Navapur Bird Flu : नवापूरमध्ये बर्ड फ्ल्यूचा प्रादुर्भाव; चार दिवसांत १.९३ लाख कोंबड्या नष्ट

नंदुरबार : जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात बर्ड फ्ल्यू (H5N1) चा प्रादुर्भाव गंभीर स्वरूप धारण करत असून कुक्कुटपालन व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. अवघ्या चार दिवसांत जवळपास १ लाख ९३ हजारांहून अधिक कोंबड्या, ८ लाखांपेक्षा जास्त अंडी आणि सुमारे २१ टन पशुखाद्य नष्ट करण्यात आले आहे.


काही दिवसांपूर्वी अचानक कोंबड्यांचा मृत्यू वाढल्याने पशुसंवर्धन विभाग सतर्क झाला. मृत पक्ष्यांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असता त्यात बर्ड फ्ल्यू विषाणूची (H5N1) पुष्टी झाली. त्यानंतर प्रशासनाने तातडीने नियंत्रणात्मक उपाययोजना राबवत बाधित क्षेत्रात कत्तल मोहीम सुरू केली.



या मोहिमेदरम्यान विविध पोल्ट्री फार्ममधील कोंबड्या, अंडी आणि पशुखाद्य मोठ्या प्रमाणावर नष्ट करण्यात आले. चौथ्या दिवशी मुजतबा आणि परवेज पोल्ट्री फार्ममध्येच ५६ हजारांहून अधिक पक्ष्यांचा नाश करण्यात आला.


नवापूर हा भाग कुक्कुटपालन व्यवसायासाठी ओळखला जातो. मात्र या प्रादुर्भावामुळे शेतकरी आणि व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून मोठ्या आर्थिक नुकसानीची शक्यता वर्तवली जात आहे.



प्रशासनाने बाधित परिसरात निर्बंध लागू केले असून पोल्ट्री उत्पादनांची वाहतूक व विक्रीवर नियंत्रण ठेवण्यात आले आहे. सध्या पशुसंवर्धन विभागाचे सुमारे ५० कर्मचारी आणि विशेष पथके परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कार्यरत आहेत.नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

Panic in Wardha : वर्ध्यात दहशत! १० गावांत हाय अलर्ट जारी; वनविभाग ॲक्शन मोडमध्ये

वर्धा: महाराष्ट्र आणि देशपातळीवर वन्यजीवांच्या वाढत्या वावरामुळे मानवी वस्त्यांवर आणि शेती परिसरांवर संकट

Nashik-Mumbai Highway : घोटी–सिन्नर फाटा उड्डाणपुलावर ट्रक दुभाजकाला धडकून उलटला अन्...महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

घोटी : नाशिक–मुंबई महामार्गावर (Nashik-Mumbai Highway) घोटी–सिन्नर (Ghoti Sinner) फाटा उड्डाणपुलावर आज एक भीषण अपघात घडला. विटांनी

Mumbai Pune Railway : घाटात दरड कोसळली तरी वाहतूक थांबणार नाही; मुंबई-पुणे रेल्वेप्रवास आता अधिक सुरक्षित, 'हा' मोठा बदल होणार!

मुंबई-पुणे रेल्वे प्रवाशांसाठी अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. पावसाळ्यात दरडी कोसळल्यामुळे होणारा

Ahilyanagar : नीट परीक्षेत कमी गुण मिळाले अन् विद्यार्थिनीने टोकाचे पाऊल उचलले ; सुसाईड नोटमध्ये लिहिलं आत्महत्येचं कारण

Ahilyanagar : नीट परीक्षेत अपेक्षित गुण न मिळाल्याच्या नैराश्यातून १९ वर्षीय विद्यार्थिनीने टोकाचे पाऊल उचलल्याची

BENDUR FESTIVAL : सर्जा-राजाप्रती कृतज्ञतेचा उत्सव; महाराष्ट्रातील पारंपरिक 'बेंदूर' सणाची परंपरा आणि महत्त्व

भारतीय संस्कृती ही कृषीसंस्कृतीवर आधारलेली असून, या मातीतील प्रत्येक सण-उत्सव हा थेट प्रकृती आणि

Shahapur Rain : शहापूरात पावसाचा कहर! हनुमान धबधब्यावर भीषण दुर्घटना; ५ पर्यटक वाहून गेले

शहापूर : ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात (Shahapur Rain) झालेल्या ढगफुटीसदृश मुसळधार पावसामुळे हनुमान धबधब्यावर मोठी