Marine Drive Accident : मरीन ड्राईव्हवर पहाटे भीषण थरार! मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या तिघांचा मृत्यू

मुंबई : मुंबईत सोमवार, २७ एप्रिल रोजी पहाटे मरीन ड्राईव्ह परिसरात भीषण अपघात घडला असून यात तिघांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेमुळे संपूर्ण शहर हादरले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, गिरगाव परिसरातील एक ज्येष्ठ नागरिक पहाटे साधारण पावणेसहा वाजता मॉर्निंग वॉकसाठी मरीन ड्राईव्हवर आले होते. त्याच वेळी वेगाने येणाऱ्या दोन बाईकस्वारांनी त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत वृद्ध व्यक्ती, एक तरुण आणि एक तरुणी अशा तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला.


अपघात इतका भीषण होता की दोन्ही बाईकस्वारही रस्त्यावर कोसळले आणि त्यांनाही गंभीर दुखापत झाली. तातडीने घटनास्थळी पोलीस दाखल झाले आणि सर्व जखमींना जीटी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र उपचारादरम्यान तिघांचा मृत्यू झाला.







पोलिसांनी मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू केले असून अपघात नेमका कसा घडला याचा तपास सुरू केला आहे. प्राथमिक अंदाजानुसार दोन्ही बाईक अत्यंत वेगात होत्या. कदाचित रात्रीच्या फेरफटक्यानंतर ते परतत असावेत, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच बाईकस्वारांमध्ये शर्यत सुरू होती का, याचाही तपास केला जात आहे.


दरम्यान, या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. याच दरम्यान, रविवारी रात्री मुंबई-गोवा महामार्गावरील भोस्ते घाटात ब्रेक फेल झालेल्या टेम्पो ट्रॅव्हलरचा अपघात झाला होता. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र वाहनांचे मोठे नुकसान झाले.

Comments
Add Comment

Gold medal-winning athlete : सुवर्णपदक विजेता खेळाडू राज ठाकरेंवर भडकला; अडीच तास ताटकळत ठेवूनही भेट न झाल्याने नाराजी

मुंबई : क्रीडा क्षेत्रात देशाचे आणि राज्याचे नाव उज्ज्वल करणाऱ्या खेळाडूंना अनेकदा प्रशासकीय आणि राजकीय

Shrinivas Vinayak Kulkarni : मराठी साहित्यातील तेजस्वी पर्व संपले; मौज नियतकालिकाचे संपादक आणि 'डोह'कार श्री. वि. कुलकर्णी यांना मुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली

मुंबई : ज्येष्ठ साहित्यिक, 'डोह'कार म्हणून ओळखले जाणारे श्रीनिवास विनायक कुलकर्णी म्हणजेच श्री. वि. कुलकर्णी (Shrinivas

Mangal Prabhat Lodha : म्हाडासाठी राखीव घरे न देणाऱ्या विकासकांवर कडक कारवाई करा; गरज पडल्यास कारागृहात पाठवा - मंत्री मंगल प्रभात लोढा

नागरिक आणि म्हाडा मधील संवाद अधिक प्रभावी करण्यासाठी सल्लागार समिती स्थापन करण्याच्या मंत्री लोढा यांच्या

Samagra Shiksha Abhiyan : २२ वर्षांचा संघर्ष अखेर संपला! समग्र शिक्षा अभियानातील ३,२७६ कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवाशाश्वती; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय

मुंबई : तब्बल २२ वर्षांपासून समग्र शिक्षा अभियानांतर्गत (Samagra Shiksha Abhiyan) कंत्राटी तत्त्वावर कार्यरत असलेल्या ३,२७६

Footpath Encroachment : पदपथ अतिक्रमण मुक्तीच्या निर्देशानंतर, याच्या अंमलबजावणीसाठी आयुक्त थेट उतरल्या रस्त्यावर

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईतील (Mumbai) पदपथांवरील अनधिकृत फेरीवाले व अतिक्रमणे तत्काळ हटवून पदपथ अडथळामुक्त

Oshiwara Maternity Hospital : ओशिवरा प्रसूतीगृहाचे महापौरांच्या हस्ते लोकार्पण

जोगेश्वरी परिसरातील गर्भवती माता व नवजात बालकांना दर्जेदार आरोग्य सेवांची मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई