Blast : अखिलेश यादव, राहुल गांधींचा पुतळा जाळताना स्फोट, भाजप महिला आमदार जखमी

बहराइच : उत्तर प्रदेशच्या बहराइचमध्ये भाजपाच्या 'महिला जनआक्रोश मोर्चा' दरम्यान एक धक्कादायक घटना घडली आहे. विरोधकांचा निषेध करत असलेल्या नगरच्या आमदार आणि माजी मंत्री अनुपमा जयस्वाल या सपा प्रमुख अखिलेश यादव यांचा पुतळा जाळत असताना झालेल्या स्फोटात भाजल्या आहेत.

शनिवारी दुपारी सुमारे २:२० वाजता जिल्हाधिकारी (डीएम) चौकात भाजपा कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमली होती. आमदार अनुपमा जयस्वाल यांच्या नेतृत्वाखाली सपा प्रमुख अखिलेश यादव आणि राहुल गांधी यांच्या पुतळ्याचं दहन केले जात होते. आमदारांनी पुतळ्याला आग लावण्यासाठी जशी माचिस पेटवली, तसा पुतळ्याच्या आत अचानक जोरदार स्फोट झाला. भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल राय यांनी सांगितलं की, पुतळ्यामध्ये कदाचित पेट्रोलचे प्रमाण जास्त होते, ज्यामुळे आगीचा गोळा थेट आमदारांच्या चेहऱ्यावर आला. आमदारांचे कपाळ आणि केसाला आग लागली होती, जी कार्यकर्त्यांनी लगेचच विझवली आणि त्यांना पोलिसांच्या गाडीतून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

महाराजा सुहेलदेव मेडिकल कॉलेजचे सीएमएस मदन मोहन मणी त्रिपाठी यांनी सांगितलं की, आमदारांना इमर्जन्सी विभागात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्या कपाळावर ४.५ टक्के 'सुपरफिशियल बर्न इन्जरी' झाली आहे. त्यांच्या डोक्यावरचे काही केसही जळाले आहेत, मात्र दिलासादायक बाब म्हणजे त्यांच्या डोळ्यांना कोणतीही इजा झालेली नाही. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून डॉक्टरांचे पथक त्यांच्यावर लक्ष ठेवून आहे. घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी अक्षय त्रिपाठी आणि एसपी विश्वजीत श्रीवास्तव यांनी मेडिकल कॉलेजमध्ये जाऊन आमदारांच्या प्रकृतीची विचारपूस केली. पुतळ्यामध्ये नेमका कोणता पदार्थ होता. ज्यामुळे अचानक स्फोट झाला, याचा तपास आता प्रशासन करत आहे.
Comments
Add Comment

Shopian Terror Case : जम्मू आणि काश्मीरच्या शोपियानमध्ये तीन संशयितांना अटक, हँड ग्रेनेड आणि पोस्टर्स जप्त

श्रीनगर : काश्मिरी पंडितांना असलेला धोका आणि दक्षिण काश्मीरमध्ये सुरू असलेल्या दहशतवादविरोधी मोहिमेच्या

Dattatray Bharne : पीएमएफएमई योजनेत महाराष्ट्राचा राष्ट्रीय गौरव; अतीउत्कृष्ट कामासाठी प्रथम पुरस्काराने सन्मान

“पीएमएफएमई योजनेला मिळालेला पुरस्कार महाराष्ट्रातील शेतकरी, महिला, युवा आणि कृषी विभागाच्या मेहनतीची पावती”:

Artificial Intelligence : शिक्षणात AI चा वाढता प्रभाव, भारताची शैक्षणिक व्यवस्था आता बदलणार

मुंबई : AI आता फक्त तंत्रज्ञान क्षेत्रापुरतं मर्यादित राहिलेलं नाही. ते थेट वर्गखोल्यांपर्यंत पोहोचलं आहे. पण

Kashmiri Pandit Threat Letter : काश्मिरी पंडितांना १५ दिवसांत दुसऱ्यांदा धमकीचं पत्र; वैयक्तिक माहिती व्हायरल, सुरक्षा यंत्रणा सतर्क

काश्मीर : जम्मू-काश्मीरमधील काश्मिरी पंडितांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. काश्मिरी

Tamil Nadu Gold Ring Scheme : ४.४१ लाख सोन्याच्या अंगठ्यांची ऑर्डर; ७५५ कोटींचा खर्च, ‘या’ बाळांना मिळणार १ ग्रॅम सोनं!

चेन्नई : तामिळनाडू सरकारने तब्बल ४.४१ लाख सोन्याच्या अंगठ्यांची ऑर्डर दिल्याने सध्या या निर्णयाची चर्चा सुरू

INS Mangrol : ‘आयएनएस मंगरोल'मुळे नौदलाची ताकद वाढली; पाण्याखालील शत्रूंच्या हालचालींवर ठेवणार नजर!

नवी दिल्ली : भारतीय नौदलाची सागरी ताकद आणखी वाढली आहे. स्वदेशी बनावटीची ‘आयएनएस मंगरोल’ (INS Mangrol) ही पाणबुडीविरोधी