ओडिशा : भारताने गुरुवारी (७ मे) सायंकाळी Odisha किनारपट्टीवरून आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्र (ICBM) चाचणी केल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. सोशल मीडियावर आणि काही संरक्षणविषयक सूत्रांकडून ही चाचणी भारताच्या अत्याधुनिक ‘अग्नी-6’ क्षेपणास्त्राची असू शकते, असा दावा केला जात आहे. मात्र याबाबत भारत सरकार किंवा संरक्षण मंत्रालयाकडून अद्याप अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही.
ओडिशा : ओडिशाच्या किनारपट्टीवर भारताने संरक्षण तंत्रज्ञान क्षेत्रात आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. Defence Research and Development Organisation (डीआरडीओ) आणि भारतीय हवाई ...
संरक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, जर ही चाचणी खरोखरच ‘अग्नी-6’ची असेल, तर ती भारताच्या सामरिक क्षमतेसाठी मोठा टप्पा मानली जाईल. ‘अग्नी-6’ हे भारताचे अत्याधुनिक आणि अधिक मारक क्षमता असलेले आंतरखंडीय क्षेपणास्त्र मानले जाते. या क्षेपणास्त्राची मारक क्षमता हजारो किलोमीटरपर्यंत असल्याची चर्चा आहे.
दरम्यान, Defence Research and Development Organisation म्हणजेच डीआरडीओ किंवा भारतीय संरक्षण मंत्रालयाने कोणतीही अधिकृत माहिती जाहीर केलेली नाही. त्यामुळे या चाचणीबाबत अद्याप अधिकृत पुष्टी झालेली नाही.
पुण्यातील प्रसिद्ध उद्योजक आणि KPIT Technologies चे संस्थापक व अध्यक्ष रवी पंडित यांचे आज (८ मे) पुण्यात निधन झाले. कंपनीने अधिकृत एक्स्चेंज फायलिंगद्वारे ही ...