राज्य सहकारी बँक आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी Rohit Pawar दोषमुक्त

मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार आणि इतर १६ आरोपींना मुंबई सत्र न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला असून, न्यायालयाने त्यांना दोषमुक्त केले आहे. हा निर्णय आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणातील मूळ एफआयआर बंद करण्यासाठी दाखल केलेला 'क्लोजर रिपोर्ट' न्यायालयाने स्वीकारल्यानंतर न्यायालयाने घेतला आहे. शिखर बँकेने २००७ ते २०१७ दरम्यान साखर कारखाने आणि सूत गिरण्यांना दिलेल्या कर्जवाटपात २५ हजार कोटी रुपयांचा अनियमितता झाल्याचा आरोप होता. रोहित पवार यांच्या 'बारामती ॲग्रो' कंपनीने कन्नड सहकारी साखर कारखाना लिलावात खरेदी केल्याचा व्यवहारही ईडीच्या तपासाच्या कक्षेत होता.ज्यातून आता त्यांना दिलासा मिळाला आहे. सक्तवसुली संचालनालयाने या दोषमुक्ती अर्जाला विरोध केला होता आणि हा निर्णय गुणवत्तेच्या आधारे घेण्यात यावा, अशी मागणी केली होती. विशेष न्यायालयाचे न्यायाधीश महेश जाधव यांनी सर्व १७ आरोपींचे दोषमुक्तीचे अर्ज स्वीकारले आणि हे प्रकरण पूर्णपणे निकालात काढले.यापूर्वीच या प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांच्याशी संबंधित कंपन्यांवरील गुन्हे आर्थिक गुन्हे शाखेने बंद केले होते. या निर्णयामुळे रोहित पवार यांना मोठा कायदेशीर दिलासा मिळाला असून, गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत असलेल्या या प्रकरणाला आता पूर्णविराम मिळाला आहे.

Comments
Add Comment

Mumbai : भटक्या श्वानांची नसबंदी करण्यासाठी BMC ने केला ७० हजार कोटींचा खर्च, एमआयएमच्या नगरसेवकाने मारला हवेत बाण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईतील भटक्या श्वानांची नसबंदी करण्यासाठी संस्थांच्या नेमणुकीला स्थायी समितीने

Mumbai : सायकल ट्रॅक नाही, उद्यानही नाही आणि तरी कोट्यवधींचा देखभालीवर खर्च

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनीभोवतीचा विळखा काढून दहा मीटर परिसर मोकळा करण्यात

Mithi नदीचा गाळ काढण्याच्या प्रस्तावांना मंजुरी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मिठी नदीमधील गाळ काढण्याच्या कंत्राट कामांच्या निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर

BMC स्थायी समिती अध्यक्ष करणार मुंबईतील रस्त्यांची पाहणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : पावसाळा जवळ आला असून अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे तसेच इतर प्रकल्पांची कामे सुुरु

BMC च्या तक्रारींचे होणार जलद निवारण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईकर नागरिकांना नागरी सेवा-सुविधा पुरविताना नागरिकांचा सहभाग वाढवून त्यांच्या

Malegaon : मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातील चारही आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता

मुंबई  : २००६ मधील बहुचर्चित आणि संवेदनशील असलेल्या मालेगाव साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील चार आरोपींना मुंबई