Anant Ambani : हिप्पोंना मारु नका, वनतारामध्ये पाठवा; अनंत अंबानी यांची कोलंबिया सरकारला विनंती

मुंबई : उद्योगपती अनंत अंबानी यांचे प्राणीप्रेम पुन्हा एकदा समोर आले आहे. दक्षिण अमेरिकेतील कोलंबिया देशात वाढत्या हिप्पोंच्या (पाणघोडे) संख्येमुळे निर्माण झालेल्या समस्येवर सरकारने कठोर पाऊल उचलत ८० हिप्पोंना ठार करण्यास परवानगी दिली आहे. मात्र, या निर्णयावर अनंत यांनी मानवतावादी पर्याय सुचवला असून, त्या हिप्पोंना 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती केली आहे.


कोलंबियातील मॅग्डालेना नदी खोऱ्यात हिप्पोंची संख्या झपाट्याने वाढत आहे. या भागात सध्या सुमारे २०० हिप्पोंचे वास्तव्य आहे. या भागात नैसर्गिक भक्षक नसल्याने हिप्पोंची संख्या नियंत्रणाबाहेर गेली असून, यामुळे स्थानिक जैवविविधता आणि मानवी सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे. यामुळेच आता सरकारने सुमारे ८० हिप्पोंना मारण्याचा निर्णय घेतला आहे.


दरम्यान, अनंत अंबानी यांनी या निर्णयाबाबत चिंता व्यक्त करत कोलंबिया सरकारला पर्यायी उपाय सुचवला आहे. अनंत यांनी कोलंबिया सरकारला प्रस्ताव दिला आहे की, या हिप्पोंना सुरक्षित आणि वैज्ञानिक पद्धतीने भारतात आणून त्यांचे ‘वनतारा’मध्ये पुनर्वसन करावे. नैसर्गिक अधिवास, तज्ज्ञांकडून वैद्यकीय देखभाल आणि दीर्घकालीन संरक्षण यामुळे या प्राण्यांचा जीव वाचेल. अंबानी यांनी कोलंबियाच्या पर्यावरण मंत्री इरेने वेल्झ टोरेस यांना पत्र लिहून या योजनेचा विचार करण्याची विनंती केली आहे. त्यांनी स्पष्ट केले की, संपूर्ण प्रक्रिया अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली होईल आणि भारत व आंतरराष्ट्रीय नियमांचे पालन केले जाईल.


मानवी आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाची गरज


अंबानी यांच्या मते, हे हिप्पो बदलत्या परिस्थितीचे परिणाम आहेत. त्यामुळे त्यांना वाचवण्यासाठी जबाबदारीने पुढे येणे आवश्यक आहे. योग्य व्यवस्थापन आणि वैज्ञानिक नियोजनाद्वारे मानव आणि वन्यजीव यांच्यात संतुलन साधता येऊ शकते.


वनताराची तयारी पूर्ण


‘वनतारा’ने या मोहिमेसाठी सविस्तर योजना तयार केली आहे. अनुभवी पशुवैद्यकीय टीम, सुरक्षित वाहतूक व्यवस्था, बायो-सिक्युरिटी प्रोटोकॉल आणि प्राण्यांसाठी अनुकूल अधिवास. तसेच, अंतिम निर्णय होईपर्यंत हिप्पोंना ठार मारण्याची प्रक्रिया थांबवण्याची विनंतीही करण्यात आली आहे. हा प्रस्ताव मान्य झाला, तर वन्यजीव संरक्षणासाठी एक नवे उदाहरण निर्माण होईल.

Comments
Add Comment

BMC Coastal Committee : मुंबईतील किनारपट्टींच्या संवर्धनासाठी स्वतंत्र कोस्टल कमिटी, महापालिका सभागृहात ठराव मंजूर

चौपाट्यांच्या अस्वच्छतेवरून नगरसेवकांनी तीव्र नाराजी मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईच्या किनारप‌ट्टीचे

Mumbai News : मुंबईत पाण्याच्या टाकीत बुडून दोन मुलांचा मृत्यू

मुंबई : पाण्याच्या टाकीत बुडून दोन मुलांचा मृत्यू झाल्याची घटना गोरेगाव पूर्वेकडील आरे कॉलनीत घडली. गौतम

Pratap Sarnaik : गणेशोत्सवात स्वस्तात एसटीने गावी जाता येणार

मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या हजारो भाविकांना मोठा दिलासा मिळाला आहे. एसटी बसच्या एकेरी गट आरक्षणावर

Devendra Fadnavis : पोलीस ठाण्यांची ‘अ’, ‘ब’, ‘क’ वर्गवारी करणार

मुंबई : वाढती लोकसंख्या, झपाट्याने होणारे शहरीकरण आणि औद्योगिकीकरणामुळे पोलिसांवरील वाढता ताण लक्षात घेऊन

Vishakha Raut : माजी महापौर विशाखा राऊत यांचे नगरसेवक पद धोक्यात जात प्रमाणपत्र ठरवले आहेत

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : माहीम येथील प्रभाग क्रमांक १९१ मधून निवडून आलेल्या उबाटाच्या नगरसेविका माजी महापौर

Private Coaching Center : खासगी शिकवणी केंद्रांच्या नियमनासाठी कायद्याच्या प्रारूप मसुद्यावर ४ सप्टेंबरपर्यंत सूचना-हरकती पाठविण्याचे आवाहन

मुंबई : राज्यातील खासगी शिकवणी केंद्रांच्या नोंदणी व नियमनासाठी स्वतंत्र कायदा करण्याच्या दृष्टीने शासनाने