Unseasonal Rain : अवकाळीचा राज्यातील ६६ हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना फटका

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांत झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतीसह पायाभूत सुविधांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. एकूण ६६ हजार ३१२ शेतकरी या अवकाळी संकटामुळे बाधित झाले असून, बळीराजाला दिलासा देण्यासाठी ५३ कोटी ७३ लाख ७ हजार रुपयांची मदत मंजूर केल्याची माहिती मदतीचा मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी दिली.


शासनाकडून उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील विविध विभागांतील सुमारे ४९ हजार ५११.७२ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे या अवकाळी पावसामुळे नुकसान झाले आहे. यात प्रामुख्याने अमरावती विभागाला निसर्गाच्या कोपाचा सर्वाधिक फटका बसला असून, बुलढाणा आणि यवतमाळ जिल्ह्यांतील ५१ हजार ७२९ शेतकरी बाधित झाले आहेत. या विभागात तब्बल ४२ हजार ३८८.९७ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले असून, त्यासाठी ४२३७.९७ लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे. त्यापाठोपाठ छत्रपती संभाजीनगर विभागात नांदेड, लातूर व बीड जिल्ह्यांमध्ये ८,५१५ शेतकरी बाधित झाले असून, तेथील ३,४९१.०३ हेक्टर क्षेत्रासाठी ४४४.०२ लाख रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे.


पश्चिम महाराष्ट्रात पुणे विभागांतर्गत सोलापूर व सातारा जिल्ह्यांमध्ये ४,५६४ शेतकरी बाधित झाले असून, ९६६.२ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. या जिल्ह्यांसाठी ५७७.९३ लाख रुपयांची मदत शासनाने मंजूर केली आहे. विदर्भातील नागपूर विभागात वर्धा आणि गोंदिया जिल्ह्यांत १,५०४ शेतकऱ्यांचे ६६५.५२ हेक्टर क्षेत्रावरील नुकसान झाले असून, त्यासाठी ११३.१५ लाख रुपयांची मदत प्रस्तावित करण्यात आली आहे.


पंचनामे तातडीने पूर्ण करा! : नुकसानग्रस्तांना ही मदत त्वरित मिळावी यासाठी प्रशासकीय यंत्रणेला पंचनामे जलदगतीने पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मदत वितरण प्रक्रियेत पारदर्शकता आणि वेग राखण्यावर शासनाचा विशेष भर असून, जिल्हाधिकाऱ्यांनी परिस्थितीचा सतत आढावा घेऊन आवश्यक कार्यवाही करावी, अशा सूचना मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी दिल्या आहेत. या निर्णयामुळे पिकांचे नुकसान आणि घरांच्या पडझडीचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना व ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा आधार मिळणार आहे. मदतीची रक्कम थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी शासन स्तरावर विशेष लक्ष दिले जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment

Nashik Crime News : पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या टवाळखोरांचा आणखी एक हादरवणारा व्हिडीओ समोर, थेट कुटुंबियांच्या गाडीला लटकला अन्...

Nashik Crime News : इगतपुरीत पर्यटकांच्या गाडीचा पाठलाग करून तसेच कुटुंबाला मारहाण करणाऱ्या गुंडाच्या हैदोसाचा आणखी एक

Iran-Us War : 'होर्मुझ सुरक्षित पार केलं'... काही मिनिटांतच झाला हल्ला; भारतीय इंजिनिअरचा मृत्यू

Iran-Us War : होर्मुझ सामुद्रधुनी (Strait of Hormuz) येथे मालवाहू जहाजावर (Container Vessel) झालेल्या हल्ल्यात भारतीय खलाशी हेरंब करमरकर

Jayant Patil : माझा आणि प्रफुल पटेल, तटकरे यांच्या मुख्यमंत्री भेटीचा संबंध नाही - जयंत पाटील

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या 'वर्षा' या शासकीय निवासस्थानी मंगळवारी रात्री घडलेल्या

Mumbai-Goa Highway Accident : मुंबई-गोवा महामार्गावर भीषण दुर्घटना! गोव्याहून परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला; ३ जणांचा जागीच मृत्यू

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघात झाला असून गोव्याहून मुंबईकडे परतणाऱ्या एका कुटुंबावर

FIFA World Cup 2026 : मेस्सीला मागे टाकण्याची सुवर्णसंधी हुकली! स्पेनकडून फ्रान्सचा पराभव, म्बाप्पेचे 'हॅट्ट्रिक फायनल'चे स्वप्नही भंगले

फ्रान्सचा स्टार स्ट्रायकर किलियन म्बाप्पे याचे सलग तिसऱ्यांदा फिफा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचण्याचे

IND vs ENG 1st ODI : ज्यांना टी-20 मध्ये वगळलं त्यांनीच वनडे गाजवली!

IND vs ENG 1st ODI : टीम इंडियाने (Team India) इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या वनडे (ODI) सामन्यात दमदार विजय मिळवत तीन सामन्यांच्या