Nasrapur : नसरापूर घटनेतील पीडित चिमुकलीचा मृत्यू ॲस्फिस्कियामुळे; ॲस्फिस्किया म्हणजे नेमकं काय ?

पुणे : राज्याला हादरवणाऱ्या पुणे येथील नसरापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाचा शवविच्छेदन अहवाल समोर आला असून धक्कादायक माहिती उघड झाली आहे. पीडित मुलीचा मृत्यू हा ॲस्फिस्कियामुळे (Asphyxia) झाला असल्याची माहिती शवविच्छेदन अहवालातून समोर आली आहे. ससून रुग्णालयाने हा अहवाल पोलिसांकडे सोपवला आहे. तर याप्रकरणी तीन सरकारी वकिलांच्या नावांची शिफारस करण्यात आली आहे. आज (मंगळवार) संध्याकाळपर्यंत सरकारी वकिलांचं नाव जाहीर होण्याची शक्यता आहे. (Pune Nasrapur Case)


ॲस्फिस्किया म्हणजे काय?


ॲस्फिस्किया म्हणजे श्वास कोंडणं, याच कारणामुळे साडेतीन वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू झाला आहे. ॲस्फिस्किया (Asphyxia) म्हणजे शरीरातील ऑक्सिजनचा पुरवठा बंद होऊन श्वास घेण्याची प्रक्रिया बिघडणं. यामुळे मेंदू, इतर अवयवांना पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही, त्यामुळे व्यक्तीच्या जिवाला धोका निर्माण होतो. श्वासात अडथळा आल्याने किंवा ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाल्याने शरीरात ऑक्सिजनची तीव्र कमतरता निर्माण होऊन अनेकदा बेशुद्धी येते किंवा मृत्यू ओढावतो. (Pune Nasrapur Case)


दरम्यान, या प्रकरणात आरोपीने याआधी गुन्हा केल्याचं माहीत असूनही पोलिसांनी ही माहिती न्यायालयात न दिल्याने या घटनेची चौकशी महिला आयपीएस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली एसआयटी नेमून करावी, अशी मागणी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. या प्रकरणाचा जलदगतीने तपास करण्यासाठी पुणे ग्रामीण पोलीस दलाने सहा अधिकाऱ्यांचं पथक तयार केलं आहे. (Pune Nasrapur Case)


7 मे पर्यंत पोलीस कोठडी


पुण्यातील भोर तालुक्यातील नसरापूर परिसरात साडेतीन वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून तिचा निर्घृण खून करण्यात आल्याची घटना शुक्रवारी 1 मे रोजी उघडकीस आली. या प्रकरणात ६५ वर्षीय आरोपी भीमराव कांबळेला अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला 7 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Comments
Add Comment

Maharashtra Heavy Rain : राज्यात पावसाचा कहर! १७ NDRF आणि 6 SDRF पथके तैनात; लोणावळ्यात तब्बल ६७० मिमी पावसाची नोंद

मुंबई : राज्यात मुसळधार पावसाचा जोर कायम असून काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची परिस्थिती निर्माण झाली आहे.

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या विशेष फेरीस ८ जुलैपर्यंत मुदतवाढ

मुंबई : राज्यातील काही भागांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात

इंद्रायणीच्या पुरामुळे आळंदीत वारकऱ्यांची गैरसोय; मुंबई डबेवाले करणार भोजन व निवासाची व्यवस्था

Mumbai  : खेड, मावळ, पिंपरी-चिंचवड आणि लोणावळा परिसरात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे

Heavy Rain in Mumbai Pune : पावसाचा कहर! मुंबई-ठाण्यासाठी ऑरेंज अलर्ट तर पुण्यात १२ जुलैपर्यंत शाळांना सुट्टी जाहीर

मुंबई : राज्यात मुसळधार पावसाचा जोर कायम असून भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबई आणि ठाणे जिल्ह्यांसाठी उद्या

Flood in Indrayani : इंद्रायणीला पूर; वारकऱ्यांसाठी सरकारचे महत्त्वाचे आवाहन! आळंदीत न जाण्याचे प्रशासनाचे आवाहन

पुणे : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यानिमित्त आळंदीकडे निघालेल्या वारकरी आणि भाविकांसाठी राज्य

TET Exam Paper Leak : टीईटी पेपरफुटी प्रकरणात मोठी घडामोड! चारही आरोपींना १८ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी

भिवंडी : राज्यभरात गाजत असलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणात मोठी घडामोड झाली