Ashok Kharat Kharat case : भोंदू खरात प्रकरणात दोषी कितीही प्रभावशाली असला तरी सोडू नका!

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पोलिसांना निर्देश; नाशिक धर्मांतर आणि ड्रग्ज प्रकरणाचाही घेतला आढावा


मुंबई : "भोंदू अशोक खरात प्रकरणात दोषी असणारी व्यक्ती कितीही प्रभावशाली असली तरी तिला सोडता कामा नये. या प्रकरणात पीडित महिलांना पूर्ण संरक्षण देऊन भक्कम पुरावे गोळा करा, जेणेकरून न्यायालयात अपराधसिद्धी (कन्व्हिक्शन) होण्यास मदत होईल", असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना दिले.


राज्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी शनिवारी गृहविभागाची तातडीची आढावा बैठक घेतली. या बैठकीला पोलीस महासंचालक, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, विशेष तपास पथकाचे (एसआयटी) प्रमुख आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी अशोक खरात प्रकरणासह नाशिकमधील धर्मांतर, तसेच गोरेगाव ड्रग्ज आणि परतवाडा येथील प्रकरणांचा विस्तृत आढावा घेण्यात आला.



अशोक खरात प्रकरणात पीडित महिलांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. "पीडित महिलांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण करा. हे प्रकरण न्यायालयात टिकण्यासाठी केवळ कागदोपत्री तपास नको, तर ठोस तांत्रिक आणि परिस्थितीजन्य पुरावे गोळा करण्यावर भर द्या. आरोपींच्या नावापेक्षा गुन्ह्याच्या गांभीर्यावर लक्ष द्या. तपास अशा पद्धतीने करा की कोणीही दोषी सुटता कामा नये. तपासाचा अंतिम उद्देश गुन्हेगाराला शिक्षा मिळवून देणे हाच असावा", असे फडणवीस यांनी बैठकीत बजावले.



धर्मांतर आणि ड्रग्ज विरोधात 'मोहीम'


नाशिकमधील आयटी कंपनीत समोर आलेल्या धर्मांतर प्रकरणाचीही मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेतली. "राज्यात धर्मांतराचे प्रकार अजिबात खपवून घेतले जाणार नाहीत. नाशिक पोलिसांनी हे प्रकरण उजेडात आणले हे अभिनंदनीय आहे, मात्र आता यातील सर्व 'पॅटर्न' आणि 'अँगल' तपासून कसून तपास करा," असे आदेश त्यांनी दिले.




गोरेगाव आणि परतवाडा प्रकरणाची गंभीर दखल


याचबरोबर गोरेगाव आणि परतवाडा येथील प्रकरणावर भाष्य करताना त्यांनी पोलिसांना आक्रमक पवित्रा घेण्यास सांगितले. "ड्रग्ज हे तरुणाईच्या भविष्याला लागलेली वाळवी आहे. त्यामुळे ड्रग्जविरोधात व्यापक मोहीम राबवा. परतवाडा प्रकरणातील पीडितांचे समुपदेशन करून त्यांना तक्रार देण्यासाठी प्रोत्साहित करा आणि यात सामाजिक संस्थांचीही मदत घ्या," असेही त्यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment

Mumbai Monsoon : मुंबईत अखेर मान्सूनची दमदार एन्ट्री! १३ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पावसाचे आगमन; पुढील दोन दिवस यलो अलर्ट

मुंबई : मुंबईकरांची प्रतीक्षा अखेर संपली असून मान्सूनने (Monsoon) मंगळवारी मुंबईत अधिकृतपणे प्रवेश केला आहे. यंदा

BMC News : दिव्यांग व्यक्तींद्वारे निर्मित छत्री व रेनकोटचे मुंबईच्या महापौर आणि आयुक्तांकडून कौतुक

महापौर आणि आयुक्तांनी खरेदी केल्या छत्री मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या नियोजन विभागाच्या सहकार्याने आणि ‘दि

Weather Update : महाराष्ट्रासाठी पुढचे २४ तास महत्त्वाचे ! राज्यातील 3० जिल्ह्यांना यलो अलर्ट; लवकरच मान्सूनचे आगमन होणार ?

Mumbai : मुंबईसह राज्यातील काही भागात मंगळवारी (२३ जून ) ला पावसानी हजेरी लावली. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या

Chandrashekhar Bawankule : अहिल्यानगरमध्ये दारुगोळा, स्फोटके, संरक्षण साहित्य, सौरऊर्जा प्रकल्प

शेती महामंडळाची साडेचार हजार एकर जमीन देण्यास महसूल विभागाची मान्यता मुंबई : अहिल्यानगर जिल्ह्यातील हरेगाव मळा

Bhayandar Accident : भाईंदरमध्ये शाळेच्या बसला डंपरची धडक

भाईंदर : शाळेच्या विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या एका बसला मागून येणाऱ्या डंपरने जोरदार धडक दिल्याची घटना

Devendra Fadnavis : सर्वाधिक मूल्य असलेल्या पिकांच्या नुकसानीच्या आकडेवारीसाठी ड्रोनचा वापर करा

 केळी पिकाच्या विम्यासंदर्भात विधानभवनात बैठक; शेतकऱ्यांना तात्काळ भरपाई देण्याचे आदेश मुंबई, : राज्यातील