Panvel : पनवेलच्या आदई-नेवाळी दगडखाणीबाबत गावकऱ्यांच्या विश्वासाने तोडगा काढणार

मुंबई : रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातल्या आदई आणि नेवाळी येथील दगडखाणींमुळे स्थानिक ग्रामस्थांना होणाऱ्या त्रासाची गंभीर दखल महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतली असून, हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी स्थानिक ग्रामस्थांसोबत बैठक घेऊन वस्तुस्थिती स्पष्ट करण्याचे निर्देश महसूलमंत्र्यांनी रायगड जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंत्रालयातील आपल्या दालनात बैठक घेतली. या बैठकीत खाणकामाच्या परवानग्या आणि स्थानिकांच्या तक्रारींबाबत चर्चा करण्यात आली. त्यावेळी हे निर्देश देण्यात आले.


आदई आणि नेवाळी परिसरातील दगडखाणींमुळे स्थानिक नागरिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. या खाणींना देण्यात आलेल्या 'तात्पुरत्या स्वरूपाच्या' परवानग्यांवरून स्थानिकांनी आक्षेप घेतला होता. या खाणींच्या कायदेशीर बाबी आणि नियमावलीबाबत ग्रामस्थांमध्ये संभ्रम आणि असंतोष निर्माण झाला होता.


या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, सध्या सुरू असलेल्या खाणकामाच्या परवानग्या नियमानुसार तात्पुरत्या स्वरूपाच्या आहेत. यावर महसूलमंत्र्यांनी थेट हस्तक्षेप करत निर्देश दिले की, संबंधित गावच्या ग्रामस्थांना विश्वासात घेणे आवश्यक आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः गावकऱ्यांना बोलावून त्यांच्याशी संवाद साधावा आणि खाणकाम सुरू असलेल्या खाणींबाबतची वस्तुस्थिती त्यांना सविस्तर समजावून सांगावी. जर खाणकाम नियमानुसार आणि कायदेशीर चौकटीत सुरू असेल, तर तसे ग्रामस्थांना पटवून द्यावे. या बैठकीतून स्थानिकांच्या तक्रारींचे निरसन करून हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा, अशा स्पष्ट सूचना महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिल्या आहेत.

Comments
Add Comment

MHADA Lottery : म्हाडाच्या दोन हजार ६४० सदनिकांसाठी निघणार सोडत, ७५ हजार १२७ अर्जदारांचे लक्ष

मुंबई : म्हाडा मुंबई (MHADA Mumbai) मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनांतील २,६४० सदनिकांच्या विक्रीसाठी संगणकीय सोडत (MHADA

Maharashtra Weather Update : राज्यात पुन्हा मान्सून सक्रिय! पुढील ४ दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा; 'या' जिल्ह्यांना ऑरेंज-यलो अलर्ट

मुंबई : महाराष्ट्रात मान्सूनने पुन्हा जोर धरला असून पुढील चार दिवस राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाचा जोर कायम

Anil Kakodkar : पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे मार्गासाठी अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती

- 'जीएमआरटी' दुर्बिणीवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करणार; ६० दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश मुंबई :

Sindhu Mahakumbh : सिंधू महाकुंभाच्या राष्ट्रीय एकात्मतेच्या संदेशाचा महाराष्ट्रात गौरव; राज्यपालांच्या हस्ते इंद्रेश कुमार आणि पाल्गा रिंपोचे यांचा सन्मान

मुंबई : लडाख येथे प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या सिंधू महाकुंभ (Sindhu Mahakumbh) उपक्रमाने राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक

Analog Paneer : पनीरच्या ३२ टक्के नमुन्यांमध्ये भेसळ, 'ॲनालॉग पनीर'मध्ये वनस्पती चरबीचा वापर

मुंबई : राज्यात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) बाजारपेठेतून घेतलेल्या पनीरच्या नमुन्यांपैकी तब्बल ३२ टक्के नमुने

Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांनी घेतला करंजा मत्स्य बंदर प्रकल्पाचा आढावा

- ४ हजार ५०० मेट्रिक टन मत्स्य उत्पादन हाताळण्याची क्षमता; अत्याधुनिक यंत्रणेसह अनुभवी मनुष्यबळाचा वापर