Supreme Court : नागरिकत्व ठरविण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला नाही, एसआयआर प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्ट निरीक्षण

नवी दिल्ली : मतदार यादीत नाव नसल्यामुळे किंवा पुनरीक्षणादरम्यान नाव वगळल्यामुळे एखाद्या व्यक्तीचे भारतीय नागरिकत्व आपोआप संपुष्टात येत नाही, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी नोंदवले. नागरिकत्व निश्चित करण्याचा अधिकार हा निवडणूक आयोगाकडे नसून त्यासाठी स्वतंत्र कायदेशीर प्रक्रिया आहे, असे न्यायालयाने स्पष्ट केले. ( Supreme Court)



पश्चिम बंगालमधील मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाशी (एसआयआर) संबंधित याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने हे मत व्यक्त केले. गेल्या काही महिन्यांपासून देशातील विविध राज्यांमध्ये मतदार याद्यांचे पुनरीक्षण सुरू असून, त्यातून अनेकांची नावे वगळली गेल्याने नागरिकत्वाबाबत संभ्रम निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाच्या निरीक्षणाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.न्यायालयाने स्पष्ट केले की, निवडणूक आयोगाची घटनात्मक जबाबदारी मतदार याद्या तयार करणे, त्यांचे पुनरीक्षण करणे आणि त्यावर नियंत्रण ठेवणे इतकीच मर्यादित आहे. एखाद्या व्यक्तीचे नागरिकत्व ठरविणे हा अधिकार आयोगाकडे नाही. त्यामुळे मतदार यादीतून नाव वगळल्याने त्या व्यक्तीचे नागरिकत्व संपुष्टात येत असल्याचा निष्कर्ष काढता येणार नाही. (Election Commission)



सर्वोच्च न्यायालयाने असेही नमूद केले की, एखाद्या सक्षम प्राधिकरणाने किंवा लवादाने संबंधित व्यक्तीचे नाव मतदार यादीत समाविष्ट न करण्याचा निर्णय दिल्यास, नागरिकत्वाशी संबंधित प्रश्न पुढील निर्णयासाठी संबंधित केंद्रीय मंत्रालयाकडे पाठवावा लागेल. नागरिकत्वाबाबतचा अंतिम निर्णय केवळ कायद्यानुसार निर्धारित प्रक्रियेनंतरच होऊ शकतो.दरम्यान, पश्चिम बंगालमधील एसआयआरची विधानसभा मतदारसंघनिहाय माहिती उपलब्ध करून देण्याची मागणी करणारी याचिकाही सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारली असून, या प्रकरणाची पुढील सुनावणी होणार आहे. न्यायालयाच्या या निरीक्षणामुळे मतदार यादीतील नाव आणि नागरिकत्व या दोन वेगवेगळ्या कायदेशीर बाबी असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

Comments
Add Comment

Narendra Modi : आधुनिक क्रीडा परिसंस्था उभारण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध; पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, २१ व्या शतकासाठी आधुनिक क्रीडा परिसंस्था उभारण्यास

Kanpur Plane Crash : धक्कादायक! कानपूरमध्ये प्रशिक्षण विमान शेतात कोसळले; अनुभवी पायलटसह सह-पायलटचा अंत

कानपूर : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) कानपूर (Kanpur) येथे एक अत्यंत दुःखद घटना घडली आहे. गुरुवारी गंगा नदीच्या

Rule Change From 1st September : LPG गॅस सिलेंडर, आयटीआर अन् थेट तुमच्या...; १ सप्टेंबरपासून बदलणार ५ मोठे नियम!

ऑगस्ट महिना (August Month) अखेरच्या टप्प्यात आला असून १ सप्टेंबरपासून देशात अनेक महत्त्वाच्या आर्थिक आणि प्रशासकीय

Nepal Floods Impact on Bihar and UP : नेपाळच्या पुराचा बिहार-उत्तर प्रदेशालाही धोका; ७ जिल्ह्यांना अलर्ट, पुढील ४८ तास महत्त्वाचे

पाटणा : नेपाळमध्ये आलेल्या भीषण पुराचा परिणाम आता भारतातील सीमावर्ती राज्यांवरही होण्याची शक्यता आहे.

Dating App Gang : 'नको तेच केलं!' डेटिंग ॲपवरून तरुणाला जाळ्यात ओढले अन्...; जयपूरमध्ये ‘गे डेटिंग ॲप गँग’चा पर्दाफाश

जयपूर : गे डेटिंग ॲप्सच्या माध्यमातून तरुणांशी मैत्री करून त्यांना भेटण्यासाठी बोलावायचे आणि त्यानंतर हल्ला

Gandak River : गंडक नदीची पाणीपातळी घटली; बिहारवरील पुराचा धोका टळला

नेपाळ आणि बिहारमधील नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आहे. गंडक म्हणजेच नारायणी नदीची पाणीपातळी वेगाने कमी होत