शेतजमिनीवरून वाद होत आहे ? मग सरकारची 'ही' खास योजना जाणून घ्या आणि लाखो रुपये वाचवा

Government scheme : शेतजमिनीचा वाद हा आज अनके कुटुंबात पहायला मिळत आहे. शेतजमिनीचा ताबा आणि वहिवाटीवरून होणारे पिढ्यानपिढ्यांचे वाद आता मिटणार आहेत. कारण सरकारने यासाठी आता एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. राज्यातील शेतकरी (State Govt) बांधवांसाठी ही एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. कारण, राज्य सरकारने अत्यंत गाजलेल्या अशा 'सलोखा योजनेला' मुदतवाढ दिली आहे. आता 1 जानेवारी 2027 पर्यंत सलोखा योजनेला मुदतवाढ असणार आहे. नेमकी ही योजना काय आणि या योजनेचे फायदे काय याबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊयात.


राज्यातील शेतकऱ्यांसाठी जिव्हाळ्याचा विषय म्हणजे शेतजमीन. कारण ती पोट भरते. आर्थिकदृष्ट्या बळ देते. पण याच जमिनीमुळे कित्येक भावांमध्ये वाद झाले आहेत. एका शेतकऱ्याची जमीन दुसऱ्याच्या नावावर असते आणि दुसऱ्याची पहिल्याच्या ताब्यात असते. ताबा असूनही नावावर जमीन नसल्यामुळं बँकेचं कर्ज काढताना किंवा सरकारी योजनेचा लाभ घेताना शेतकऱ्यांची मोठी अडचण निर्माण होते. मात्र, यावर तोडगा म्हणून सरकारने 'सलोखा योजना' आणली होती. आता या योजनेला मुदतवाढ मिळाल्यानं शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.


योजनेचा नेमका फायदा आहे तरी काय ?


जमिनीचा वाद कायदेशीर पद्धतीने लढायला गेलं तर मोठा खर्च येतो. तर जमिनीची कायदेशीर अदलाबदल करण्यासाठी आता लाखो रुपये खर्च करण्याची गरज नाही. फक्त 1000 रुपये नोंदणी शुल्क आणि 1000 रुपये मुद्रांक शुल्क अशा एकूण 2000 रुपयांत जमिनीचा फेरफार होईल. बाजारभावाप्रमाणे लागणारे लाखो रुपयांचे स्टॅम्प ड्युटी (Stamp duty ) आता वाचणार आहेत.


सलोखा योजनेसाठी काही महत्त्वाच्या अटी


सलोखा योजनेचा लाभ घेण्यासाठी काही महत्त्वाच्या अटी सुद्धा आहेत. ज्या जमिनीची अदलाबदल करायची आहे, ती जमीन किमान 12 वर्षांपासून एकमेकांच्या ताब्यात असणं गरजेचं आहे. ही योजना फक्त शेतीसाठीच लागू असून प्लॉट किंवा घरांसाठी ही सवलत मिळणार नाही. विशेष म्हणजे, जमिनीची अदलाबदल करताना 'तुकडेबंदी' कायद्याचा अडथळा आता येणार नाही, ही शेतकऱ्यांसाठी सगळ्यात मोठी जमेची बाजू आहे.


महत्त्वाच्या अटी काय?


दोन्ही शेतकऱ्यांची जमिनीच्या अदलाबदलीसाठी लेखी संमती असावी. जमीन शेती गटातील असावी, अकृषिक (NA) नसावी, जमिनीचा ताबा किमान 12 वर्षांपासून असणे महत्त्वाचे आहे.

Comments
Add Comment

Shahapur Rain : शहापूरात पावसाचा कहर! हनुमान धबधब्यावर भीषण दुर्घटना; ५ पर्यटक वाहून गेले

शहापूर : ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात (Shahapur Rain) झालेल्या ढगफुटीसदृश मुसळधार पावसामुळे हनुमान धबधब्यावर मोठी

Mobile Price Hike : मोबाईल खरेदी महाग का पडतेय? स्मार्टफोनच्या वाढत्या किमतीमागची ५ मोठी कारणे

मुंबई : नवीन स्मार्टफोन (Smartphone) खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर वाढलेल्या किमती पाहून तुम्हालाही धक्का बसू शकतो.

Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशीचा आणखी एक ऐतिहासिक विक्रम! २२ दिवसांतच सचिनचा ३४ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला

मुंबई : भारतीय क्रिकेटचा नवा सुपरस्टार ठरत असलेल्या वैभव सूर्यवंशीने (Vaibhav Suryavanshi) आणखी एक ऐतिहासिक पराक्रम आपल्या

Indian Idol 16 : ज्योतिर्मयी नायक ठरली इंडियन आयडल 16 ची विजेती!

मुंबई : लोकप्रिय गायन रिअॅलिटी शो (Reality Show) 'इंडियन आयडल १६' (Indian Idol 16) ला अखेर विजेती (Winner) मिळाली आहे. तब्बल १० महिन्यांच्या

Kushal Badrike In MHJ : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'त कुशल बद्रिकेची धमाकेदार एन्ट्री; दत्तू मोरेसोबत रंगणार हसण्याचा डबल डोस!

मुंबई : मराठी प्रेक्षकांचा लाडका विनोदवीर कुशल बद्रिके पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर हास्याचा जल्लोष घेऊन येत

NTA : पेपरफुटीवर केंद्राचा 'मास्टरप्लॅन'! NTA साठी 'सुपर 6' समितीची नियुक्ती

पेपर लीकवर केंद्राचा मोठा प्रहार! दोषींना १० वर्षांपर्यंत तुरुंगवास, ₹१० कोटींपर्यंत दंड; संसदेत सोमवारी