Nari Shakti Vandan Adhiniyam : ‘नारी शक्ती वंदन’ विधेयक भारताचे भविष्य बदलेल

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास; महिला खासदारांची संख्या ४० टक्के पार होणार


मुंबई : मोदी सरकारने आणलेले ‘नारी शक्ती वंदन’ विधेयक देशाच्या लोकशाहीला नवे वळण देणारी ‘वॉटरशेड मूव्हमेंट’ ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी व्यक्त केला. या आरक्षणामुळे २०२९ च्या लोकसभा निवडणुकीत महिला खासदारांची संख्या ३३ टक्क्यांवर मर्यादित न राहता, ती ४० टक्क्यांचा टप्पा ओलांडेल, असे प्रतिपादनही त्यांनी केले.


दादर येथील योगी सभागृहात आयोजित ‘नारी शक्ती वंदन महिला संमेलना’त मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी व्यासपीठावर अभिनेत्री पद्मश्री रवीना टंडन, वैशाली सामंत, प्राजक्ता माळी, भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम, माजी महापौर रितू तावडे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले की, "यापूर्वी दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि मनमोहन सिंग यांच्या काळातही आरक्षणाचे प्रयत्न झाले. मात्र, तत्कालीन घटक पक्षांचा विरोध आणि अन्य कारणांमुळे हे विधेयक प्रलंबित राहिले. पंतप्रधान मोदींनी मात्र ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’पासून सुरू केलेला प्रवास आता महिलांना संसदेत हक्काचे स्थान देण्यापर्यंत यशस्वीरीत्या पोहोचवला आहे."


जनगणना आणि मतदारसंघ पुनर्रचनेमुळे आरक्षण लांबणीवर पडेल, असा संभ्रम विरोधक पसरवत असल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला. ते म्हणाले की, "२०११ च्या जनगणनेच्या आधारावरच ही प्रक्रिया राबवली जाणार असून २०२९ च्या निवडणुकीत लोकसभेत महिला खासदारांचा आकडा थेट २७३ वर पोहोचलेला दिसेल. सध्या जिथे आरक्षण नाही, तिथेही महिला स्वबळावर निवडून येत आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष संसदेत महिलांचे प्रतिनिधित्व ४० टक्क्यांच्या पुढे जाईल."


प्रगत भारताचे शुभसंकेत : महाराष्ट्रात मुख्य सचिव, पोलीस महासंचालक, वन प्रमुख आणि मुंबई महापालिका आयुक्त यांसारख्या सर्वोच्च पदांवर महिलांची नियुक्ती ही आरक्षणामुळे नव्हे, तर त्यांच्या सक्षमतेमुळे झाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ५० टक्के आरक्षण असताना प्रत्यक्षात ५५ ते ५९ टक्के महिला निवडून येत आहेत. आता ‘सरपंच पती’ किंवा ‘नगरसेविका पती’ ही संकल्पना इतिहासजमा झाली असून महिला स्वतः खंबीर नेतृत्व करत आहेत. विद्यापीठांच्या पदवीदान समारंभात मुलीच सर्वाधिक सुवर्णपदके पटकावत आहेत, हे नव्या प्रगत भारताचे शुभसंकेत आहेत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.


विरोधकांना दिला इशारा : "काही लोक तांत्रिक कारणांचा आधार घेत छुप्या पद्धतीने या विधेयकाला विरोध करत आहेत, त्यांचा खरा चेहरा लवकरच जनतेसमोर येईल," असा इशारा फडणवीस यांनी दिला. या विधेयकासाठी आपण राज्यातील सर्व पक्षांच्या प्रदेशाध्यक्षांना पत्र लिहून पाठिंब्याची विनंती केली असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. केवळ भाषणात नारी सशक्तीकरणाच्या गप्पा न मारता कृतीत आणण्याची हीच वेळ आहे, असे आवाहन त्यांनी केले.

Comments
Add Comment

Inflation News : घाऊक महागाई दर जून महिन्यात वाढून 9.87 टक्क्यांवर

नवी दिल्ली : किरकोळ महागाईनंतर आता घाऊक महागाई दरातही वाढ नोंदवली गेली आहे. अन्न व बिगर-अन्न वस्तूंच्या

Direct Tax Collection : देशाचे प्रत्यक्ष कर संकलन 16.40 टक्क्यांनी वाढून पोहोचले 6.51 लाख कोटी रुपयांवर

नवी दिल्ली : चालू आर्थिक वर्ष 2026-27 मध्ये 13 जुलैपर्यंतचे निव्वळ प्रत्यक्ष कर संकलन 16.40 टक्क्यांनी वाढून 6.51 लाख कोटी

Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ला; लष्कर-ए-तोयबा प्रमुख हाफिज सईदविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी

जम्मू : पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या सुरू असलेल्या तपासाच्या संदर्भात, एका विशेष एनआयए न्यायालयाने

India Spain Relations : भारत-स्पेन आर्थिक भागीदारीला नवी चालना, उच्चस्तरीय बैठकींमधून व्यापार आणि गुंतवणुकीवर भर

नवी दिल्ली : केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्या १३ जुलै २०२६ रोजी सुरू झालेल्या अधिकृत स्पेन

Hormuz Strait Attack : होर्मुझ हल्ल्यात भारतीय नाविकाच्या मृत्यूनंतर भारताने इराणी दूतावासाला बजावले समन्स

नवी दिल्ली : इराणच्या होर्मुझ सामुद्रधुनीत संयुक्त अरब अमिरातीच्या (युएई) तेलवाहू जहाजांवर झालेल्या हल्ल्यात

Lalu Prasad Yadav : चारा घोटाळा प्रकरणी लालू प्रसाद यादव यांचा जामीन कायम, सीबीआयची याचिका फेटाळली

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने यांना मोठा दिलासा दिला आहे. चारा घोटाळा प्रकरणात दोषी ठरल्यानंतर लालू प्रसाद