SIR' formula in Maharashtra : पश्चिम बंगालनंतर आता महाराष्ट्रात ‘एसआयआर’ फॉर्म्युला

२०२९च्या निवडणुकांसाठी भाजपची रणनीती; सर्व लहान-थोर कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देणार


मुंबई : पश्चिम बंगालमधील ऐतिहासिक विजयानंतर भारतीय जनता पक्षाने आता आपला मोर्चा महाराष्ट्राकडे वळवला आहे. बंगालमध्ये निवडणूक आयोगाच्या विशेष मतदार पुनरावलोकन (एसआयआर) मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीचा भाजपला मोठा फायदा झाल्याचे मानले जाते. आता हाच कित्ता महाराष्ट्रात गिरवत मराठी मुलूखावर घट्ट पकड निर्माण करण्याची रणनीती पक्षाने आखली आहे. या मोहिमेच्या तयारीसाठी बुधवारी दादर येथील वसंतस्मृती कार्यालयात एका विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.



">राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यशाळेला प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आशिष शेलार, जयकुमार गोरे, नितेश राणे, अतुल सावे, महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे, महाराष्ट्र विधानपरिषदेचे गटनेते आ. प्रवीण दरेकर, प्रदेश सरचिटणीस आ. निरंजन डावखरे, प्रदेश सरचिटणीस आ. माधवी नाईक, प्रदेश सरचिटणीस आ. योगेश सागर, प्रदेश सरचिटणीस सुनील राणे आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यासह पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



भाजपने 'एसआयआर' मोहिमेच्या तयारीसाठी एक विस्तृत कार्यक्रम आखला आहे. सुरुवातीला स्थानिक पातळीवरील पदाधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिल्यानंतर, टप्प्याटप्प्याने पंचायत समिती सदस्य, नगरसेवक आणि जिल्हा परिषद सदस्यांना विभागीय पातळीवर प्रशिक्षित केले जाईल. त्यानंतर आमदार, खासदार आणि मंत्र्यांना प्रशिक्षण दिले जाणार असून, अंतिम टप्प्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सर्व लोकप्रतिनिधींना मार्गदर्शन करणार आहेत.



२०२९मध्ये स्वबळाची चर्चा


भाजपच्या या विशेष मोहिमेमुळे आगामी निवडणुका भाजप स्वबळावर लढणार का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात पुन्हा सुरू झाली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गेल्या वर्षी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असताना, "भाजपला आता कुबड्यांची गरज नाही. आपण स्वबळावर चालणारा पक्ष आहोत," असे सूचक विधान केले होते. या पार्श्वभूमीवर भाजपची ही नवी रणनीती अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

Tags
west bengalwest bengal electionSIR' formula in Maharashtrabengal
Comments
Add Comment

Mumbai Crime : मुंबईत ऑटोरिक्षा चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; 12 रिक्षांसह दोन आरोपी अटकेत

मुंबई : खेरवाडी पोलीस ठाण्याच्या (Kherwadi Police ) गुन्हे प्रकटीकरण पथकाने ऑटोरिक्षा चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत

Bandra Fire : वांद्रे येथील 'अटलांटिक' इमारतीला भीषण आग; ६४ वर्षीय रहिवाशाचा मृत्यू

भीषण घटनेत दोन अग्निशमन जवान जखमी मुंबई : वांद्रे (पश्चिम) (Bandra West) येथील शेर्ली राजन रोडवरील 'अटलांटिक' (Atlantic Building) या

Water cut in Mumbai : जून अखेरपर्यंत पाऊस न पडल्यास मुंबईकरांवर आणखी १० टक्के पाणीकपात

५ जुलैनंतर आढावा घेतल्यानंतर कपातीचा घेतला जाणार निर्णय मुंबई (सचिन धानजी) मुंबईला (Mumbai) पाणी पुरवठा करणाऱ्या

Weather Alert: मान्सूनची प्रतीक्षा कायम! पुढील ४८ तास महत्त्वाचे, हवामान खात्याने दिला इशारा

मुंबई : जून (June) महिन्याचा अर्धा टप्पा संपत आला असला तरी महाराष्ट्रात (Maharashtra) मान्सून (Monsoon) अद्याप पूर्णपणे सक्रिय

Operation Tiger in BMC : मुंबई महापालिकेतही लवकरच ऑपरेशन टायगर

- तब्बल २१ नगरसेवक टप्प्यात? मुंबई (विशेष प्रतिनिधी) उबाठाचे सहा खासदार फुटल्यानंतर याचे पडसाद आता मुंबईतील

Goregaon-Mulund Link Road : गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्प विहीत मुदतीत पूर्ण करावा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग ( जी एम एल आर) प्रकल्प टप्पा ३ - ब अंतर्गत दादासाहेब फाळके