Nasrapur : नसरापूर घटनेतील पीडित चिमुकलीचा मृत्यू ॲस्फिस्कियामुळे; ॲस्फिस्किया म्हणजे नेमकं काय ?

पुणे : राज्याला हादरवणाऱ्या पुणे येथील नसरापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाचा शवविच्छेदन अहवाल समोर आला असून धक्कादायक माहिती उघड झाली आहे. पीडित मुलीचा मृत्यू हा ॲस्फिस्कियामुळे (Asphyxia) झाला असल्याची माहिती शवविच्छेदन अहवालातून समोर आली आहे. ससून रुग्णालयाने हा अहवाल पोलिसांकडे सोपवला आहे. तर याप्रकरणी तीन सरकारी वकिलांच्या नावांची शिफारस करण्यात आली आहे. आज (मंगळवार) संध्याकाळपर्यंत सरकारी वकिलांचं नाव जाहीर होण्याची शक्यता आहे. (Pune Nasrapur Case)


ॲस्फिस्किया म्हणजे काय?


ॲस्फिस्किया म्हणजे श्वास कोंडणं, याच कारणामुळे साडेतीन वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू झाला आहे. ॲस्फिस्किया (Asphyxia) म्हणजे शरीरातील ऑक्सिजनचा पुरवठा बंद होऊन श्वास घेण्याची प्रक्रिया बिघडणं. यामुळे मेंदू, इतर अवयवांना पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही, त्यामुळे व्यक्तीच्या जिवाला धोका निर्माण होतो. श्वासात अडथळा आल्याने किंवा ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाल्याने शरीरात ऑक्सिजनची तीव्र कमतरता निर्माण होऊन अनेकदा बेशुद्धी येते किंवा मृत्यू ओढावतो. (Pune Nasrapur Case)


दरम्यान, या प्रकरणात आरोपीने याआधी गुन्हा केल्याचं माहीत असूनही पोलिसांनी ही माहिती न्यायालयात न दिल्याने या घटनेची चौकशी महिला आयपीएस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली एसआयटी नेमून करावी, अशी मागणी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. या प्रकरणाचा जलदगतीने तपास करण्यासाठी पुणे ग्रामीण पोलीस दलाने सहा अधिकाऱ्यांचं पथक तयार केलं आहे. (Pune Nasrapur Case)


7 मे पर्यंत पोलीस कोठडी


पुण्यातील भोर तालुक्यातील नसरापूर परिसरात साडेतीन वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून तिचा निर्घृण खून करण्यात आल्याची घटना शुक्रवारी 1 मे रोजी उघडकीस आली. या प्रकरणात ६५ वर्षीय आरोपी भीमराव कांबळेला अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला 7 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Comments
Add Comment

Mumbai Pune Railway : घाटात दरड कोसळली तरी वाहतूक थांबणार नाही; मुंबई-पुणे रेल्वेप्रवास आता अधिक सुरक्षित, 'हा' मोठा बदल होणार!

मुंबई-पुणे रेल्वे प्रवाशांसाठी अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. पावसाळ्यात दरडी कोसळल्यामुळे होणारा

Ahilyanagar : नीट परीक्षेत कमी गुण मिळाले अन् विद्यार्थिनीने टोकाचे पाऊल उचलले ; सुसाईड नोटमध्ये लिहिलं आत्महत्येचं कारण

Ahilyanagar : नीट परीक्षेत अपेक्षित गुण न मिळाल्याच्या नैराश्यातून १९ वर्षीय विद्यार्थिनीने टोकाचे पाऊल उचलल्याची

BENDUR FESTIVAL : सर्जा-राजाप्रती कृतज्ञतेचा उत्सव; महाराष्ट्रातील पारंपरिक 'बेंदूर' सणाची परंपरा आणि महत्त्व

भारतीय संस्कृती ही कृषीसंस्कृतीवर आधारलेली असून, या मातीतील प्रत्येक सण-उत्सव हा थेट प्रकृती आणि

Shahapur Rain : शहापूरात पावसाचा कहर! हनुमान धबधब्यावर भीषण दुर्घटना; ५ पर्यटक वाहून गेले

शहापूर : ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात (Shahapur Rain) झालेल्या ढगफुटीसदृश मुसळधार पावसामुळे हनुमान धबधब्यावर मोठी

Maharashtra Monsoon Weather : पावसाचा पुन्हा जोर! पुढील २४ तास अतिमहत्त्वाचे; महाराष्ट्रातील २२ जिल्ह्यांना हवामान खात्याचा इशारा

मुंबई : जुलैच्या अखेरच्या आठवड्यात महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाने जोरदार पुनरागमन केले आहे. उत्तर-पश्चिम

Dam Water Level : राज्यात ५६ टक्के उपयुक्त पाणीसाठा, मराठवाड्यात मात्र चिंता कायम

पुणे : जुलै महिन्यात झालेल्या समाधानकारक पावसामुळे राज्यातील धरणांमधील उपयुक्त पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली