Nails Free Tree : मुंबईतील १०७१ झाडे काँक्रीटमुक्त, झाडांवरील ५० किलो खिळ्यांच्या वेदनांचा भार केला हलका

मुंबई (विशेष प्रतिनिधी ) : शहरातील पर्यावरण संवर्धनासाठी राबवण्यात आलेल्या विशेष मोहिमेत मोठे यश मिळत असून, वृक्ष संजीवनी अभियान अंतर्गत मुंबईतील तब्बल १०७१ झाडांना काँक्रीटच्या विळख्यातून मुक्त करण्यात आले आहे. झाडांच्या बुंध्याभोवती अनेक वर्षांपासून असलेले सिमेंट-काँक्रीट काढून टाकल्यामुळे या झाडांना पुन्हा नैसर्गिकरीत्या पाणी व पोषकद्रव्ये शोषण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे आता या झाडांना आता मोकळा श्वास घेता येणार आहे.


मुंबई महापालिकेच्या उद्यान विभागाच्या वतीने वृक्ष संजीवनी अभियान हाती घेण्यात आले आहे. मागील एक ते तीस एप्रिल २०२६ या कालावधीत झाडांच्या मुळावरील सिमेंट काँक्रिटचा थर, झाडांना ठोकलेले खिळे, वायर, पोस्टर हटवण्याची मोहीम हाती घेण्यात आली होती. झाडांच्या खोडांमध्ये जाहिराती, बॅनर्स आणि केबल्स लावण्यासाठी ठोकण्यात आलेले तब्बल ४,२४० खिळे काढून टाकण्यात आले. या खिळ्यांचे आणि केबल्सचे एकत्रित वजन ५० किलोपेक्षा अधिक असल्याचे समोर आले. खिळ्यांमुळे झाडांना होणारी जखम, संसर्ग आणि हानी टाळण्यासाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरला आहे.


याशिवाय, झाडांचे विद्रुपीकरण रोखण्यासाठी १,१०२ पोस्टर्स हटवण्यात आले. झाडांवर अनधिकृतरित्या लावण्यात आलेल्या पोस्टर्समुळे केवळ सौंदर्यच नाही, तर झाडांच्या खोड आणि सालीलाही नुकसान होत होते. या स्वच्छता मोहिमेमुळे शहरातील रस्त्यांचे सौंदर्यही अधिक खुलले आहे.


मुंबईतील तब्बल १०७१ झाडांना काँक्रीटच्या विळख्यातून मुक्त करण्यात आले आहे. झाडांच्या बुंध्याभोवती अनेक वर्षांपासून असलेले सिमेंट-काँक्रीटचा थर काढून टाकल्यामुळे या झाडांना पुन्हा नैसर्गिकरीत्या पाणी व पोषकद्रव्ये शोषण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तज्ज्ञांच्या मते, अशा प्रकारे काँक्रीटमुळे झाडांच्या मुळांना हवा व पाणी मिळत नसल्याने त्यांची वाढ खुंटते आणि झाडे कमकुवत होतात. या मोहिमेमुळे झाडांच्या आरोग्यात सकारात्मक बदल अपेक्षित आहे.


या संपूर्ण उपक्रमात ४१४ विद्यार्थी, स्वयंसेवक आणि पर्यावरणप्रेमी नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. त्यांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे शहरातील हरित संपत्तीचे जतन करण्यात मोठे यश मिळाले आहे. या मोहिमेमुळे नागरिकांमध्ये पर्यावरणाबाबत जागरूकता वाढली असून, भविष्यातही अशा उपक्रमांची गरज अधोरेखित झाली आहे.

Comments
Add Comment

Devendra Fadnavis : मी राज्यात समाधानी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

दिल्लीत जाण्याच्या चर्चांवर भाष्य; संत तुकारामांच्या अभंगाचा संदर्भ देत या चर्चांना पूर्णविराम मुंबई :

Maharashtra News : राज्यातील निम्म्याहून अधिक धरणे भरली

५३.३८ टक्के पाणीसाठा; मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम मुंबई : राज्यातील विविध

Mumbai Environment : तरंगता कचरा रोखण्यासाठी मालाडमध्ये 'द ओशन क्लीनअप' इंटरसेप्टर पायलट प्रकल्प कार्यान्वित

तरंगता कचरा संकलन प्रकल्प पाहणीसाठी तेजिंदर सिंग तिवाना उतरले नदीपात्रात! मुंबई : मालाड खाडीमध्ये जागतिक

MUMBAI-PUNE WATER LEVEL : मुंबई आणि पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली; दोन्ही शहरांच्या धरणांमध्ये जोरदार जलसाठा जमा!

मुंबई: महाराष्ट्रासाठी आणि विशेषतः मुंबई व पुणेकरांसाठी एक अतिशय दिलासादायक बातमी समोर आली आहे. यावर्षी

BHARAT TAXI : मुंबई आणि पुणेकरांसाठी 'भारत टॅक्सी' सेवा सुरू; ट्रॅफिक असो किंवा पाऊस, भाडे राहणार निश्चित!

मुंबई: कॅब चालकांची भाडे नाकारण्याची कटकट, पीक अवर्समधील अव्वाच्या सव्वा दर आणि ट्रॅफिक किंवा पावसात होणारी

Mumbai Rain : मुंबईत वर्षभराच्या तुलनेत सरासरी ७६ टक्के पडला पाऊस

मुंबई : मुंबईत (Mumbai) आतापर्यंत वर्षभराच्या तुलनेत सरासरी ७५ ते ७६ टक्के एवढ्या पावसाची (Rain) नोंद झाल्याची आकडेवारी