Special Session : नारी शक्तीसाठी महायुती सरकार मे महिन्यात घेणार विशेष अधिवेशन?

मुंबई : राज्यातील ‘लाडक्या बहिणीं’साठी विविध योजनांचा धडाका लावल्यानंतर आता महायुती सरकार महिला सक्षमीकरणाच्या मुद्द्यावर देशपातळीवर निर्णायक भूमिका घेण्याच्या तयारीत आहे. महिला आरक्षणाला पाठिंबा दर्शवण्यासाठी मे महिन्यात राज्य विधिमंडळाचे एक दिवसीय विशेष अधिवेशन बोलावण्याचे संकेत विश्वसनीय सूत्रांनी दिले आहेत. या अधिवेशनाच्या माध्यमातून महिला आरक्षणाचा मार्ग प्रशस्त करण्यासोबतच विरोधकांची कोंडी करण्याची रणनीती सत्ताधारी पक्षाने आखल्याचे समजते.


महिला आरक्षण विधेयक अर्थात ‘नारी शक्ती वंदन विधेयक’ संसदेत नामंजूर झाल्यानंतर, या मुद्द्यावर विरोधकांचा दुटप्पी चेहरा जनतेसमोर उघडा करण्यासाठी भाजपने देशव्यापी मोहीम हाती घेतली आहे. त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्रात हे विशेष अधिवेशन घेण्याचे नियोजन सुरू आहे. या एक दिवसीय कामकाजात सर्वपक्षीय आमदारांना आपली भूमिका मांडण्याची संधी मिळणार असून, आरक्षणाला पाठिंबा देणारा ठराव याद्वारे संमत केला जाण्याची शक्यता आहे.


मे महिन्यात हे अधिवेशन पार पडणार असले तरी, त्याची निश्चित तारीख अद्याप प्रशासकीय स्तरावर ठरलेली नाही. मात्र, लवकरच मंत्रिमंडळ बैठकीत यावर शिक्कामोर्तब होऊन तारीख जाहीर केली जाईल. या अधिवेशनामुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापण्याची चिन्हे असून, महाविकास आघाडी या विशेष अधिवेशनाला कशा प्रकारे सामोरी जाते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

Comments
Add Comment

Baramati and Rahuri : बारामतीत सुनेत्रा पवार तर राहुरीत अक्षय कर्डिले एवढ्या मताधिक्क्याने जिंकणार, एक्झिट पोलचा अंदाज

पुणे/अहिल्यानगर : राज्याच्या राजकीय पटलावर अत्यंत संवेदनशील ठरलेल्या बारामती आणि राहुरी विधानसभा

AI based Exit Poll : प. बंगालमध्ये मुसंडी मारताना आसाममधील भाजपचा गड राहणार अभेद्य!

तामिळनाडूत द्रमुकचा डंका; केरळमध्ये ‘लाल किल्ल्या’च्या बुरुजाला तडे जाणार नवी दिल्ली : पाच राज्यांच्या

Wall collapse near Hospital : रुग्णालयाजवळची संरक्षक भिंत कोसळून सात जणांचा मृत्यू, मृतांमध्ये ३ मुलांचा समावेश

बंगळुरू : कर्नाटकची राजधानी असलेल्या बंगळुरूत बोअरिंग आणि लेडी कर्झन रुग्णालयाजवळची संरक्षक भिंत कोसळून सात

West Bengal Exit Poll : पश्चिम बंगालमध्ये भाजपची सत्ता येणार, एक्झिट पोलचा अंदाज

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमधील दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्याचे मतदान संपले आहे. पहिल्या टप्प्यात ९२

मच्छीमारांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक - मस्त्ययव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे; प्लास्टीक मुक्त कोळीवाडा मोहीम राबविण्याचे आवाहन

मुंबई : मत्स्यव्यवसायाला कृषीचा दर्जा देणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. मत्स्यव्यवसाय क्षेत्राला चालना

रायगड जिल्ह्यातील अंबा व कुंभे उदंचन जलविद्युत प्रकल्प क्षमतावाढीसाठी CM देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 'एनटीपीसी'शी सुधारित सामंजस्य करार

मुंबई : एनटीपीसी लिमिटेडच्या रायगड जिल्ह्यातील कुंभे व अंबा उदंचन जलविद्युत प्रकल्पांच्या स्थापित