Bacchu Kadu, Nilam Gorhe : अखेर विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवार झाले जाहीर; शिवसेनेच्या या नेत्यांना मिळणार उमेदवारी

मुंबई : महाराष्ट्रात विधानपरिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. अशातच या निवडणुकीसाठी बच्चू कडू यांचा पक्ष शिवसेनेत पक्षप्रवेश झाला असून शिवसेनेचे विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवार ठरले असल्याची माहिती समोर आली आहे. काही वेळातच उमेदवार अर्ज भरले देखील जाण्याची माहिती समोर आली आहे.


बच्चू कडू आणि नीलम गोऱ्हे यांना शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज मिळणार आहे. तर गेल्या २४ तासात झालेली चर्चा आणि समोर ठेवलेल्या मागण्या पूर्ण करण्याचे मान्य केल्यानंतर आज बच्चू कडू यांनी शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला आहे. शिवसेनेकडून पक्षप्रवेश होताच उमेदवारांची नावे जाहीर झाली. शिवसेनेकडून आधी पासून नीलम गोऱ्हे याच्या नावाची चर्चा रंगली होती.
बच्चू कडू यांचा पक्षप्रवेश झाल्यानंतर बच्चू कडू यांच्या नावावर देखील शिक्कामोर्तब झाले.



महायुती आणि महाविकास आघाडी यांनी जाहीर केली उमेदवार यादी जाहीर.


भाजप


१. सुनील कर्जतकर
२. माधवी नाईक
३. संजय भेंडे
४. विवेक कोल्हे
५. प्रमोद जठार
६. प्रज्ञा सातव


राष्ट्रवादी काँग्रेस


७. झिशान सिद्दीकी


शिवसेना


१. नीलम गोऱ्हे
२. बच्चू कडू


महाविकास आघाडी


१०. अंबादास दानवे उबाठा



तर काँग्रेस माघार घेणार


विधान परिषद आणि राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसला जागा सोडावी अशी अट असण्याची शक्यता असल्याने, या अटीनुसार काँग्रेस माघार घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिवाय उबाठाने अट मान्य केल्यास काँग्रेस या निवडणुकीतून बाहेर पडण्याची शक्यता आहे.



विधान परिषदेचा संपूर्ण निवडणुकीचा कार्यक्रम


निवडणुकीची अधिसूचना जारी करणे: २३ एप्रिल २०२६


उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस : ३०० एप्रिल २०२६


उमेदवारी अर्जाची छाननी: २ मे २०२६


उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख : ४ मे २०२६


मतदानाची तारीख : १२ मे २०२६


मतदानाची वेळ : सकाळी ९ वाजल्यापासून ते संध्याकाळी ४ वाजेपर्यंत


मतमोजणी : १२ मे २०२६ संध्याकाळी ५ वाजता


निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम तारीख : १३ मे २०२६

Comments
Add Comment

Bandra Encroachment Removal Campaign : वांद्रे स्थानकाबाहेर अतिक्रमण हटाव मोहीम; अनधिकृत मशिदीवर महापालिकेची कारवाई

मुंबई : मुंबईतील वांद्रे स्थानकाबाहेरील परिसरात आज सकाळी मोठी अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली. या

IPL 2026 : आरसीबीसाठी दिलासादायक बातमी! विराट कोहलीचा ओपनिंग पार्टनर प्लेऑफपूर्वी संघात परतणार...

RCB : आयपीएल २०२६ मध्ये अनेक खेळाडू दुखापतीमुळे संघातून बाहेर झाले आहेत. त्यामुळे संघांना त्याचा मोठा फटका बसला

भूमी अभिलेख विभागाचा; राज्यात ५० नवी कार्यालये सुरु होणार; १० हजार पदांच्या आकृतीबंधालाही मूर्तरूप

मुंबई : प्रशासकीय कामकाज लोकाभिमुख आणि वेगवान करण्यासाठी, भूमी अभिलेख विभागाच्या सुधारित आकृतीबंधानुसार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत तेजस नेटवर्क्स आणि महाआयटीमध्ये सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या

महाराष्ट्रातील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना दूरसंचार तंत्रज्ञानाचे जागतिक दर्जाचे प्रशिक्षण मिळणार मुंबई :

Virat Kohli : ९ वर्षांत कुणी विचारलंच नाही – तू कसा आहेस ? कसोटी कर्णधारपद सोडण्यावरून विराट कोहलीचा भावनिक खुलासा ..

बेंगळुरू : विराटने कसोटी कर्णधारपद सोडून आज ४ वर्षे उलटून गेली आहेत तरीही त्याच्या त्या निर्णयावर अजूनही बऱ्याच

Minister Nitesh Rane : राज्यातील जलवाहतूक सेवा होणार डिजिटल

 मंत्री नितेश राणे यांचे निर्देश; ऑनलाईन तिकीट व्यवस्थेची अंमलबजावणी करणार मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील