Assam : आसामध्ये भाजपची हॅटट्रिक, एकहाती विजय

नवी दिल्ली : आसामच्या विधानसभा निवडणुकीत भाजपची एकहाती सत्ता येत असल्याचे चित्र आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार आसामच्या १२६ जागांच्या विधानसभेत भारतीय जनता पार्टी ७९ जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेस २४ जागांवर आघाडीवर आहे. बीओपीएफ १०, एजीपी ९ आणि एआययूडीएफ २ जागांवर आघाडीवर आहे. आतापर्यंत १२४ जागांचे आकडे हाती आले असून भाजपची सलग तिसऱ्यांदा सत्ता येत असल्याचे दिसत आहे.



मागच्यावेळी भाजपने ६० जागा जिंकून युतीच्या जोरावर सत्ता मिळवली होती. यावेळी भाजपची एकहातीच सत्ता येताना दिसत आहे.



ईशान्य भारताचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आसाममध्ये एकाच टप्प्यात ८० टक्के मतदान झाले होते. नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीझन्स (NRC) आणि नागरिकत्व दुरुस्ती कायदा (CAA) यांसारख्या मुद्द्यांमुळे आसामची निवडणूक गाजली. आसाममध्ये १२६ जागांच्या विधानसभेत ६४ जागा हा बहुमताचा आकडा आहे. सद्यस्थितीत हिमंता बिस्वा सरमा यांच्या नेतृत्वाखाली भाजप सत्तेत आहे. त्यांच्यासमोर काँग्रेसने महाआघाडी करून आव्हान उभे करण्याचा प्रयत्न केला. पण हा प्रयत्न अयशस्वी झाला. भाजप सलग तिसऱ्यांदा सत्तेत येताना दिसत आहे.

Comments
Add Comment

India Women won : दीप्तीची कमाल, वर्ल्डकपमध्ये पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात भारताचा दणदणीत विजय

बर्मिंगहॅम : अष्टपैलू खेळाडू दीप्ती शर्माच्या फिरकीची जादू आणि उपकर्णधार स्मृती मानधनाच्या झंझावाती

Madhya Pradesh : अफवा पसरली आणि रेल्वे रुळावर मोठी दुर्घटना झाली

मोरेना : मध्य प्रदेशमधील मोरेना जिल्ह्यातील हेतमपूर - घेर विभागाजवळ अफवा पसरल्यामुळे रेल्वे रुळावर मोठी

Metro : मेट्रो-४ मोगरपाडा कारडेपो मार्गासाठीचा मार्ग मोकळा

मुंबई : मुंबई मेट्रो-४ आणि ४ए वडाळा-मुलुंड-ठाणे-कासारवडवली-गायमुख या महत्त्वाकांक्षी मेट्रो प्रकल्पासाठी ठाणे

Narendra Modi : नाविन्यता भारताच्या डीएनएमध्येच

फ्रान्समधील 'भारत इनोव्ह्हेट्स' सोहळ्यात पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन नाईस (फ्रान्स) : भारताच्या तरुणांची

Mohan Bhagvat : आपण हिटलर नाही, संवादाचे मार्ग खुले ठेवले पाहिजेत

दत्तात्रेय होसबळेंच्या विधानाला मोहन भागवत यांचे समर्थन तिरुवनंतपुरम : पाकिस्तानशी संवादाची दारे खुली ठेवली

Nitesh Rane : ऐतिहासिक सावंतवाडी शहर आंतरराष्ट्रीय स्तरावर नेणार : मंत्री नितेश राणे

सावंतवाडी : ऐतिहासिक मोती तलावाच्या काठावर वसलेले हे संस्थान कालीन शहर आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी माझे