Mamata Banerjee the 'jalmudi' of defeat : बंगालच्या जनतेने ममता बॅनर्जी यांना पराभवाची ‘झालमुडी’ खाऊ घातली

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा टोला; सुनेत्रा पवार यांच्या विक्रमी विजयाबद्दल केले अभिनंदन


मुंबई : “पश्चिम बंगाल आसाम आणि पुद्दुचेरीमधील विधानसभा निवडणुकीच्या निकालांनी देशाच्या राजकारणाला नवी दिशा दिली असून, हा भव्य विजय म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या विकासाभिमुख राजकारणावर जनतेने दिलेली पसंतीची पावती आहे”, अशी प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी सोमवारी दिली. पश्चिम बंगालमध्ये प्रथमच पूर्ण बहुमतासह कमळ फुलले असून, तेथील जनतेने ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या गुंडागर्दी आणि भ्रष्टाचाराला कंटाळून त्यांना पराभवाची 'झालमुडी' खाऊ घातल्याचा टोलाही त्यांनी लगावला.


">उपमुख्यमंत्री शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आता बंगालमध्ये 'डबल इंजिन' सरकारद्वारे विकासाचा नवा अध्याय लिहिला जाईल, असा विश्वास व्यक्त केला. ममता बॅनर्जी यांच्या सरकारविरुद्ध असलेला जनक्षोभ मतदानातून स्पष्ट झाला असून, 'सबका साथ, सबका विकास' या धोरणाला बंगालमध्ये व्यापक पाठिंबा मिळाला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या रणनीतीमुळेच ममता बॅनर्जींचा अभेद्य किल्ला ढासळला, तसेच तळागाळातील कार्यकर्त्यांची अथक मेहनत या ऐतिहासिक विजयामागे असल्याचे त्यांनी नमूद केले. डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या भूमीत मिळालेला हा विजय विचारांचा असून, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षातील ही यशस्वी कामगिरी विशेषत्वाची असल्याचे शिंदे म्हणाले.



स्टॅलिन यांचा पराभव केल्याबद्दल जनतेचे आभार

आसाममधील निकालांवर बोलताना ते म्हणाले की, आसाममध्ये सलग तिसऱ्यांदा भाजपला सत्ता देऊन जनतेने पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री डॉ. हिमंत बिस्वा सरमा यांच्या कार्यशैलीवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केले आहे. हा विजय विकास, स्थैर्य आणि पारदर्शक प्रशासनाला मिळालेली ठाम साथ आहे. यासोबतच, तामिळनाडूतील निकालांवर प्रतिक्रिया देताना एकनाथ शिंदे यांनी सनातन धर्मावर वादग्रस्त विधाने करणाऱ्या एम. के. स्टॅलिन यांचा पराभव केल्याबद्दल तेथील जनतेचे आभार मानले. लोकशाहीत जनताच सर्वोच्च असते, हे या निकालावरून स्पष्ट होत असल्याचे त्यांनी सांगितले.



अजित पवारांच्या विकासाभिमुख राजकारणाला कौल


बारामती विधानसभा मतदारसंघातून सुनेत्रा पवार यांनी मिळवलेल्या विक्रमी विजयाबद्दलही उपमुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले. बारामतीच्या जनतेने विकासाभिमुख राजकारणाला पाठिंबा देत अजित पवार यांच्या प्रगतिशील विचारांना कौल दिला आहे. देशभरात विकास आणि सुशासनाच्या मुद्द्यांवर आधारित राजकारण बळकट होत असून, आगामी काळात याचा सकारात्मक परिणाम देशाच्या प्रगतीवर दिसून येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Tags
west bengaljalmudi'electionresult2026bjpwins
Comments
Add Comment

Healthcare Services : आरोग्य सेवांच्या बळकटीकरणासाठी महाराष्ट्र जपानकडून घेणार ३ हजार ७०८ कोटींचे कर्ज

मुंबई : राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना परवडणाऱ्या दरात दर्जेदार वैद्यकीय सुविधा आणि उच्च दर्जाचे वैद्यकीय

विधान परिषदेच्या ९ उमेदवारांना बिनविरोध निवडीचे प्रमाणपत्र

मुंबई : विधान परिषदेच्या द्विवार्षिक निवडणुकीत विविध राजकीय पक्षांचे ९ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.

India and Japan Relations : अस्खलित हिंदी बोलणाऱ्या सातो हितोमी जपानच्या मुंबईतील वाणिज्यदूत; मराठी शिकणार असल्याची माहिती

सातो हतामी यांनी घेतली राज्यपालांची भेट; विद्यापीठ तसेच सांस्कृतिक स्तरावर सहकार्य वाढवण्यावर चर्चा मुंबई :

Mumbai : मुंबईत ड्युटी करणाऱ्या हवालदाराने टिटवाळ्यात केली आत्महत्या

Police Sucide News : मुंबईतील यलो गेट पोलीस ठाण्यात हवालदार म्हणून कार्यरत असलेल्या भाऊराव दगडू ढगे या ४२ वर्षीय पोलिसाने

Vijay Thalapathy : लाडक्या बहिणींना लग्नात मिळणार ८ ग्रॅम सोनं....

मुंबई : लाडक्या बहिणींसाठी सरकारने आणखी एक घोषणा केली आहे. एक आनंदाचा धक्का देणारी बातमी आपल्या लाडक्या

Narendra Modi : बंगाल, आसाम, पद्दुचेरीतील विजय हा मोदींवरील विश्वासाचा विजय

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; आज भाजप नव्हे, संपूर्ण भारत जिंकला मुंबई : पश्चिम बंगाल, आसाम, पद्दुचेरीमध्ये