नाशिक : सार्वजनिक रस्त्यावर लग्नसमारंभात वाहतूक कोंडी; 'या' नगरसेविकेसह एकावर गुन्हा दाखल

नाशिक : कामटवाडे परिसरात लग्नसमारंभादरम्यान सार्वजनिक रस्त्यावर अडथळा निर्माण करून वाहतुकीत कोंडी केल्याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात नगरसेविका सुवर्णा मटाले यांच्यासह एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे,पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २ मे रोजी रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास गजलक्ष्मी रो हाऊस, वृंदावननगर, कामटवाडे येथे लग्नसमारंभ सुरू असताना सार्वजनिक रस्त्यावर मंडप उभारण्यात आला होता. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला.(Nashik Crime News)


या प्रकरणी पोलीस कर्मचारी नितीनकुमार पाटील यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, लग्नसमारंभाचे आयोजक दादाजी नामदेव भामरे (वय ६८, रा. वृंदावननगर, कामटवाडे) तसेच नगरसेविका सुवर्णा मटाले यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.असून अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्रसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक संतोष सगंम अधिक तपास करीत आहेत.(Nashik Crime News)


तर दुसरीकडे मित्राची माहिती विचारण्याच्या कारणातून तरुणाचे अपहरण करीत फायटरने मारहाण केल्याची घटना अंबड (Ambad) परिसरात घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात चौघांसह अन्य साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत हुमेर हुसेन शेख (वय २२, रा. स्कायलार्क अपार्टमेंट, मदीना नगर, वडाळागाव, नाशिक) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे फिरदोस कॉलनी, अंबड येथे नमाज पठणासाठी गेले होते. नमाजानंतर सोहेल नावाच्या युवकाने त्यांना थांबवून हाशिम खान याच्याशी व्हिडीओ कॉलवर बोलणे करून दिले. त्यानंतर हाशिमने फिर्यादीला फोन करून भेटण्यास बोलावले. सुरुवातीला फिर्यादीने नकार दिला असता “मला फक्त बोलायचे आहे,” असे सांगून अंबड लिंक रोडलगतच्या मदरशाजवळ बोलावण्यात आले.(Nashik Crime News)


फिर्यादी व त्यांचा मित्र अमजद शहा तेथे गेल्यानंतर दोन-तीन युवकांनी फिर्यादीला अडवून चाकूचा धाक दाखवत जबरदस्तीने काळ्या रंगाच्या कारमध्ये बसविले. त्यानंतर त्यांना खाडी परिसरातील एका मोकळ्या जागी नेण्यात आले. तेथे हाशिम, कैफ, फरहान व अन्य साथीदार उपस्थित होते. त्यांनी “गयास कुठे आहे?” अशी विचारणा करत शिवीगाळ व मारहाण सुरू केली. फिर्यादीने माहिती नसल्याचे सांगितल्यावर आरोपींनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

Comments
Add Comment

Farmer loan waive : कर्जमाफी अन् अनुदानातील अडथळे दूर होणार; संबंधित विभागांना तातडीने बैठकांचे आदेश

मुंबई : राज्यातील शेतकरी कर्जमाफी (Farmer loan waive), प्रोत्साहन अनुदान आणि ओटीएस (वन टाईम सेटलमेंट) योजनांच्या

Raigad Fort : दरड कोसळल्याने रायगड किल्ल्याचा पायरी मार्ग २५ जूनपर्यंत बंद

रायगड : अतिवृष्टीमुळे किल्ले रायगडावरील (Raigad Fort) महादरवाजा परिसरात दरड कोसळल्याने किल्ल्यावर जाणारा पायरी मार्ग

Maharashtra wedding card new rule : लग्न ठरलंय? मग हा नवा नियम जाणून घ्या; पत्रिकेत द्यावी लागणार 'ही' महत्त्वाची माहिती

बालविवाह रोखण्यासाठी सरकारचा नवा फॉर्म्युला; लग्नपत्रिकेत होणार मोठा बदल महाराष्ट्रात बालविवाह (Child Marriage)

Vishawas Nangare Patil : नागपूरच्या पोलीस दलात मोठे बदल; विश्वास नांगरे पाटील नवे CP

नागपूर : महाराष्ट्र पोलीस (Maharashtra Police) दलात महत्त्वाच्या बदलांची घोषणा करण्यात आली असून वरिष्ठ आयपीएस (IPS) अधिकारी

Kolhapur Shaken : माजी महापौरांच्या १७ वर्षीय नातवाची आत्महत्या; परिसरात शोककळा

कोल्हापूर: कोल्हापुरातील जुना बुधवार पेठ, सोन्या मारुती चौक परिसरात एका १७ वर्षीय महाविद्यालयीन तरुणाने

Weather Update : महाराष्ट्रासाठी पुढचे २४ तास महत्त्वाचे ! राज्यातील 3० जिल्ह्यांना यलो अलर्ट; लवकरच मान्सूनचे आगमन होणार ?

Mumbai : मुंबईसह राज्यातील काही भागात मंगळवारी (२३ जून ) ला पावसानी हजेरी लावली. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या