Hutatma Smarak Chowk : हुतात्मा स्मारक चौकाच्या वास्तूची दुरवस्था, सुशोभीकरणाच्या मुद्दयावरून राजकारण करणाऱ्या काँग्रेसला भाजपने दाखवला आरसा

मुंबई (विशेष प्रतिनिधी)


हुतात्मा स्मारकाच्या (Hutatma Smarak Chowk) सुशोभिकरणाच्या मुद्दयावरून महापालिका सभागृहात चांगलीच गरमागरमी झाली. या हुतात्मा स्मारकाच्या काही भागाची दुरुस्ती करून अवतीभवतीचा परिसर सुशोभिकरण करण्याची मागणी उबाठाच्या नगरसेवकांने करताच काँग्रेसने याचे सुशोभिकरण न केल्यास विरोधक रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असा इशारा दिला. यावर भाजपने काँग्रेसला आरसा दाखवून ज्या पक्षाच्या मुख्यमंत्र्यांनी संयुक्त महाराष्ट्र मिळू नये यासाठी प्रयत्न केला आणि मराठी माणसांच्या अंगावर गाडी चालवून लाठी हल्ला केला त्यांनी आम्हाला आंदोलनाचा इशारा देवू नये. आणि याच काँग्रेस पक्षाचे समर्थन काँग्रेस पक्षाला घेण्याची गरज कशी भासली असा सवाल विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला.



मुंबई महापालिका सभागृहात उबाठाचे नगरसेवक अंकित प्रभू यांनी हुतात्मा स्मारकाच्या काही लाद्या उखडलेल्या असून त्यांची दुरुस्ती व्हावी आणि त्यांच्या अवती भवतीचा परिसर सुशोभित व्हावा मागणी हरकतीच्या मुद्दयाद्वार केली. याला पाठिंबा देतानाच काँग्रेसचे अश्रफ आझमी यांनी एवढा मोठा अर्थसंकल्प असलेल्या महापालिकेला हुतात्मा स्मारकाची डागडुजी करता येत नाही हे दुर्देवी असून जर हुतात्मा स्मारकाचे नुतनीकरण न केल्यास विरोधक रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असा इशारा दिला. यावर किशोरी पेडणेकर यांनी हुतात्मा स्मारकाचे वास्तूचे सांधे निखळले असून पावणे चार वर्ष प्रशासन होते तेव्हा त्यांनी काय केले असा सवाल केला. तसेच आम्हा नगरसेवकांना दिलेले २५ लाख रुपये परत घ्या पण याचा विकास करावा असे सांगत स्टंटबाजी करण्याचा प्रयत्न केला. यावर शिवसेनेचे अमेय घोले यांनी काँग्रेसचे हे बेगडी प्रेम असून जो काँग्रेस पक्ष मुंबईसह महाराष्ट्र मिळू नये म्हणून प्रयत्न करत होता, त्यांनी आम्हाला या हुतात्मा स्मारकाबाबत बोलू नये. आणि हुतात्मा स्मारकाचे काम प्रशासन निश्चितच करेल असेही सांगितले. याचा समाचार घेताना स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी हुतात्मा स्मारकाचे सुशोभीकरण व्हायलाचे किंबहुना ते होईलच. कुणीही या विरोधात नसेल, परंतु काँग्रेस आज जी भूमिका मांडत आहे ते त्यांचे पुतना मावशीचे प्रेम आहे. या संयुक्त महाराट्र लढ्यासाठी हुतात्मा केले कोणी, त्यांच्या गोळ्या झाडल्या कुणी असा सवाल आज आपण या सभागृहात ताठ मानेने बसतो तो याच हुतात्म्यांच्या बलिदानामुळे. काँग्रेसने आम्हाला अभिमान आणि स्वाभिमान शिकवू नये. त्यामुळे या स्मारक चौकाचे काम होणारच असेही त्यांनी सांगितले.


यावर सभागृहनेते गणेश खणकर यांनी हा मुद्दा मराठी माणसांच्या भावनेशी निगडीत आहे. पण उबाठा, काँग्रेसचे समर्थन या विषयासंदर्भात घ्यावे लागते हे दुर्दैव आहे. यावर महापौर रितू तावडे यांनी मराठी माणसांच्या बलिदानामुळे आज ही मुंबई उभी आहे. त्यामुळे या पवित्र हुतात्मा चौकाच्या सुशाेभिकरणाच्या कामांचा अहवाल बनवून निधीच्या तरतुदीसह तयार करून पुढील सभेत सादर केला जावा असे निर्देश महापौरांनी देत हरकतीचा मुद्दा राखून ठेवला.

Comments
Add Comment

Devendra Fadnavis : बी.टी. सरांच्या निधनाने वैयक्तिक मार्गदर्शकाला मुकलो!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शोकसंवेदना मुंबई, माजी आमदार, शिक्षणतज्ञ आणि विविध सामाजिक प्रश्नांचे गाढे

Devendra Fadnavis : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनासाठी छापील पास बंद

'चेहरा पडताळणी पद्धती'द्वारेच प्रवेश; मुख्यमंत्र्यांपासून मंत्री आणि पीठासीन अधिकाऱ्यांसह सर्व घटकांसाठी

Shrikant Shinde : दोन दिवस वाट पहा, सगळं स्पष्ट होईल!

 'ऑपरेशन टायगर'वर खासदार श्रीकांत शिंदे यांची सूचक प्रतिक्रिया मुंबई : उबाठा गटाचे ६ खासदार फुटल्यानंतर

Pratap Sarnaik : बेस्ट कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा; मुंबईकरांचे हाल टाळण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहन

मुंबई, : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुचनेनुसार बेस्ट कृती समितीच्या प्रतिनिधींशी झालेल्या चर्चेत

Minister Dadaji Bhuse : शालेय शिक्षण विभाग आणि गुगल दरम्यान कृत्रिम बुद्धिमत्ता प्रशिक्षणासाठी करार

राज्यातील चार लाख शिक्षकांना मिळणार लाभ मुंबई : राज्यातील शिक्षकांना कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल

Jay Pawar : जय पवारांची मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्राला भेट

मुंबई, महाराष्ट्रात पावसाच्या आगमनास होत असलेल्या विलंबाची सद्यस्थिती आणि त्याचा राज्यावर होणारा संभाव्य