Toll Exemption : सिंधुदुर्गवासियांना ‘टोल माफ’, पालकमंत्री नितेश राणेंनी दिला दिलासा

सावंतवाडी : ओसरगाव टोल नाक्यावर मी आमदार असताना सिंधुदुर्ग जिल्हावासियांना टोल लागू दिला नव्हता. आता महामार्ग पूर्ण होत असल्याने जरी टोल सुरू झाला तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ‘एम एच -०७’ पासिंगच्या वाहनांना कोणताही टोल लागणार नाही, अशी स्पष्ट भूमिका पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केली. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाला गती देणारा आणि जिल्ह्याला खऱ्या अर्थाने फायदेशीर ठरेल असाच ‘शक्तीपीठ’ महामार्ग तयार केला जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले असल्याची माहितीही पालकमंत्री नितेश राणे यांनी येथे पत्रकारांशी बोलताना दिली. सावंतवाडी दौऱ्यावर असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, शक्तिपीठ महामार्गाचा आराखडा नव्याने तयार करण्यात आला आहे. यामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा आणि विशेषतः रेडी बंदराला मोठा फायदा होईल, याची काळजी घेण्यात आली आहे. आमदार दीपक केसरकर यांनी मांडलेल्या सूचनांची दखल घेऊन प्रशासकीय बैठका पार पडल्या आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे, बांदा व परिसरातील गावे या प्रकल्पामुळे बाधित होणार नाहीत, अशा पद्धतीने मार्ग काढण्यात आला आहे. हा मार्ग रेडी पोर्टला जोडला जाणार असून, कोणत्याही संघर्ष समितीच्या पत्रावर नव्हे तर जनहिताचा विचार करून सरकार निर्णय घेत आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही त्यांनी केले. मी जिल्ह्याचा पालकमंत्री आहे. त्यामुळे ओसरगाव टोल नाका सुरू झाला तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 'एमएच -०७ ' क्रमांकाच्या कोणत्याही वाहनाला टोल भरावा लागणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.


Comments
Add Comment

Teachers : निवडणुकीसह विविध कार्यालयांमध्ये प्रतिनियुक्तीवर गेलेल्या शिक्षकांना पुन्हा वर्गावर धाडणार

शिक्षण संचालनालयाद्वारे परिपत्रक केले जारी मुंबई : मुंबईसह राज्यातील काही भागांमधील शिक्षक हे

Nagpur-Madgaon Biweekly Train Regular : कोकणवासीयांसाठी आनंदाची बातमी! नागपूर-मडगाव द्विसाप्ताहिक एक्स्प्रेस आता नियमित धावणार

कोकण : मे महिन्याच्या सुट्ट्यांमध्ये तसेच भविष्यातही कोकणात ये-जा करणाऱ्या प्रवाशांसाठी मोठा दिलासा देणारा

Dhule Crime News : “अपमान सहन झाला नाही”; संतापाच्या भरात मुलाने जन्मदात्या आई-वडिलांची केली हत्या

धुळे : धुळ्यातील एका कुटुंबात बहिणीच्या लग्नाचा आनंद साजरा होत असतानाच काही तासांतच अत्यंत भीषण आणि हृदयद्रावक

Accident : मिसिंग लिंकवर तीन तासांत दोन अपघात, मुंबई - पुणे वाहतूक विस्कळीत

पुणे : मुंबई ते पुणे प्रवास हा प्रवास वेगाने करण्यासाठी मिसिंग लिंक सुरू करण्यात आली आहे. या रस्त्यामुळे प्रवास

Ashadhi Wari 2026 : आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पालखी महामार्गाबाबत नितीन गडकरींची मोठी घोषणा

सोलापूर : सोलापूर जिल्हा (Solapur News) हा महाराष्ट्राच्या आध्यात्मिक परंपरेचा गाभारा मानला जातो. येथे श्री विठ्ठल

Mumbai To Alibaug Ferry : अलिबागचा प्लॅन करताय? जरा थांबा! मुंबई-मांडवा बोट सेवा 'या' तारखेपासून होणार बंद

मुंबई : मुंबईकरांचे सर्वात जवळचे आणि आवडते वीकेंड डेस्टिनेशन असणाऱ्या अलिबागला भेट देण्याचा बेत आखणाऱ्यांसाठी