Assam : आसामध्ये भाजपची हॅटट्रिक, एकहाती विजय

नवी दिल्ली : आसामच्या विधानसभा निवडणुकीत भाजपची एकहाती सत्ता येत असल्याचे चित्र आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार आसामच्या १२६ जागांच्या विधानसभेत भारतीय जनता पार्टी ७९ जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेस २४ जागांवर आघाडीवर आहे. बीओपीएफ १०, एजीपी ९ आणि एआययूडीएफ २ जागांवर आघाडीवर आहे. आतापर्यंत १२४ जागांचे आकडे हाती आले असून भाजपची सलग तिसऱ्यांदा सत्ता येत असल्याचे दिसत आहे.



मागच्यावेळी भाजपने ६० जागा जिंकून युतीच्या जोरावर सत्ता मिळवली होती. यावेळी भाजपची एकहातीच सत्ता येताना दिसत आहे.



ईशान्य भारताचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आसाममध्ये एकाच टप्प्यात ८० टक्के मतदान झाले होते. नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीझन्स (NRC) आणि नागरिकत्व दुरुस्ती कायदा (CAA) यांसारख्या मुद्द्यांमुळे आसामची निवडणूक गाजली. आसाममध्ये १२६ जागांच्या विधानसभेत ६४ जागा हा बहुमताचा आकडा आहे. सद्यस्थितीत हिमंता बिस्वा सरमा यांच्या नेतृत्वाखाली भाजप सत्तेत आहे. त्यांच्यासमोर काँग्रेसने महाआघाडी करून आव्हान उभे करण्याचा प्रयत्न केला. पण हा प्रयत्न अयशस्वी झाला. भाजप सलग तिसऱ्यांदा सत्तेत येताना दिसत आहे.

Comments
Add Comment

Karnataka Accident News : शिंपले गोळा करताना काळाचा घाला; एकाच कुटुंबातील १० जणांचा खाडीत बुडून मृत्यू

कर्नाटक : कर्नाटकातील कारवार जिल्ह्यातील भटकळ तालुक्यात रविवारी सकाळी एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली. शिराळी

Share Market News : सुरुवातीच्या व्यवहारात शेअर बाजारात तेजी, नफावसुली होऊनही सेन्सेक्स-निफ्टी मजबूत

नवी दिल्ली : सकारात्मक जागतिक संकेतांमुळे आज सुरुवातीच्या व्यवहारात शेअर बाजारात तेजी दिसून येत आहे. अमेरिका

Nashik : TCS प्रकरणात मोठा ट्विस्ट! निदा खानच्या बाजूने थेट... महत्त्वाची माहिती समोर

Nashik : TCS प्रकरण रोज नवीन वळण घेत आहे. या प्रकरणात संशयित आरोपींचा जेवढा विरोध होत आहे तितकाच संशयितांना पाठिंबा

Twisha Sharma Case : “समाज काय म्हणेल?”च्या भीतीने गमावला जीव? आज सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी

नवी दिल्ली : देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या ट्विशा शर्मा (Twisha Sharma Case) मृत्यू प्रकरणावर आज म्हणजेच सोमवार २५ मे रोजी

Congress News : काँग्रेसचे चंद्रपुरातील ३९ हून अधिक नगरसेवक 'नॉट रिचेबल'

- विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग मुंबई : १८ जून रोजी होणाऱ्या वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली

IPPA : पोस्ट प्रॉडक्शन क्षेत्रातील कलाकारांना “कलाकाराचा दर्जा” द्यावा – IPPA ची शासनाकडे मागणी

मुंबई : चित्रपट, मालिका, जाहिराती, वेब सिरीज तसेच डिजिटल माध्यमांच्या निर्मितीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका