Pawan Khera : काँग्रेसच्या पवन खेराला आसाम पोलीस अटक करणार ?

नवी दिल्ली : काँग्रेस नेता पवन खेराला आसाम पोलीस अटक करण्याची शक्यता वाढली आहे. काही दिवसांपूर्वी पवन खेराने सोशल मीडिया पोस्ट करून आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या पत्नीच्या संपत्ती संदर्भात गंभीर आरोप केले होते. या प्रकरणी तपास केल्यावर आरोप तथ्यहीन असल्याचे आढळले. या नंतर पवन खेराच्या विरोधात मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या पत्नीने पवन खेरा विरोधात फेक न्यूजद्वारे बदनामी केल्याचा आरोप करत तक्रार नोंदवली. तसेच मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबाला बदनामा करण्याच्या कट कारस्थानात मुख्य भूमिका बजावत असल्याचाही आरोप केला.



मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर तथ्यहीन आरोप करणे भोवणार याची जाणीव होताच पवन खेरा तातडीने दिल्लीहून तेलंगणात जाऊन थांबला. तिथून त्याने ट्रान्झिट जामीनसाठी अर्ज केला. तेलंगणाच्या उच्च न्यायालयाने हा जामीन मंजूर केला. या जामिनाविरोधात आसाम पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली. सर्वोच्च न्यायालयाने प्रकरण समजून घेतल्यानंतर पवन खेरा यांना गुन्हा आसाममध्ये दाखल झाला असल्यामुळे तिथल्या न्यायालयात जामिनासाठी अर्ज करण्याचे निर्देश दिले. तसेच तेलंगणाच्या उच्च न्यायालयाने मंजूर केलेला जामीन रद्द केला.


सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे आता पवन खेरा याच्यापुढे आसाममध्ये जाऊन न्यायालयात दाद मागणे अथवा आसाम पोलिसांच्या चौकशीला सामोरे जाणे हेच दोन पर्याय उरले आहेत. सध्या पवन खेराकडे अटक टाळणारे कोणतेही संरक्षण कवच नाही. यामुळे पवन खेराला आसाममध्ये पोहोचल्यावर अटक होण्याची दाट शक्यता आहे.



याआधी तेलंगणाच्या उच्च न्यायालयाने पवन खेराला दिलेल्या ट्रान्झिट जामिनाच्या विरोधात आसाम पोलिसांनी महाधिवक्ता तुषार मेहता यांच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली. घटना आसाममध्ये घडली. गुन्हा आसाममध्ये दाखल झाला. तपास आसाम पोलीस करत आहेत. या परिस्थितीत तेलंगणा उच्च न्यायालयाने अटकपूर्व ट्रान्झिट जामीन का दिला ? हे अधिकारक्षेत्राबाहेर अटकपूर्व जामीन मंजूर करण्याचे प्रकरण आहे; असे मेहता म्हणाले. हा मुद्दा ग्राह्य धरून सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला. तेलंगणा उच्च न्यायालयाने दिलेला अटकपूर्व ट्रान्झिट जामीन रद्द करत सर्वोच्च न्यायालयाने पवन खेराला आसाममधील न्यायालयात जामिनासाठी अर्ज करण्याचे निर्देश दिले.

Comments
Add Comment

Mumbai Rain : मुंबईत मुसळधार पावसाचा तडाखा! २९१ ठिकाणी झाडे कोसळली, २२ ठिकाणी भिंती-घरांचे नुकसान; पुढील २४ तास अतिवृष्टीचा इशारा

मुंबईत सोमवारी (६ जुलै) दिवसभर मुसळधार पावसाने हजेरी लावली असून शहरातील जनजीवनावर त्याचा मोठा परिणाम झाला आहे.

Flood in Indrayani : इंद्रायणीला पूर; वारकऱ्यांसाठी सरकारचे महत्त्वाचे आवाहन! आळंदीत न जाण्याचे प्रशासनाचे आवाहन

पुणे : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यानिमित्त आळंदीकडे निघालेल्या वारकरी आणि भाविकांसाठी राज्य

Nashik : नाशिक जिल्ह्यात 1,148 विद्यार्थ्यांकडून 26 हजार 891 वारकऱ्यांची चरणसेवा, मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचा उपक्रम

Nashik : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत

Cristiano Ronaldo : ‘हाच माझा शेवटचा विश्वचषक!’ क्रिस्टियानो रोनाल्डोच्या भावनिक घोषणेनंतर फुटबॉलप्रेमींना मोठा धक्का

नवी दिल्ली : जागतिक फुटबॉलमधील महान खेळाडूंपैकी एक असलेल्या क्रिस्टियानो रोनाल्डोने (Cristiano Ronaldo) आपल्या

Baruipur Murder Case : गुप्तांगांवर जखमा, डोक्यावर प्रहार अन् १२ वर्षीय मुलीवर पाशवी बलात्कार; पश्चिम बंगाल हादरले!

पश्चिम बंगालमधील दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील बारुईपूर येथे एका १२ वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार

Nashik Crime : फेसबुकवरील ‘फ्रेंडशिप’ ठरली कोट्यवधींचा सापळा ! नाशिक सायबर पोलिसांनी उघड केला 5.45 कोटींचा नोकरी घोटाळा

Nashik Crime : फेसबुकवर मैत्री, मंत्रालयात ओळख असल्याचा दावा अन सरकारी नोकरी मिळवून देण्याचे आमिष आणि त्यानंतर कोट्यवधी