Nashik : टीसीएस कंपनीतील धर्मांतर प्रकरण, दानिशचा अटकपूर्व जामीन फेटाळला

नाशिक : नाशिकच्या टीसीएस कंपनीतील (Nashik TCS Case) धर्मांतर प्रकरणाने संपूर्ण राज्याला हादरवून सोडले आहे. बळजबरी मांस खाण्यास भाग पाडणे, विशिष्ट धर्माचा ग्रंथ वाचण्यासाठी देखील प्रवृत्त करणे, तसेच कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांचा लैंगिक छळ अशा काही गंभीर घटना याठिकाणी घडल्याचा आरोप आहे. दरम्यान, या प्रकरणी धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप असलेल्या दानिश शेख याचा अटकपूर्व जामीन अर्ज नाशिकरोड जिल्हा न्यायालयाने फेटाळला आहे.


 हे कृत्य जाणीवपूर्वक आणि द्वेषपूर्ण भावनेतून


पीडिताच्या धार्मिक श्रद्धा दुखावण्यासाठी तसेच धार्मिक श्रद्धेचा अपमान करण्यासाठी हे कृत्य जाणीवपूर्वक आणि द्वेषपूर्ण भावनेतून केल्याचे निरीक्षण न्यायालयाकडून नोंदवण्यात आले आहे. फिर्यादीनुसार, संशयितांनी पीडित तरुणाच्या जेवणावरच गदा आणली नाही, तर त्याला विशिष्ट धर्माचा ग्रंथ वाचण्यासाठी देखील भाग पाडले. कंपनीत काम करताना पीडिताबाबत खोटे अहवाल वरिष्ठांकडे पाठवून, इतर सहकाऱ्यांसमोर त्याचा वारंवार अपमान करण्यात आला. या मानसिक त्रासासोबतच त्याला गंभीर परिणामांच्या धमक्याही देण्यात आल्या होत्या. न्यायालयाने या आरोपांची दखल घेत या गंभीर आरोपांकडे दुर्लक्ष करता येणार नाही, असेही न्यायालयाने म्हटले.


महिला कर्मचाऱ्यांचेही लैंगिक छळाचे आरोप


महत्त्वाचे म्हणजे या प्रकरणाची व्याप्ती केवळ एका कर्मचाऱ्यापुरती मर्यादित नाही. या कंपनीतील (Nashik TCS Case) महिला कर्मचाऱ्यांनीही लैंगिक छळाचे गंभीर आरोप केले आहेत. संशयित दानिश शेख, आसिफ अन्सारी, तौसिफ अत्तार, शाहरुख कुरेशी यांच्यासह असिस्टंट जनरल मॅनेजर अश्विनी चैनानी सध्या नाशिकरोड कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून राज्य सरकारने विशेष तपास पथक स्थापन असून, राष्ट्रीय महिला आयोगानेही या प्रकरणाची दखल घेतली आहे.


२८ एप्रिलला होणार पुढील सुनावणी


मुंबई नाका पोलीस ठाण्यात आठ आणि देवळाली कॅम्प पोलिसांत एक, असे एकूण नऊ गुन्हे या टोळीविरुद्ध नोंद आहेत. तर, संशयित निदा एजान खान गर्भवती असूनही तिच्यावरील आरोपांचे स्वरूप पाहता न्यायालयाने तिला अटकेपासून संरक्षण दिलेले नाही. तिच्या अर्जावर २७ एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. तर दानिश याने १६६ क्रमांकाच्या गुन्ह्यात दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जावर पहिली सुनावणी झाली. पुढील सुनावणी २८ एप्रिल रोजी होणार आहे.

Comments
Add Comment

Nashik : अशोक खरातच्या आजच्या सुनावणीत काय घडलं ? भोंदू खरातची रवानगी आता...

नाशिक : स्वतःला ‘दैवी शक्ती’ असलेला पुरुष भासवून कोणाचे आर्थिक शोषण तर अनेक महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या भोंदू

Raja Shivaji : राजा शिवाजी मधील अफझलखानाची भेट आणि जोरदार टीकास्त्र; रितेशने नेमकं दाखवलं आहे तरी काय ?

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे दैवत, राजांच्या अनेक गोष्टी प्रत्येक मराठी माणूस हा लहानपणापासून

BMC सभागृहनेत्यांचा पुन्हा आवाजावरून त्रागा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या सभागृहातील ध्वनी यंत्रणेतील दोष निवारण करण्यास अद्यापही

BMC स्थायी समिती अध्यक्ष करणार मुंबईतील रस्त्यांची पाहणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : पावसाळा जवळ आला असून अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे तसेच इतर प्रकल्पांची कामे सुुरु

BMC च्या तक्रारींचे होणार जलद निवारण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईकर नागरिकांना नागरी सेवा-सुविधा पुरविताना नागरिकांचा सहभाग वाढवून त्यांच्या

केंद्र सरकारच्या iGOT–‘Sadhana Saptah 2026’ मध्ये महाराष्ट्र अव्वल

मुंबई : केंद्र सरकारच्या ‘मिशन कर्मयोगी’ अंतर्गत आयोजित ‘साधना सप्ताह २०२६ मध्ये राज्याने देशात प्रथम क्रमांक