Mumbai-Bhopal Flight Accident : मुंबई ते भोपाळ विमानाचे इमर्जन्सी लँडिंग; १६६ प्रवाशांचे प्राण थोडक्यात वाचले

मुंबई : विमान अपघाताच्या अनेक घटना या समोर येत आहेत. अहमदाबादची एक भयंकर मोठी विमान दुर्घटनेच्या आठवणी आजही ताज्या आहेत. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमधून अशाच एक अपघाताची बातमी समोर आली आहे. मुंबई ते भोपाळकडे जाणारे एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड झाला अन् १७५ प्रवाशांचे प्राण टांगणीला लागला.



नेमकं काय घडलं?


मुंबईतून भोपाळच्या दिशेने निघालेले एअर इंडिया A१६३ विमानाचे भोपाळमध्ये इमरजन्सी लँडिंग करण्यात आले. मुंबईकडून विमानाने उड्डाण घेताच काही वेळातच तांत्रिक बिघाड लक्षात आला. विमानात एकूण १७५ जण होते यात १६६ प्रवेशाचा समावेश होता.



मुंबईतून फ्लाईट AI६३३ ने उड्डाण केल्यानंतर तांत्रिक बिघाड झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर तातडीने सूत्रे हलवून प्रोटोकॉल लागू करण्यात आला. प्रोटोकॉलनुसार ट्राफिक कंट्रोलशी संपर्क साधत लँडिंगची तयारी सुरु करण्यात आली.



मोठी दुर्घटना टळली


घटनेची माहिती मिळताच सुरक्षा यंत्रणा घटनास्थळी त्वरित दाखल झाल्या. एटीसी, ग्राउंड स्टाफ, सीआयएसएफ आणि अग्निशमन दलाचे जवान घटनस्थळी पोहोचले होते, सर्वांनी आपली काम चोख बजावत, सर्व स्थिती सांभाळून घेतल्याने मोठा अपघात टळला आहे.



एअर इंडियाच्या जाहीर केलेल्या माहितीनुसार विमानात तांत्रिक बिघाड झाल्याचे संकेत मिळाल्यानंतर पायलटने SOP अंतर्गत निर्णय घेत. याच वेळेत पायलटने योग्य वेळेत अतिशय योग्य निर्णय घेतल्याने १७५ प्रवाशांचे प्राण वाचले. पायलट आणि ट्रॅफिक कंट्रोलसोबत योग्य समन्वय साधल्याने मोठी दुर्घटना टळली.

Comments
Add Comment

Multi Tunneling Mumbai :मुंबईत उभारणार बोगद्यांचे जाळे ; ४,३९२ कोटींचा खर्च अपेक्षित

मुंबई : मुंबईत सातत्याने पायाभूत सुविधांचे जाळे उभारले जात असले, तरी रस्त्यांवरील वाहतूक कोंडीची समस्या अद्याप

The Mithi River : मिठी नदीतील भराव संरक्षक भिंतीच्या बांधकामासाठीच

मुंबई : मिठी नदीत कंत्राटदाराकडून बांधकामाचा राडारोडा (डेब्रीज) टाकून आणि त्यात चिखल मिसळून भ्रष्टाचार केला जात

Old Building : जुन्या इमारती अतिधोकादायक दाखवण्यामागे सल्लागारांचा खेळ?

मुंबई  : मुंबईतील ३० वर्षांपेक्षा जुन्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट (संरचनात्मक परीक्षण) करताना, अनेक सल्लागार

Devendra Fadnavis : इंधनाचा काळाबाजार रोखण्यासाठी राज्य सरकार ॲक्शन मोडवर

मुंबई : इराण-अमेरिका युद्धामुळे जागतिक इंधन पुरवठा साखळी विस्कळीत झाली असून, त्याचा परिणाम देशातील पेट्रोलियम

Mrinal Tai Gore Flyover Extension : अंधेरी,जोगेश्वरी, गोरेगावकरांचा वेळ वाचणार, मृणालताई गोरे विस्तारीत उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : गोरेगाव पश्चिम येथील राम मंदिर मार्ग ते रिलीफ रोडदरम्यानच्या मृणालताई गोरे

The Fort owners : किल्लेदारांनी बोटीतून केली मिठी नदीची सैर... दाखवला नदीत कचऱ्यासह तीन फुटांपर्यंतचा गाळ

मुंबई : मान्सूनच्या पार्श्वभूमीवर मुंबईत सध्या नालेसफाईच्या कामाला सुरुवात असून सत्ताधारी पक्षाकडून प्रत्येक