पर्यावरणप्रेमी की पर्यावरणाला हानीकारक आहे EV ?

नवी दिल्ली : दिल्ली सरकारने ‘ईव्ही धोरण २.०’ अंतर्गत विद्युत वाहनांना प्रदूषणाविरुद्ध प्रभावी पर्याय म्हणून प्रोत्साहन दिले आहे; मात्र, या वाहनांमधील वापरून झालेल्या बॅटऱ्यांची असुरक्षित विल्हेवाट पर्यावरण आणि मानवी आरोग्यासाठी गंभीर धोका निर्माण करत असल्याची चिंता व्यक्त होत आहे. संशोधकांच्या मते, विद्युत वाहनांचे पर्यावरणपूरक फायदे त्यांच्या मागे उरणाऱ्या शिसे (लेड) आणि आम्ल (ॲसिड) प्रदूषणामुळे कमी होत आहेत.


ई-रिक्षाचा विचार करता, एका वाहनात सरासरी चार ‘लेड-ॲसिड’ बॅटऱ्या वापरल्या जातात. प्रत्येक बॅटरीमध्ये सुमारे २० किलो शिसे आणि १० किलो सल्फ्यूरिक आम्ल असते. या बॅटऱ्यांचे आयुष्यमान अवघे सात ते आठ महिने असल्याने, दरवर्षी मोठ्या प्रमाणावर नवीन बॅटऱ्यांची गरज निर्माण होते; त्याचवेळी जुन्या बॅटऱ्या कचऱ्यात परिवर्तित होतात. ‘बॅटरी कचरा व्यवस्थापन नियम २०२२’ अस्तित्वात असतानाही बॅटऱ्यांची पुनर्प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर अनौपचारिक आणि बेकायदा केली जात असल्याचे दिसून येते. २०२२ मध्ये देशात सुमारे एक लाख टन बॅटरी कचरा निर्माण झाला असून, त्यातील मोठा हिस्सा असंघटित व असुरक्षित कारखान्यांकडे वळत आहे.


ई-कचरा निर्मितीत गुजरात राज्य आघाडीवर असून त्यानंतर महाराष्ट्र, उत्तराखंड, तेलंगणा आणि तामिळनाडू यांचा क्रमांक लागतो. दिल्लीत दरवर्षी सुमारे दोन लाख टन ई-कचरा निर्माण होतो; मात्र, यापैकी ९५ टक्क्यांहून अधिक कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावली जात नाही; केवळ पाच टक्के कचऱ्याचेच योग्य पुनर्प्रक्रिया केली जाते. उर्वरित कचरा पर्यावरणासाठी घातक ठरत आहे.


तज्ज्ञांच्या मते, केवळ नियम बनविणे पुरेसे नाही; त्यांची प्रभावी अंमलबजावणी होणे अत्यावश्यक आहे. उत्पादक, किरकोळ विक्रेते, ई-कॉमर्स व्यासपीठे आणि ग्राहक यांचा समावेश असलेली सक्षम परिसंस्था विकसित करणे गरजेचे आहे. ‘रिव्हर्स लॉजिस्टिक्स’च्या माध्यमातून वापरलेल्या बॅटऱ्या परत गोळा करून त्यांची सुरक्षित पुनर्प्रक्रिया करणे अनिवार्य करणे आवश्यक आहे. दिल्ली सरकारने नव्या धोरणात बॅटरी पुनर्प्रक्रियेला प्राधान्य दिले असून, विद्युत वाहनांच्या बॅटऱ्यांपैकी किमान २० टक्के पुनर्प्रक्रिया अनिवार्य करण्याचा प्रस्ताव आहे. सुरक्षित आणि संघटित कचरा व्यवस्थापन प्रणाली विकसित करण्यावर सरकारचा भर आहे.


बॅटरी कचऱ्याचे प्रभावी व्यवस्थापन करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांनी काटेकोर अंमलबजावणी करणे अत्यावश्यक आहे. - अनिल राय चौधरी, कार्यकारी संचालक, सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायर्नमेंट

Comments
Add Comment

Vietnamese President To Lam : व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लाम यांनी पंतप्रधान मोदींची हैदराबाद हाऊसमध्ये भेट

नवी दिल्ली : तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आलेले व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लाम यांनी आज हैदराबाद हाऊस येथे

Shimla Court : शिमला येथे न्यायालय आणि उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय उडवण्याची धमकी

“दिल्लीपर्यंत आवाज जाईल” असा पोस्टरमधून इशारा, सुरक्षा यंत्रणा सतर्क शिमला : हिमाचल प्रदेशातील शिमला येथील तीन

Vande Mataram : ‘वंदे मातरम्’चा अपमान करणे आता गंभीर गुन्हा; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, कायद्यात दुरुस्ती

नवी दिल्ली : देशभक्तीशी निगडित प्रतीकांचा सन्मान अबाधित ठेवण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. ‘वंदे

Supreme Court News : सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांची संख्या वाढणार; केंद्र सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली : केंद्र सरकारने देशातील न्यायव्यवस्था अधिक सक्षम आणि जलद करण्याच्या दिशेने मोठं पाऊल उचललं आहे.

Scooter Blast Near BSF Headquarters : BSF मुख्यालयाजवळ स्कूटरचा स्फोट; जालंधरमध्ये खळबळ, सर्व बाजूंनी तपास सुरू

पंजाब : पंजाबमधील जालंधर जिल्ह्यात सीमा सुरक्षा दल (BSF) मुख्यालयाजवळ अचानक स्कूटरचा स्फोट झाल्याची धक्कादायक

Bharat Electronics Limited : संरक्षण मंत्रालयाचा भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड सोबत 1476 कोटींचा करार

नवी दिल्ली : संरक्षण मंत्रालयाने भारतीय लष्करासाठी किमान पाच ग्राउंड-बेस्ड मोबाईल इलेक्ट्रॉनिक सिस्टीमच्या