Metro Line 4 : मुंबई मेट्रो लाईन ४ अपघातांबाबतचे चौकशी अहवाल सार्वजनिक करा - मुलुंड भाजप आमदार मिहिर कोटेचा

आमदार मिहिर कोटेचा यांचे एमएमआरडीए आयुक्त संजय मुखर्जी यांना पत्र


मुलुंडमधील प्रकल्पात वारंवार सुरक्षा त्रुटी गंभीर — आमदार मिहिर कोटेचा


दोषींवर कठोर कारवाईची केली जावी — आमदार कोटेचा


मुंबई: धावत्या कारवर लाकडी फळी कोसळल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर मुलुंडचे भाजप आमदार मिहिर कोटेचा यांनी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला पत्र लिहून तात्काळ चौकशी करण्याची तसेच दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. यासोबतच पॅरापेट भिंत कोसळल्याच्या आधीच्या घटनेच्या चौकशी अहवालाची प्रत सार्वजनिक करण्याचीही त्यांनी मागणी केली आहे.


एमएमआरडीए चे आयुक्त संजय मुखर्जी यांना पाठवलेल्या पत्रात कोटेचा यांनी मुलुंड पश्चिम येथील लाल बहादूर शास्त्री मार्गावर सुरू असलेल्या मुंबई मेट्रो लाईन ४ प्रकल्पस्थळी वारंवार होणाऱ्या सुरक्षा त्रुटींचा मुद्दा उपस्थित केला. एकाच ठिकाणी अशा घटना पुन्हा पुन्हा घडत असल्याने ही गंभीर बाब असल्याचे त्यांनी नमूद केले.


आमदार कोटेचा यांनी पुढे सांगितले की, सुमारे दोन महिन्यांपूर्वी याच ठिकाणी पॅरापेट भिंतीचा एक भाग कोसळून एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता, तर तिघेजण जखमी झाले होते. सोमवारी सकाळी त्याच ठिकाणापासून अवघ्या १० मीटर अंतरावर आणखी एक घटना घडली. त्यात लाकडी फळी धावत्या कारवर कोसळली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी अशा घटना पुन्हा घडत असल्याने गंभीर निष्काळजीपणा आणि सुरक्षा नियमांचे पालन होत नसल्याचे स्पष्ट असल्याचे त्यांनी म्हटले आहे.


या वारंवार घडणाऱ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर लाकडी फळी कोसळल्याच्या घटनेची तात्काळ चौकशी करण्यात यावी, तसेच पॅरापेट भिंत कोसळल्याच्या आधीच्या चौकशी अहवालाची प्रत देण्यात यावी, अशी मागणी कोटेचा यांनी केली. त्यांनी मिलान बिल्डटेक एलएलसी यांना दिलेला करार रद्द करण्याची आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीचा पुनरुच्चार केला.


नागरिकांची सुरक्षितता ही सर्वोच्च प्राधान्य असली पाहिजे. अशा प्रकारच्या वारंवार होणाऱ्या सुरक्षा त्रुटी सहन केल्या जाणार नाहीत. जनतेचा विश्वास परत मिळवण्यासाठी आणि अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी एमएमआरडीएने तात्काळ पावले उचलावीत, असेही त्यांनी म्हटले.

Comments
Add Comment

Kapil Sharma Cafe : कपिल शर्माच्या कॅनडातील ‘कॅप्स कॅफे’जवळ पुन्हा गोळीबार; बिश्नोई टोळीने स्वीकारली जबाबदारी

मुंबई : एकदा पुन्हा कॉमेडियन कपिल शर्मा यांच्या कॅनडातील रेस्टॉरंट ‘कॅप्स कॅफे’ जवळ गोळीबार झाल्याची घटना समोर

Women's T20 World Cup : मुंबई महिला लीगचे पहिल्यांदाच आयोजन; इरा जाधव सर्वात महागडी क्रिकेटपटू

मुंबई : आयपीएल २०२६ हंगामादरम्यान टी२० मुंबई लीगचा लिलाव पार पडला. पुरुष क्रिकेटपटूंबरोबरच, फ्रँचायझींनी महिला

Casting Yard Accident : दहिसर - भाईंदर जोड मार्ग कास्टिंग यार्ड दुर्घटना, VJTI मार्फत चौकशी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : दहिसर - भाईंदर जोड मार्ग कास्टिंग यार्ड येथे आज प्लॅटफॉर्म कोसळून दोन कामगारांचा मृत्यू

Nails Free Tree : मुंबईतील १०७१ झाडे काँक्रीटमुक्त, झाडांवरील ५० किलो खिळ्यांच्या वेदनांचा भार केला हलका

मुंबई (विशेष प्रतिनिधी ) : शहरातील पर्यावरण संवर्धनासाठी राबवण्यात आलेल्या विशेष मोहिमेत मोठे यश मिळत असून, वृक्ष

Rahul Narvekar : शिक्षक केवळ वाचायला शिकवत नाही, तर समाज घडवतो आणि वाचवतो" - राहुल नार्वेकर यांचे गौरवोद्गार

मुंबई : "शिक्षक हा केवळ अक्षरांची ओळख करून देणारा घटक नाही, तर तो खऱ्या अर्थाने समाज घडवणारा आणि संकटाच्या काळात

Mohan Bhagwat : अस्थिर जगाचा आधार केवळ भारतच; पण त्यासाठी शेवटच्या घटकाचा विकास हवा" – डॉ. मोहन भागवत

आदिवासी अस्मिता हीच देशाची ओळख"; कर्मयोगी एकल शिक्षक मेळाव्यात डॉ. मोहन भागवत यांचे प्रेरक उद्गार सत्ता नव्हे, तर