Toll Exemption : सिंधुदुर्गवासियांना ‘टोल माफ’, पालकमंत्री नितेश राणेंनी दिला दिलासा

सावंतवाडी : ओसरगाव टोल नाक्यावर मी आमदार असताना सिंधुदुर्ग जिल्हावासियांना टोल लागू दिला नव्हता. आता महामार्ग पूर्ण होत असल्याने जरी टोल सुरू झाला तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ‘एम एच -०७’ पासिंगच्या वाहनांना कोणताही टोल लागणार नाही, अशी स्पष्ट भूमिका पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केली. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाला गती देणारा आणि जिल्ह्याला खऱ्या अर्थाने फायदेशीर ठरेल असाच ‘शक्तीपीठ’ महामार्ग तयार केला जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले असल्याची माहितीही पालकमंत्री नितेश राणे यांनी येथे पत्रकारांशी बोलताना दिली. सावंतवाडी दौऱ्यावर असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, शक्तिपीठ महामार्गाचा आराखडा नव्याने तयार करण्यात आला आहे. यामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा आणि विशेषतः रेडी बंदराला मोठा फायदा होईल, याची काळजी घेण्यात आली आहे. आमदार दीपक केसरकर यांनी मांडलेल्या सूचनांची दखल घेऊन प्रशासकीय बैठका पार पडल्या आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे, बांदा व परिसरातील गावे या प्रकल्पामुळे बाधित होणार नाहीत, अशा पद्धतीने मार्ग काढण्यात आला आहे. हा मार्ग रेडी पोर्टला जोडला जाणार असून, कोणत्याही संघर्ष समितीच्या पत्रावर नव्हे तर जनहिताचा विचार करून सरकार निर्णय घेत आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही त्यांनी केले. मी जिल्ह्याचा पालकमंत्री आहे. त्यामुळे ओसरगाव टोल नाका सुरू झाला तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 'एमएच -०७ ' क्रमांकाच्या कोणत्याही वाहनाला टोल भरावा लागणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.


Comments
Add Comment

Maratha students : मराठा विद्यार्थ्यांना आता 'ओबीसी'प्रमाणेच शैक्षणिक सवलती

राज्य सरकारचा मोठा निर्णय; 'महाडीबीटी' पोर्टलवर होणार तांत्रिक बदल, यंदाच्या शैक्षणिक वर्षापासूनच

MPSC Nipun Setu : एमपीएससीच्या अंतिम निवडीत हुकलेल्या उमेदवारांना 'निपुण सेतू'द्वारे रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध

मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) विविध स्पर्धा परीक्षांच्या अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचूनही अंतिम

Devendra Fadnavis : नीट' परीक्षेच्या नियोजनाचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

मुंबई : गेल्या महिन्यात झालेल्या पेपरफुटीच्या गंभीर प्रकरणामुळे 'नॅशनल टेस्टिंग एजन्सी'ने (एनटीए) रद्द केलेली

Jalna : पोलीस भरती होण्याचं स्वप्न अपूर्णच राहिलं, सराव जीवावर बेतला

जालना : जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात एक अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी घटना घडली आहे. लहानपणापासून एकचं

Crime News : रात्री वडिलांनी चापट मारली, घरात सकाळी भयानक दृश्य समोर आलं, मॅकेनिकल इंजिनिअर मुलाचं वडिलांसोबत भयंकर कृत्य

Ahilyanagar Crime News : अहिल्यानगर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लहान भावाला जास्त जीव लावला जातो, हा राग मनात

वसतिगृहाच्या टेरेसवर झोपलेल्या विद्यार्थ्याचा खून, पोलिसांकडून तपास सुरु

पुणे : पुणे जिल्ह्यातील (Pune Crime) आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गोनवडी येथील