Ambernath Local : अंबरनाथ लोकलमध्ये महिलांची तुफान मारामारी; व्हिडीओ व्हायरल

मुंबई : मुंबईची लाईफलाईन म्हणजेच मुंबईची लोकल ट्रेन. याच लोकल ट्रेनमध्ये जेव्हा मारामारी होते, ती सोशल मीडियाद्वारे व्हायरल होते. असाच ठाणे ते डोंबिवली स्थानकांदरम्यान ट्रेनमधल्या महिलांच्या मारामारीच्या व्हिडीओ व्हायरल झाला आहे.



नेमकं काय घडल?


ही घटना रविवारी संध्याकाळची असून ऐन गर्दीच्या वेळी घडली आहे. CSMT ते अंबरनाथच्या दिशेने जाणाऱ्या लोकलमध्ये प्रचंड गर्दी होती. महिला डब्ब्यांमध्ये चढत होत्या, परंतु एक मुस्लिम महिला प्रवासी बाजूलाच व्हायला तयार नव्हती त्यामुळे बाकीच्या प्रवाशांना ट्रेनमध्ये चढायला मिळत नव्हते , त्रास होत होता. लोकल स्थानकावरून सुटली तरीही हा वाद सुरु होता, त्यात ठाणे स्थानक सुटल्यानंतर एक महिला प्रवासी ठाणे ते कळवा स्थानकांदरम्यान चालत्या लोकल मधून रेल्वे रुळावर पडली. त्यानंतर वाद आणखीच चिघळला.



'बाजूला सरका' किंवा 'जागा द्या' असे म्हटल्यानंतर मुस्लिम महिलेला राग आला त्या महिलेने थेट इतर प्रवाशांना शिवीगाळ करण्यास सुरवात केली. याचे रूपांतर नंतर हाणामारीत झाले. त्या महिलेने इतर महिलेचे केस ओढून तिला लाथाबुक्क्यांनी मारायला सुरुवात केली. इतर महिला त्यात पडल्या असता ती कोणाचंच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती.




रेल्वे पोलिसात तक्रार


ट्रेनमधील हा मारामारीचा हा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला. महिलांनी रेल्वे पोलीस ठाण्यात धाव घेत अधिकृत तक्रार दाखल केली आहे. शिवाय रेल्वे पोलीस व्हायरल व्हिडिओच्या आधारे महिलेचा शोध घेत आहेत.

Comments
Add Comment

BMC : मुंबई महानगरपालिका मुख्यलयात मंत्रालयाच्या धर्तीवर प्रवेश

मुंबई  : मुंबई महापालिका मुख्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी प्राप्त झाल्यानंतर पुन्हा एकदा महापालिका

BMC मुख्यालय उडवून देण्याची धमकी, महापौरांसह इमारतीच्या सुरक्षेत वाढ

महापािलका मुख्यालय उडवून देण्याची धमकी ; महापौरांसह इमारतीच्या सुरक्षेत वाढ अशा धमक्यांना मी मुळीच घाबरत नाही-

अवकाळी पावसाने बाधित फळपिकांचे पंचनामे पूर्ण करा, कृषिमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : 'राज्यात मे आणि जून २०२६ या कालावधीत अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीमुळे बाधित झालेल्या फळपिकांच्या

Verification of Street Vendors : मुंबईत २० हजार फेरीवाल्यांची पडताळणी पूर्ण

येत्या २६ जून पर्यंत पडताळणी न झालेल्यांना मिळणार नाही क्यू आर कोड ओळखपत्र मुंबई (विशेष प्रतिनिधी ) : उच्‍च

Devendra Fadnavis : समर्थ भारत ते विकसित भारत’ पंतप्रधान मोदींमुळेच शक्य

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; महाराष्ट्र राज्याच्या वतीने पत्र लिहून केले अभिनंदन मुंबई : देशाच्या इतिहासात

Panvel-Karjat Corridor : रेल्वेला नवी लाइफलाइन! लवकरच धावणार उपनगरी रेल्वे; पनवेल-कर्जत कॉरिडॉरचे ९८ टक्के काम पूर्ण

MUMBAI : मुंबई उपनगरी रेल्वे नेटवर्कसाठी महत्त्वाचा ठरणारा बहुप्रतीक्षित पनवेल-कर्जत रेल्वे कॉरिडॉर आता