Mumbai Birth Certificate Scam : मुंबईतील बोगस जन्म मृत्यू प्रमाणपत्र प्रकरणी SIT तपास करणार

मुंबई : मुंबईतील बोगस जन्म मृत्यू प्रमाणपत्र प्रकरणी एसआयटी तपास करणार आहे. यासाठी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचे विशेष तपास पथक (Special Investigation Team or SIT) स्थापन करण्यात आले आहे. विशेष तपास पथकात अर्थात एसआयटीत पोलीस सहआयुक्त, अपर पोलीस आयुक्त, विशेष शाखेचे अपर पोलीस आयुक्त, गुन्हे शाखेच्या प्रकटीकरण विभागाचे पोलीस उप आयुक्त तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त (प्रकटीकरण - मध्य, गुन्हे शाखा) हे पाच अधिकारी आणि त्यांच्या मदतीला इतर पोलीस अधिकारी - कर्मचारी असतील. गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्यामुळे एसआयटी तपास करणार आहे.


याआधी भारतीय जनता पार्टीने मुंबईतील बोगस जन्म मृत्यू प्रमाणपत्र प्रकरणी तपास करण्याची मागणी केली होती. परदेशी नागरिकांचे अवैध वास्तव्य रोखण्यास मदत व्हावी तसेच देशाची सुरक्षा अबाधित राखणे शक्य व्हावे यासाठी तपासाची मागणी करण्यात आली होती. भाजपचे नगरसेवक नील सोमय्या यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे मुंबई महापालिकेत ही मागणी केली होती.


हजारोंच्या संख्येने बनावट जन्म प्रमाणपत्र घेऊन बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोर मुंबईत वास्तव्यास आहेत, असा संशय भाजपने व्यक्त केला आहे. या संशयाची गंभीर दखल घेऊन मुंबई महापालिका आयुक्त रितू तावडे यांनी पोलीस तपासाचे निर्देश दिले. यानंतर हाती आलेल्या प्राथमिक माहितीचा आढावा घेऊन तसेच खबऱ्यांकडून प्रकरणाची व्याप्ती समजून घेतल्यानंतर मुंबई पोलिसांनी सखोल तपासाकरिता एसआयटीची स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.


Comments
Add Comment

IIT Mumbai : आयआयटी मुंबईच्या परिसरात इमारत बाधकामांमध्ये बाधित २३७ झाडे कापली, तर ४०० झाडे केली पुनर्रोपित

- ड्रोन सेंटर सर्व्हिस ब्लॉकच्या बांधकामांमध्ये आणखी ५४ झाडे बाधित मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईतील पवई येथील

BMC News : महापालिकेच्या रुग्णालयांमधील स्वच्छता खासगी कंपनीमार्फत!

- स्थायी समितीच्या मंजुरीपूर्वीच कामाला केली सुरुवात मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महापालिकेच्या केईएम, शीव,

New Syllabus : शैक्षणिक वर्ष २०२६ - २७ पासून दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावीसाठी नवा अभ्यासक्रम

मुंबई : इयत्ता दुसरी, तिसरी आणि चौथीच्या नवीन अभ्यासक्रम आराखड्याला मंजुरी दिल्यानंतर राज्य शिक्षण मंडळाच्या

Thorium : थोरियम आधारित अणुऊर्जा तंत्रज्ञान महाराष्ट्रासाठी ठरणार गेम चेंजर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; नाणार प्रकल्पामुळे महाराष्ट्र १० वर्षे पुढे गेला असता मुंबई : महाराष्ट्राच्या

Central Railway : मध्य रेल्वे कर्मचाऱ्यांच्या जलद कारवाईमुळे कल्याण स्टेशनवर जीव वाचला

 मुंबई :  मध्य रेल्वेच्या सतर्क स्टेशन कर्मचाऱ्यांनी आज कल्याण स्टेशनवर एका संभाव्य दुर्घटनेला यशस्वीरित्या

Divya Dakshin Yatra : IRCTC सोबत भारताच्या आध्यात्मिक वारशाचा अनुभव; भारत गौरव पर्यटन ट्रेन 26 मे 2026 रोजी नागपूरहून प्रस्थान करणार

मुंबई : Indian Railway Catering and Tourism Corporation (IRCTC) तर्फे 11 रात्री / 12 दिवसांची विशेष “दिव्य दक्षिण यात्रा” भारत गौरव पर्यटन ट्रेनद्वारे