Uninterrupted Power Supply : अखंड वीजपुरवठ्यासाठी राज्यात होणार ‘एआय’चा वापर

मुंबई : वाढत्या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर विजेची विक्रमी मागणी पूर्ण करतानाच, वीजनिर्मिती आणि पुरवठ्यात कोणताही व्यत्यय येऊ नये यासाठी आता 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स'चा (एआय) आधार घेतला जाणार आहे. ऊर्जेचे नेटके व्यवस्थापन आणि तांत्रिक बिघाडांचा अंदाज घेण्यासाठी 'एआय'चा प्रभावी वापर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले असून, यामुळे राज्याच्या ऊर्जा क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा नवा अध्याय सुरू होणार आहे.


सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे शनिवारी आयोजित उन्हाळ्यातील 'पीक डिमांड' आणि वीज वितरण व्यवस्थेच्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. उन्हाळ्याचा वाढता तडाखा आणि आगामी पावसाळा या दोन्ही ऋतूंमध्ये वीजपुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता असते. ही अडचण दूर करण्यासाठी केवळ पारंपरिक पद्धतींवर अवलंबून न राहता, ऊर्जा विभागाने तंत्रज्ञानाची जोड द्यावी, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली. विशेषतः मागणीचा अचूक अंदाज वर्तवणे, देखभाल-दुरुस्तीची कामे नियोजित करणे आणि संभाव्य तांत्रिक धोके ओळखण्यासाठी 'एआय' यंत्रणा महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


या बैठकीला ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव लोकेश चंद्रा, प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी यांच्यासह टाटा पॉवर, अदानी पॉवर आणि 'बेस्ट'चे प्रतिनिधी उपस्थित होते. राज्यात सध्या रुफटॉप सौर ऊर्जेचा वापर वाढत असल्याने त्याचा मोठा फायदा वीज व्यवस्थापनात होत असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले. तसेच, वीजनिर्मितीसाठी आवश्यक असलेला कोळसा आणि पाणी यांचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याने राज्यावर विजेचे संकट ओढवणार नाही, अशी ग्वाही प्रशासनाकडून देण्यात आली.


मान्सूनपूर्व कामे युद्धपातळीवर सुरू


मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, मान्सूनपूर्व देखभाल-दुरुस्तीची कामे सध्या युद्धपातळीवर सुरू असून, कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी यंत्रणा पूर्णपणे सज्ज आहे. मात्र, ही सर्व कामे अधिक कार्यक्षमतेने करण्यासाठी आधुनिक सॉफ्टवेअर्सचा वापर अनिवार्य आहे. पावसाळ्यात झाडे पडणे किंवा तांत्रिक बिघाडामुळे होणारा खंड टाळण्यासाठी 'एआय'च्या माध्यमातून रिअल-टाइम मॉनिटरिंग करण्यावर भर दिला जाणार आहे. ग्राहकांना अखंडित वीज मिळावी यासाठी खासगी आणि सरकारी अशा सर्व वीज कंपन्यांनी समन्वयाने काम करावे, असे आदेशही यावेळी देण्यात आले.

Comments
Add Comment

Chandrashekar Bawankule : नायब तहसीलदार ते अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा

 महसूल विभागाच्या सेवा नियमांत ५० वर्षांनी बदल; मुख्यमंत्र्यांकडून प्रस्तावाला मान्यता मुंबई : महसूल

MIDC Maharashtra : वैभववाडी 'MIDC'ला मूर्त रूप, पायाभूत सुविधांची कामे तातडीने सुरू करण्याचे मंत्री उदय सामंतांचे निर्देश

पालकमंत्री नितेश राणे यांच्या पुढाकाराने उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासोबत मंत्रालयात बैठक मुंबई :

Mumbai Police : CJPच्या आंदोलनानंतर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; ८ पोलीस ठाण्यांत ९०० हून अधिक आंदोलकांवर गुन्हे दाखल

मुंबई : मुंबईतील CJP आंदोलनानंतर मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई करत शहरातील आठ वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल

NITI Aayog Investment Index : नीती आयोगाच्या गुंतवणूक अनुकूलता निर्देशांकात महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी

५६.६ गुणांसह गुजरात पहिले; तामिळनाडूचा तिसरा क्रमांक मुंबई(Mumbai) : देशातील राज्यांमध्ये गुंतवणुकीला पोषक वातावरण,

Wardha Crime : वर्ध्यातील रोठा येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरण; मुख्यमंत्र्यांचे जलदगती न्यायालयात खटला चालवण्याचे निर्देश

MUMBAI : वर्धा जिल्ह्यातील रोठा गावात घडलेली १२ वर्षीय मुलीवरील अत्यंत अमानुष क्रूरता आणि हत्येच्या घटनेने संपूर्ण

Mumbai Local Train : मुंबई लोकल दुर्घटना! रुळ ओलांडताना महिलेचा रेल्वेखाली मृत्यू; विद्याविहार-घाटकोपरदरम्यान घडली घटना

मुंबई : मुंबईतील मध्य रेल्वे (Central Railway) मार्गावर सोमवारी सायंकाळी एक दुर्दैवी दुर्घटना (Accident) घडली. विद्याविहार (Vidyavihar)