SIR' formula in Maharashtra : पश्चिम बंगालनंतर आता महाराष्ट्रात ‘एसआयआर’ फॉर्म्युला

२०२९च्या निवडणुकांसाठी भाजपची रणनीती; सर्व लहान-थोर कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देणार


मुंबई : पश्चिम बंगालमधील ऐतिहासिक विजयानंतर भारतीय जनता पक्षाने आता आपला मोर्चा महाराष्ट्राकडे वळवला आहे. बंगालमध्ये निवडणूक आयोगाच्या विशेष मतदार पुनरावलोकन (एसआयआर) मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीचा भाजपला मोठा फायदा झाल्याचे मानले जाते. आता हाच कित्ता महाराष्ट्रात गिरवत मराठी मुलूखावर घट्ट पकड निर्माण करण्याची रणनीती पक्षाने आखली आहे. या मोहिमेच्या तयारीसाठी बुधवारी दादर येथील वसंतस्मृती कार्यालयात एका विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.



">राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यशाळेला प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आशिष शेलार, जयकुमार गोरे, नितेश राणे, अतुल सावे, महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे, महाराष्ट्र विधानपरिषदेचे गटनेते आ. प्रवीण दरेकर, प्रदेश सरचिटणीस आ. निरंजन डावखरे, प्रदेश सरचिटणीस आ. माधवी नाईक, प्रदेश सरचिटणीस आ. योगेश सागर, प्रदेश सरचिटणीस सुनील राणे आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यासह पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



भाजपने 'एसआयआर' मोहिमेच्या तयारीसाठी एक विस्तृत कार्यक्रम आखला आहे. सुरुवातीला स्थानिक पातळीवरील पदाधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिल्यानंतर, टप्प्याटप्प्याने पंचायत समिती सदस्य, नगरसेवक आणि जिल्हा परिषद सदस्यांना विभागीय पातळीवर प्रशिक्षित केले जाईल. त्यानंतर आमदार, खासदार आणि मंत्र्यांना प्रशिक्षण दिले जाणार असून, अंतिम टप्प्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सर्व लोकप्रतिनिधींना मार्गदर्शन करणार आहेत.



२०२९मध्ये स्वबळाची चर्चा


भाजपच्या या विशेष मोहिमेमुळे आगामी निवडणुका भाजप स्वबळावर लढणार का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात पुन्हा सुरू झाली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गेल्या वर्षी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असताना, "भाजपला आता कुबड्यांची गरज नाही. आपण स्वबळावर चालणारा पक्ष आहोत," असे सूचक विधान केले होते. या पार्श्वभूमीवर भाजपची ही नवी रणनीती अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

Tags
west bengalwest bengal electionSIR' formula in Maharashtrabengal
Comments
Add Comment

Central Railway : मुसळधार पावसानंतर रेल्वेची शर्यत! लोणावळा–कर्जत मार्गावर १,१०० हून अधिक कामगारांचे युद्धपातळीवर काम; एक रेल्वे मार्ग सुरू

मुंबई : लोणावळा–कर्जत घाट विभागात मुसळधार पावसामुळे झालेल्या दरडी कोसळण्याच्या घटनेनंतर मध्य रेल्वेने रेल्वे

Hasan Mushrif : राज्यात नर्सिंग शिक्षणाच्या विस्ताराला मान्यता - मंत्री हसन मुश्रीफ

- कमी शुल्कामध्ये दर्जेदार शिक्षण उपलब्ध होणार मुंबई : राज्यातील आरोग्य व्यवस्थेसाठी कुशल परिचारिकांची

Devendra Fadnavis : सावंतवाडीत आता 'राजधानी'सह ३ महत्त्वाच्या गाड्या थांबणार! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

- रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून मंजुरीचे पत्र मुंबई : कोकण रेल्वेवरील प्रवाशांसाठी आणि विशेषतः

Pratap Sarnaik : एसटी महामंडळाचा कायापालट होणार; जुन्या बसेस बदलून ताफ्यात ई-बसेस येणार

- दुर्गम भागासाठी २००० मिडी बसेस सज्ज; मंत्री प्रताप सरनाईक यांची विधानपरिषदेत घोषणा मुंबई : भविष्यात एसटी

Devendra Fadnavis : मुंबईच्या पूर नियंत्रणासाठी १३ हजार कोटींचा आराखडा; मुख्यमंत्र्यांची घोषणा

- 'फडणवीसांना बदनाम करा, पण महाराष्ट्राला नको', विरोधकांना आवाहन मुंबई : "मुंबईला दरवर्षी भेडसावणाऱ्या

Mumbai Tree Collapse : वादळ आणि पावसात उन्मळून पडणाऱ्या झाडांचे जोखीम मूल्यांकन सुरू

मुंबई : मुंबईतील वाढत्या वादळी वाऱ्यांच्या पार्श्वभूमीवर वृक्षसंवर्धन आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी मुंबई