Kerala : केरळमध्ये मुख्यमंत्रीपदाचा सस्पेन्स

तिरुवनंतपुरम: केरळ विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या नेतृत्वाखालील युनायटेड डेमोक्रेटिक फ्रंटने निर्विवाद बहुमत मिळवत सत्तांतर घडवून आणले आहे. मात्र, विजयानंतर आता मुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेसच्या तीन बड्या नेत्यांमध्ये तीव्र चुरस निर्माण झाली असून, अंतिम निवडीचा चेंडू पक्षश्रेष्ठींच्या कोर्टात गेला आहे.



केरळ विधानसभेच्या एकूण १४० जागांपैकी यूडीएफने १०२ जागांवर विजय मिळवला आहे. यात सर्वाधिक ६३ जागा जिंकून काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. गुरुवारी पार पडलेल्या काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत नवा नेता निवडण्याचे सर्व अधिकार काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांना देण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.



मुख्यमंत्रीपदासाठी सध्या तीन नावे आघाडीवर आहेत, ज्यामुळे पक्षनेतृत्वासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. व्ही. डी. सतीशन गेल्या पाच वर्षांपासून विरोधी पक्षनेते म्हणून यूडीएफचे नेतृत्व करणाऱ्या सतीशन यांना कार्यकर्त्यांचा मोठा पाठिंबा आहे. पक्षाच्या विजयात त्यांचा सिंहाचा वाटा असल्याचे मानले जाते. के. सी. वेणुगोपाल हे एआयसीसी सरचिटणीस आणि राहुल गांधींचे निकटवर्तीय असलेले वेणुगोपाल यांना बहुसंख्य आमदारांचा पाठिंबा असल्याचे समजते. राष्ट्रीय स्तरावरील अनुभव आणि निवडणूक व्यवस्थापनातील त्यांची भूमिका ही त्यांची जमेची बाजू आहे. तर रमेश चेन्निथला हे माजी विरोधी पक्षनेते आणि अनुभवी नेते म्हणून चेन्निथला यांच्या समर्थकांनी त्यांच्या नावाचा आग्रह धरला आहे.


पर्यवेक्षकांकडून आमदारांची चाचपणी : अखिल भारतीय काँग्रेस समितीचे पर्यवेक्षक मुकुल वासनिक आणि अजय माकण सध्या तिरुवनंतपुरममध्ये तळ ठोकून आहेत. त्यांनी प्रत्येक निवडून आलेल्या आमदाराची वैयक्तिक भेट घेऊन त्यांचे मत जाणून घेतले आहे. सतीशन यांच्या समर्थकांनी त्यांच्या नावासाठी आंदोलनाचा इशारा दिला असतानाच, वेणुगोपाल यांच्या पारड्यात आमदारांचे वजन जास्त असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.


आव्हाने आणि पेच : केवळ मुख्यमंत्रीच नव्हे, तर मंत्रिमंडळ निवडीवरूनही पक्षात गटबाजी उफाळून येण्याची शक्यता आहे. "नव्या मुख्यमंत्र्यांना स्वतःचे मंत्रिमंडळ निवडण्याचे स्वातंत्र्य असेल की नाही, याबाबत साशंकता आहे. निवडीत चूक झाल्यास पक्षाला पुन्हा जुन्या संघर्षाला सामोरे जावे लागेल," अशी भीती एका वरिष्ठ नेत्याने व्यक्त केली आहे.

Comments
Add Comment

Rain Update : 'पश्चिमी विक्षोभा'मुळे देशभरात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अनेक राज्यांना सतर्कतेचा इशारा

नवी दिल्ली : हवामान विभागाने देशभरात आठवडाभर मान्सून सक्रिय राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. उत्तर भारतातील

FYJC : अकरावी प्रवेशासाठी मंगळवार ४ ऑगस्टपासून विशेष फेरी

मुंबई : शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठीच्या इयत्ता अकरावी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत आतापर्यंत १५ लाखांहून

Devendra Fadnavis : राष्ट्रीय स्तरावर शालेय शिक्षणात महाराष्ट्राचे महत्त्वपूर्ण स्थान; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्यातील शालेय शिक्षण क्षेत्रात अभिनव उपक्रमांची अंमलबजावणी https://prahaar.in/2026/08/03/promotion-for-18-officers-of-the-legislature-secretariat/ शालेय

Mumbai Metro : मेट्रो -६ प्रकल्पाचे ८८ टक्के काम पूर्ण, कारशेडचा प्रश्न कायम

मुंबई : स्वामी समर्थ नगर-जोगेश्वरी-विक्रोळी मेट्रो-६चे काम अंतिम टप्प्यात पोहोचले असले तरी कांजुरमार्ग कारशेडचा

Chandrashekhar Bawankule : आमचा 'शेर' महाराष्ट्रात प्रचंड ताकद निर्माण करतोय!

- महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून मंत्री नितेश राणे यांच्याबद्दल गौरवोद्गार - नितेश राणे

Bank Election : परभणी बँकेच्या सत्तेत मोठा उलटफेर! १४ वर्षांनंतर चित्र बदलले, दिग्गजांना मागे टाकत बोर्डीकर पुन्हा सत्ताधीश!

परभणी: राजकीय वर्तुळात अनेकदा "वेळ प्रत्येकाची येते" असे म्हटले जाते, आणि परभणी-हिंगोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी