Mumbai-Bhopal Flight Accident : मुंबई ते भोपाळ विमानाचे इमर्जन्सी लँडिंग; १६६ प्रवाशांचे प्राण थोडक्यात वाचले

मुंबई : विमान अपघाताच्या अनेक घटना या समोर येत आहेत. अहमदाबादची एक भयंकर मोठी विमान दुर्घटनेच्या आठवणी आजही ताज्या आहेत. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमधून अशाच एक अपघाताची बातमी समोर आली आहे. मुंबई ते भोपाळकडे जाणारे एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड झाला अन् १७५ प्रवाशांचे प्राण टांगणीला लागला.



नेमकं काय घडलं?


मुंबईतून भोपाळच्या दिशेने निघालेले एअर इंडिया A१६३ विमानाचे भोपाळमध्ये इमरजन्सी लँडिंग करण्यात आले. मुंबईकडून विमानाने उड्डाण घेताच काही वेळातच तांत्रिक बिघाड लक्षात आला. विमानात एकूण १७५ जण होते यात १६६ प्रवेशाचा समावेश होता.



मुंबईतून फ्लाईट AI६३३ ने उड्डाण केल्यानंतर तांत्रिक बिघाड झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर तातडीने सूत्रे हलवून प्रोटोकॉल लागू करण्यात आला. प्रोटोकॉलनुसार ट्राफिक कंट्रोलशी संपर्क साधत लँडिंगची तयारी सुरु करण्यात आली.



मोठी दुर्घटना टळली


घटनेची माहिती मिळताच सुरक्षा यंत्रणा घटनास्थळी त्वरित दाखल झाल्या. एटीसी, ग्राउंड स्टाफ, सीआयएसएफ आणि अग्निशमन दलाचे जवान घटनस्थळी पोहोचले होते, सर्वांनी आपली काम चोख बजावत, सर्व स्थिती सांभाळून घेतल्याने मोठा अपघात टळला आहे.



एअर इंडियाच्या जाहीर केलेल्या माहितीनुसार विमानात तांत्रिक बिघाड झाल्याचे संकेत मिळाल्यानंतर पायलटने SOP अंतर्गत निर्णय घेत. याच वेळेत पायलटने योग्य वेळेत अतिशय योग्य निर्णय घेतल्याने १७५ प्रवाशांचे प्राण वाचले. पायलट आणि ट्रॅफिक कंट्रोलसोबत योग्य समन्वय साधल्याने मोठी दुर्घटना टळली.

Comments
Add Comment

Khar tree collapse : खारमध्ये रिक्षावर झाड कोसळल्याने १४ वर्षीय मुलीचा मृत्यू

मुंबई : खार (पश्चिम) येथील लिंकिंग रोडवर राजकुमार ज्वेलर्सजवळ रिक्षावर झाड कोसळल्याने,१४ वर्षीय मुलीचा मृत्यू

NEET UG 2026 : नीट पेपरफुटी प्रकरणी मनीषा मांढरेला CBI कोठडी, नांदेडमधये पालकांची सीबीआय चौकशी

मुंबई : नीट युजी २०२६ पेपरफुटी प्रकरणी मनीषा मांढरेला १४ दिवसांची सीबीआय कोठडी ठोठावण्यात आली आहे.

Krunal Pandya : हार्दिकच्या लग्नाला कृणाल पांड्या गैरहजर राहणार ? चर्चांमागचं नेमकं कारण काय ?

IPL 2026 : हार्दिक पांड्या पुन्हा एकदा चर्चेत आहे. आयपीएल २०२६ संपण्याआधीच हार्दिक पांड्या मॉडेल आणि इन्फ्लुएंसर

Kirit Somaiya : मुंबईत उघड्यावर कुर्बानी देण्यास बंदी घाला, किरीट सोमय्यांची मागणी

मुंबई : मुंबईत उघड्यावर कुर्बानी देण्यास बंदी घाला, अशी मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे. बीएमसी आणि

BMC Waste Management : मोठ्या प्रमाणात कचरा निर्मिती: महानगरपालिकेकडे नोंदणी न करणाऱ्यांवर कडक कारवाईचे आयुक्तांचे आदेश

मुंबई : घनकचरा व्यवस्थापन नियमांनुसार मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणाऱ्या संस्था व व्यक्तींनी

BMC News : एकही मॅनहोल्स उघडे राहता कामा नये

महापालिका आयुक्तांनी दिले संबंधित खात्यांसह सहायक आयुक्तांनाही निर्देश मुंबई : सध्या सुरू असलेली सर्व