Navapur Bird Flu : नवापूरमध्ये बर्ड फ्ल्यूचा प्रादुर्भाव; चार दिवसांत १.९३ लाख कोंबड्या नष्ट

नंदुरबार : जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात बर्ड फ्ल्यू (H5N1) चा प्रादुर्भाव गंभीर स्वरूप धारण करत असून कुक्कुटपालन व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. अवघ्या चार दिवसांत जवळपास १ लाख ९३ हजारांहून अधिक कोंबड्या, ८ लाखांपेक्षा जास्त अंडी आणि सुमारे २१ टन पशुखाद्य नष्ट करण्यात आले आहे.


काही दिवसांपूर्वी अचानक कोंबड्यांचा मृत्यू वाढल्याने पशुसंवर्धन विभाग सतर्क झाला. मृत पक्ष्यांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असता त्यात बर्ड फ्ल्यू विषाणूची (H5N1) पुष्टी झाली. त्यानंतर प्रशासनाने तातडीने नियंत्रणात्मक उपाययोजना राबवत बाधित क्षेत्रात कत्तल मोहीम सुरू केली.



या मोहिमेदरम्यान विविध पोल्ट्री फार्ममधील कोंबड्या, अंडी आणि पशुखाद्य मोठ्या प्रमाणावर नष्ट करण्यात आले. चौथ्या दिवशी मुजतबा आणि परवेज पोल्ट्री फार्ममध्येच ५६ हजारांहून अधिक पक्ष्यांचा नाश करण्यात आला.


नवापूर हा भाग कुक्कुटपालन व्यवसायासाठी ओळखला जातो. मात्र या प्रादुर्भावामुळे शेतकरी आणि व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून मोठ्या आर्थिक नुकसानीची शक्यता वर्तवली जात आहे.



प्रशासनाने बाधित परिसरात निर्बंध लागू केले असून पोल्ट्री उत्पादनांची वाहतूक व विक्रीवर नियंत्रण ठेवण्यात आले आहे. सध्या पशुसंवर्धन विभागाचे सुमारे ५० कर्मचारी आणि विशेष पथके परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कार्यरत आहेत.नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

Maharashtra Heavy Rain : राज्यात पावसाचा कहर! १७ NDRF आणि 6 SDRF पथके तैनात; लोणावळ्यात तब्बल ६७० मिमी पावसाची नोंद

मुंबई : राज्यात मुसळधार पावसाचा जोर कायम असून काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची परिस्थिती निर्माण झाली आहे.

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या विशेष फेरीस ८ जुलैपर्यंत मुदतवाढ

मुंबई : राज्यातील काही भागांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात

इंद्रायणीच्या पुरामुळे आळंदीत वारकऱ्यांची गैरसोय; मुंबई डबेवाले करणार भोजन व निवासाची व्यवस्था

Mumbai  : खेड, मावळ, पिंपरी-चिंचवड आणि लोणावळा परिसरात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे

Heavy Rain in Mumbai Pune : पावसाचा कहर! मुंबई-ठाण्यासाठी ऑरेंज अलर्ट तर पुण्यात १२ जुलैपर्यंत शाळांना सुट्टी जाहीर

मुंबई : राज्यात मुसळधार पावसाचा जोर कायम असून भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबई आणि ठाणे जिल्ह्यांसाठी उद्या

Flood in Indrayani : इंद्रायणीला पूर; वारकऱ्यांसाठी सरकारचे महत्त्वाचे आवाहन! आळंदीत न जाण्याचे प्रशासनाचे आवाहन

पुणे : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यानिमित्त आळंदीकडे निघालेल्या वारकरी आणि भाविकांसाठी राज्य

TET Exam Paper Leak : टीईटी पेपरफुटी प्रकरणात मोठी घडामोड! चारही आरोपींना १८ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी

भिवंडी : राज्यभरात गाजत असलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणात मोठी घडामोड झाली