Pawan Khera : काँग्रेसच्या पवन खेराला आसाम पोलीस अटक करणार ?

नवी दिल्ली : काँग्रेस नेता पवन खेराला आसाम पोलीस अटक करण्याची शक्यता वाढली आहे. काही दिवसांपूर्वी पवन खेराने सोशल मीडिया पोस्ट करून आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या पत्नीच्या संपत्ती संदर्भात गंभीर आरोप केले होते. या प्रकरणी तपास केल्यावर आरोप तथ्यहीन असल्याचे आढळले. या नंतर पवन खेराच्या विरोधात मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या पत्नीने पवन खेरा विरोधात फेक न्यूजद्वारे बदनामी केल्याचा आरोप करत तक्रार नोंदवली. तसेच मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबाला बदनामा करण्याच्या कट कारस्थानात मुख्य भूमिका बजावत असल्याचाही आरोप केला.



मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर तथ्यहीन आरोप करणे भोवणार याची जाणीव होताच पवन खेरा तातडीने दिल्लीहून तेलंगणात जाऊन थांबला. तिथून त्याने ट्रान्झिट जामीनसाठी अर्ज केला. तेलंगणाच्या उच्च न्यायालयाने हा जामीन मंजूर केला. या जामिनाविरोधात आसाम पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली. सर्वोच्च न्यायालयाने प्रकरण समजून घेतल्यानंतर पवन खेरा यांना गुन्हा आसाममध्ये दाखल झाला असल्यामुळे तिथल्या न्यायालयात जामिनासाठी अर्ज करण्याचे निर्देश दिले. तसेच तेलंगणाच्या उच्च न्यायालयाने मंजूर केलेला जामीन रद्द केला.


सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे आता पवन खेरा याच्यापुढे आसाममध्ये जाऊन न्यायालयात दाद मागणे अथवा आसाम पोलिसांच्या चौकशीला सामोरे जाणे हेच दोन पर्याय उरले आहेत. सध्या पवन खेराकडे अटक टाळणारे कोणतेही संरक्षण कवच नाही. यामुळे पवन खेराला आसाममध्ये पोहोचल्यावर अटक होण्याची दाट शक्यता आहे.



याआधी तेलंगणाच्या उच्च न्यायालयाने पवन खेराला दिलेल्या ट्रान्झिट जामिनाच्या विरोधात आसाम पोलिसांनी महाधिवक्ता तुषार मेहता यांच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली. घटना आसाममध्ये घडली. गुन्हा आसाममध्ये दाखल झाला. तपास आसाम पोलीस करत आहेत. या परिस्थितीत तेलंगणा उच्च न्यायालयाने अटकपूर्व ट्रान्झिट जामीन का दिला ? हे अधिकारक्षेत्राबाहेर अटकपूर्व जामीन मंजूर करण्याचे प्रकरण आहे; असे मेहता म्हणाले. हा मुद्दा ग्राह्य धरून सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला. तेलंगणा उच्च न्यायालयाने दिलेला अटकपूर्व ट्रान्झिट जामीन रद्द करत सर्वोच्च न्यायालयाने पवन खेराला आसाममधील न्यायालयात जामिनासाठी अर्ज करण्याचे निर्देश दिले.

Comments
Add Comment

Examination Reform Bill : संसदेत परीक्षा सुधारणा विधेयक सादर; विरोधकांच्या गदारोळात लोकसभा-राज्यसभेचे कामकाज तहकूब

नवी दिल्ली : देशभरात गाजलेल्या नीट पेपरफुटी (NEET Exam) प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सार्वजनिक परीक्षा

Nashik-Mumbai Highway : घोटी–सिन्नर फाटा उड्डाणपुलावर ट्रक दुभाजकाला धडकून उलटला अन्...महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

घोटी : नाशिक–मुंबई महामार्गावर (Nashik-Mumbai Highway) घोटी–सिन्नर (Ghoti Sinner) फाटा उड्डाणपुलावर आज एक भीषण अपघात घडला. विटांनी

Transportation Guidelines : विद्यार्थी वाहतूक अधिक सुरक्षित करण्यासाठी सरकारची नवी नियमावली;उल्लंघन करणाऱ्या चालकांवर होणार कठोर कारवाई

मुंबई : राज्य शासनाने शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी महाराष्ट्र मोटार वाहन नियम,२०२६ अंतर्गत

Mirabai Chanu : मीराबाई चानूचा सुवर्ण जलवा! ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेत हॅट्रिक, पंतप्रधान मोदींसह देशभरातून कौतुकाचा वर्षाव

नवी दिल्ली : भारतीय वेटलिफ्टिंगची स्टार खेळाडू मीराबाई चानूने (Mirabai Chanu) पुन्हा एकदा इतिहास रचला आहे. ग्लासगो येथे

Nashik Accident News : नवविवाहित दांपत्याचा भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू

Nashik Accident News : नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यात भीषण रस्ता अपघातात नवविवाहित पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची

Mumbai Pune Railway : घाटात दरड कोसळली तरी वाहतूक थांबणार नाही; मुंबई-पुणे रेल्वेप्रवास आता अधिक सुरक्षित, 'हा' मोठा बदल होणार!

मुंबई-पुणे रेल्वे प्रवाशांसाठी अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. पावसाळ्यात दरडी कोसळल्यामुळे होणारा