मुंबई आणि लखनौऊ हे दोन्ही संघ यंधाच्या हंगामात अपेक्षीत प्रमाणे कामगिरी करु शकले नाही. गुणवतलिकेत मुंबई आठ तर लखनौऊ दहव्या स्थानावर आहे.यामुळेच हा सामना दोघांसठी महत्त्वाचा ठरणार आहे.आजचा सामना दोघांनसाठी आपली गमवलेली लय पुन्हा मिळवण्याची संधी आहे.
हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात मुंबई ने आता पर्यंत ९ सामने खेळली आहे.यात मुंबईने ७ सामने गमावले आहेत आणि २ सामने जिंकत ४ गुणांसह नव्या स्थानावर आहे.मुंबईसाठी या हंगामात रायन रिकलेटने सर्वाधिक धावा केल्या आहेत.त्यांने सहा सामन्यात २६० धावा केल्या आहे. हैदराबादच्या विरुद्धची त्याची १२३ धावांची त्याची खेळी आता पर्यंतची सर्वोत्तम खेळी आहे. गोलंदाजीत अल्लाह मोहम्मद गझनफर यांने सात सामन्यात सर्वाधिक ११ विकट्स घेतले आहे .
ऋषभ पंतच्या नेतृत्वात लखनोऊने ८ पैकी फक्त २ सामने जिंकले आणि ६ सामने गमवले आहेत,यामुळे लखनौऊ गुणवतालिकेत तळशी आहे. लखनौऊसाठी मिचेल मार्श ने सर्वाधिक ८ सामन्यात २१२ धावा केल्या आहेत. भारतीय युवा गोलंदाज प्रिनस यादवने सर्वाधिक ८ सामन्यात १३ बळी घेतले आहेत.
हेड टु हेड
आयपीएल मध्ये मुंबई आणि लखनाऊ यांच्यात आता पर्यंत आठ सामने झाले आहेत. यात मुंबई ने दोन सामने तर लखनाऊने सहा सामने जिंकले आहेत.यामुळे आजच्या सामन्यात लखनाऊच्या विजयाची शक्यत जास्त मानली जात आहे.
कशी असेल खेळपट्टी ?
वानखेडे स्टेडियमची खेळपट्टी सामान्यतः फलंदाजांसाठी अनुकूल मानली जाते. यंदाच्या हंगामात येथे आतापर्यंत 5 सामने झाले असून त्यापैकी 3 सामने लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघांनी जिंकले आहेत, तर 2 सामने प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघांनी जिंकले आहेत. आजचा सामना पिच क्रमांक 4 वर खेळवला जाणार असून या पिचवर यापूर्वी झालेल्या सामन्यात पंजाब किंग्सने 195 धावांचे लक्ष्य सहज गाठले होते. त्यामुळे आजही उच्च धावसंख्येचा सामना पाहायला मिळण्याची शक्यता आहे.