Panvel : पनवेलच्या आदई-नेवाळी दगडखाणीबाबत गावकऱ्यांच्या विश्वासाने तोडगा काढणार

मुंबई : रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातल्या आदई आणि नेवाळी येथील दगडखाणींमुळे स्थानिक ग्रामस्थांना होणाऱ्या त्रासाची गंभीर दखल महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतली असून, हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी स्थानिक ग्रामस्थांसोबत बैठक घेऊन वस्तुस्थिती स्पष्ट करण्याचे निर्देश महसूलमंत्र्यांनी रायगड जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंत्रालयातील आपल्या दालनात बैठक घेतली. या बैठकीत खाणकामाच्या परवानग्या आणि स्थानिकांच्या तक्रारींबाबत चर्चा करण्यात आली. त्यावेळी हे निर्देश देण्यात आले.


आदई आणि नेवाळी परिसरातील दगडखाणींमुळे स्थानिक नागरिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. या खाणींना देण्यात आलेल्या 'तात्पुरत्या स्वरूपाच्या' परवानग्यांवरून स्थानिकांनी आक्षेप घेतला होता. या खाणींच्या कायदेशीर बाबी आणि नियमावलीबाबत ग्रामस्थांमध्ये संभ्रम आणि असंतोष निर्माण झाला होता.


या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, सध्या सुरू असलेल्या खाणकामाच्या परवानग्या नियमानुसार तात्पुरत्या स्वरूपाच्या आहेत. यावर महसूलमंत्र्यांनी थेट हस्तक्षेप करत निर्देश दिले की, संबंधित गावच्या ग्रामस्थांना विश्वासात घेणे आवश्यक आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः गावकऱ्यांना बोलावून त्यांच्याशी संवाद साधावा आणि खाणकाम सुरू असलेल्या खाणींबाबतची वस्तुस्थिती त्यांना सविस्तर समजावून सांगावी. जर खाणकाम नियमानुसार आणि कायदेशीर चौकटीत सुरू असेल, तर तसे ग्रामस्थांना पटवून द्यावे. या बैठकीतून स्थानिकांच्या तक्रारींचे निरसन करून हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा, अशा स्पष्ट सूचना महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिल्या आहेत.

Comments
Add Comment

MahaCare : महाकेअरच्या माध्यमातून राज्यात जागतिक दर्जाच्या कर्करोग उपचार सुविधा; नागपुरात हाय एनर्जी मेडिकल सायक्लोट्रॉन प्रकल्पाला मंजुरी

मुंबई : राज्यातील कर्करोग रुग्णांना जागतिक दर्जाचे उपचार आणि संशोधन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र

Devendra Fadnavis : आता शाळेत मिळणार 'ड्रग्ज'च्या दुष्परिणामांचे धडे

मख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश; अंमली पदार्थमुक्त महाराष्ट्र व्यूहरचना आणि कृती योजनेबाबत

Central Railway : कर्जत-लोणावळा रेल्वे मार्ग पूर्णपणे पूर्ववत; 17 जुलैपासून अनेक एक्सप्रेस गाड्या पुन्हा मूळ मार्गावर

मुंबई : कर्जत-लोणावळा (Karjat lonavala) दरम्यानच्या मध्य रेल्वेच्या दक्षिण-पूर्व डाऊन मार्गावरील रेल्वे सेवा पूर्णपणे

Transformation of railway stations : पंतप्रधान मोदी उद्या ७५ स्थानके राष्ट्राला करणार समर्पित; 'अमृत भारत' योजनेचा वेग वाढला

मुंबई: रेल्वे प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सुविधा मिळाव्यात आणि स्थानकांचे रूप पालटावे, या उद्देशाने

Pratap Sarnaik : ओला, उबरसह सर्व कंपन्यांना आता राज्य सरकारचा परवाना बंधनकारक

महाराष्ट्राचे नवे ॲग्रीगेटर धोरण लागू; रिक्षा टॅक्सीप्रमाणे चालकांना बॅच बंधनकारक मुंबई : महाराष्ट्रातील

Devendra Fadnavis : महाराष्ट्राला सर्वाधिक सुलभ शासकीय सेवा देणारे राज्य बनवा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; गव्हर्नन्स प्रोसेस रि-इंजिनियरिंग संदर्भात तिसऱ्या टप्प्याची बैठक मुंबई : राज्य