्ता असून या सत्तेच्या माध्यमातून सर्वसामान्यांसाठी काम करत पक्ष तळागाळापर्यंत पोहोचवावा, असे आवाहन त्यांनी केले. सरकार युतीचे असते, निवडणुका युतीत लढवल्या जातात; मात्र पक्ष वाढविण्याची जबाबदारी प्रत्येक कार्यकर्त्याची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भविष्यात कोकणात “शतप्रतिशत भाजपा” हाच पक्षाचा अजेंडा असल्याचेही त्यांनी नमूद केले.



“नवा-जुना” असा वाद न करता एकदिलाने पक्षासाठी काम करा. पक्ष कार्यकर्त्यांच्या कामाची दखल घेत असतो. आज राजापिरातच नव्हे तर रत्नागिरीतही भाजपाची सत्ता नाही; मात्र भविष्यात ती निश्चित येईल आणि त्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्नशील राहावे, असे आवाहन त्यांनी केले. पदे येतात-जातात, एकाला संधी देताना अनेकजण नाराज होतात; मात्र पक्षाचे ध्येय ‘राष्ट्र प्रथम’ हेच असल्याने त्यानुसार कार्य करावे, असेही त्यांनी सांगितले.


यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते ॲड. विलास पाटणे, कोकण संघटन मंत्री शैलेंद्र दळवी, जिल्हा सरचिटणीस ओंकार फडके, जिल्हा सरचिटणीस व उपसभापती अभिजित गुरव, ओबीसी सेलचे प्रदेश सरचिटणीस अनिलकुमार करंगुटकर, नगरसेविका सुयोगा जठार, महिला प्रदेश सचिव शिल्पा मराठे, शहराध्यक्ष किरण शिवलकर यांच्यासह भाजपा पदाधिकारी, महिला पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

Comments
Add Comment

Mumbai-Goa Highway Accident : उभ्या कंटेनरला कारची भीषण धडक; दोन जणांचा जागीच मृत्यू, कुटुंबावर दुःखाचा डोंगर...

पोलादपूर: मुंबई-गोवा महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघाताची घटना घडली आहे. पोलादपूरजवळ झालेल्या या अपघातात दोन

Raigad Crime :मुंबईकर मुलीची माणगावमध्ये निर्घृण हत्या, मृतदेह जंगलात फेकला, परिसरात भीतीचं वातावरण

MANGAON : रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात एका १५ वर्षीय मुलीची निर्घृण हत्या करून तिचा मृतदेह जंगलात फेकून

Konkan Railway Alert : मांडवी, तेजस, मत्स्यगंधासह अनेक गाड्यांच्या वेळेत १५ जूनपासून मोठे बदल...

Mumbai-Goa Trains : कोकण रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आली आहे. पावसाळ्याचा विचार

सावंतवाडी रेल्वे स्थानकाला मधु दंडवते यांचे नाव

 मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय; शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना मुदतवाढ मुंबई : कोकण रेल्वेचे शिल्पकार आणि देशाचे

जहाज बांधणी क्षेत्रात २०३० पर्यंत ४० हजार नोकऱ्या- मंत्री नितेश राणे

रत्नागिरी, रायगड आणि पालघरच्या किनाऱ्यावर उभे राहणार विशाल 'शिप बिल्डिंग' प्रकल्प मुंबई (सुहास शेलार) :

Kokan Railway News : कोकणवासियांसाठी खुशखबर! पावसाळ्यापूर्वी कोकण रेल्वेची मोठी तयारी, युद्धपातळीवर कामे सुरू

नवी मुंबई : कोकणवासियांसाठी आणि कोकण रेल्वे (Konkan Railway) मार्गावरून प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी एक महत्त्वाची