Unseasonal Rain : अवकाळीचा राज्यातील ६६ हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना फटका

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांत झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतीसह पायाभूत सुविधांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. एकूण ६६ हजार ३१२ शेतकरी या अवकाळी संकटामुळे बाधित झाले असून, बळीराजाला दिलासा देण्यासाठी ५३ कोटी ७३ लाख ७ हजार रुपयांची मदत मंजूर केल्याची माहिती मदतीचा मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी दिली.


शासनाकडून उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील विविध विभागांतील सुमारे ४९ हजार ५११.७२ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे या अवकाळी पावसामुळे नुकसान झाले आहे. यात प्रामुख्याने अमरावती विभागाला निसर्गाच्या कोपाचा सर्वाधिक फटका बसला असून, बुलढाणा आणि यवतमाळ जिल्ह्यांतील ५१ हजार ७२९ शेतकरी बाधित झाले आहेत. या विभागात तब्बल ४२ हजार ३८८.९७ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले असून, त्यासाठी ४२३७.९७ लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे. त्यापाठोपाठ छत्रपती संभाजीनगर विभागात नांदेड, लातूर व बीड जिल्ह्यांमध्ये ८,५१५ शेतकरी बाधित झाले असून, तेथील ३,४९१.०३ हेक्टर क्षेत्रासाठी ४४४.०२ लाख रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे.


पश्चिम महाराष्ट्रात पुणे विभागांतर्गत सोलापूर व सातारा जिल्ह्यांमध्ये ४,५६४ शेतकरी बाधित झाले असून, ९६६.२ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. या जिल्ह्यांसाठी ५७७.९३ लाख रुपयांची मदत शासनाने मंजूर केली आहे. विदर्भातील नागपूर विभागात वर्धा आणि गोंदिया जिल्ह्यांत १,५०४ शेतकऱ्यांचे ६६५.५२ हेक्टर क्षेत्रावरील नुकसान झाले असून, त्यासाठी ११३.१५ लाख रुपयांची मदत प्रस्तावित करण्यात आली आहे.


पंचनामे तातडीने पूर्ण करा! : नुकसानग्रस्तांना ही मदत त्वरित मिळावी यासाठी प्रशासकीय यंत्रणेला पंचनामे जलदगतीने पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मदत वितरण प्रक्रियेत पारदर्शकता आणि वेग राखण्यावर शासनाचा विशेष भर असून, जिल्हाधिकाऱ्यांनी परिस्थितीचा सतत आढावा घेऊन आवश्यक कार्यवाही करावी, अशा सूचना मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी दिल्या आहेत. या निर्णयामुळे पिकांचे नुकसान आणि घरांच्या पडझडीचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना व ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा आधार मिळणार आहे. मदतीची रक्कम थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी शासन स्तरावर विशेष लक्ष दिले जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment

Ahilyanagar Crime : साड्या पाहण्याचा बहाणा केला अन् 14 तोळ्याचे दागिने पळवले

Ahilyanagar Crime News : अहिल्यानगर जिल्ह्यात एक खळबळजनक घटना घडली आहे. साड्या पाहण्याचा बहाणा करत चक्क मैत्रिणीच्याच घरातून 14

Jay Pawar : जय पवार यांची संतप्त प्रतिक्रिया; सुनेत्रा पवारांच्या अपमानावर म्हणाले, "महिलांचा सन्मान कोणत्याही पक्षापेक्षा श्रेष्ठ!"

मुंबई: महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री यांच्याबाबत काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी वापरलेल्या

Central Railway New Rules : रेल्वेच्या नव्या नियमांनुसार विनातिकीट प्रवास, आरक्षित डब्यात घुसखोरी केल्यास आता भरावा लागणार हजारोंचा दंड; जाणून घ्या नवीन नियमांबद्दल

मुंबई : रेल्वे प्रवास अधिक सुरक्षित, शिस्तबद्ध आणि प्रवाशांसाठी सुलभ करण्याच्या उद्देशाने रेल्वे कायदा, १९८९

Pune Crime : पुण्यात ९ महिन्यांच्या बाळाच्या तोंडात फेव्हीक्विक ओतल्याची खळबळजनक घटना!

पुणे : कौटुंबिक वादातून चिडलेल्या एका महिलेने स्वतःच्याच ९ महिन्यांच्या निष्पाप पुतण्याच्या तोंडात अत्यंत

Jalgaon : जळगावात अनधिकृत होर्डिंग्जवर मनपाचा बडगा, नागरिक समित्यांची स्थापना; २४ तासांत कारवाई बंधनकारक

Jalgaon : जळगाव शहरातील अनधिकृत होर्डिंग्ज, बॅनर्स, फ्लेक्स आणि पोस्टर्समुळे शहराचे सौंदर्य बिघडत असून वाहतुकीलाही

Kalyan News : कल्याणमध्ये वैद्यकीय निष्काळजीपणाचा संतापजनक प्रकार; रेबीजचे इंजेक्शन देताना चिमुरड्याच्या कमरेत अडकली तुटलेली सुई!

कल्याण: कल्याण पूर्व भागातून आरोग्याशी संबंधित एका अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे.