Women's Reservation Bill : सुधारित महिला आरक्षण विधेयक संसदेच्या विशेष अधिवेशनात सादर होणार, काय असेल यात तपशील उघड

नवी दिल्ली : महिलांना लवकरच संसद आणि विधीमंडळात ३३ टक्के आरक्षण मिळणार आहे. या विधेयकाचा सुधारित मसुदा मंजुरीसाठी संसदेच्या १६ ते १८ एप्रिल दरम्यान होणाऱ्या विशेष अधिवेशनात दोन्ही सभागृहात सादर होणार आहे.


देशाच्या संसदेने सप्टेंबर २०२३ मध्ये नारी शक्ती वंदन अधिनियम हे विधेयक मंजूर केले. हे करताना महिलांचे आरक्षण नवीन जनगणना आणि मतदारसंघ पुनर्रचनेशी जोडले होते. कोरोना संकटामुळे जनगणनेला विलंब झाल्याने २०११ च्या जनगणनेच्या आकडेवारीनुसार देशात महिला आरक्षण लागू करण्यासाठी गुरुवार ते शनिवार, १६ ते १८ एप्रिल २०२६ या कालावधीत संसदेच्या विशेष अधिवेशनात नवे विधेयक सादर होण्याची शक्यता आहे. नव्या विधेयकाला संसदेच्या दोन्ही सभागृहांनी मंजुरी दिली तर संसदेतील महिलांचे प्रतिनिधित्व वाढणार आहे. याचा थेट फायदा राजकीय क्षेत्रातील महिलांना होणार आहे.


देशाचे विधी व न्याय मंत्री (कायदा मंत्री) अर्जुन राम मेघवाल संसदेत सुधारित विधेयक सादर करणार आहेत.



नवीन विधेयकात या तरतुदी असतील


या विधेयकाद्वारे लोकसभेच्या जागांच्या संख्येत वाढ केली जाणार आहे. त्यामुळे लोकसभेतील सदस्यांची संख्या ८५० इतकी होईल. यापैकी ८१५ जागा राज्यांमध्ये आणि ३५ जागा केंद्रशासित प्रदेशामध्ये असतील, महिलांचे हे आरक्षण २०३९ च्या निवडणुकीपर्यंत लागू राहण्याची राहणार असून प्रत्येक निवडणुकीनुसार राखीव जागा आळीपाळीने दिल्या जातील.



सीमांकन आयोग आणि उद्देश



  • महिला आरक्षण विधेयकासोबतच सीमांकन आयोग स्थापन करण्यासाठी विधेयक सादर केले जाणार आहे.

  • आयोगात न्यायालयाचे निवृत्त किंवा विद्यमान न्यायाधीश असतील

  • हा आयोग सीमांची पुनर्रचना, राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांतील जागांची संख्या वाढवणे यासाठी एक सूत्र ठरवून काम करणार आहे.


सध्या राज्यात भाजपच्या चित्र वाघ या नारीशक्ती अधिनियम विधेयक अंतर्गत राजकारणातील अनेक महिलांची भेट घेऊन त्यांना मिस्ड कॉल द्यायला लावून आपला हातभार महिलांच्या ३३ टक्के आरक्षणाला लावावा असे आवाहन करत आहेत.

Comments
Add Comment

Bihar : बिहारमध्ये बुधवारी सकाळी तीन नेतेच घेणार शपथ

पाटणा : जवळपास दोन दशकं बिहारचे नेतृत्व करणाऱ्या नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा दिला. आता ते

Chhattisgarh : वीज प्रकल्पात बॉयलरचा स्फोट, अनेकांचा मृत्यू

शक्ती : छत्तीसगडमधील शक्ती जिल्ह्यात वेदांता कंपनीच्या वीज निर्मिती प्रकल्पात बॉयलरचा स्फोट झाला. या स्फोटात नऊ

Ashok Kharat Case : अशोक खरातला पुन्हा ५ दिवसांची पोलिस कोठडी

नाशिक : भोंदूगिरी व महिलांच्या शोषणाच्या आरोपांमध्ये अडकलेल्या अशोक खरातच्या अडचणी आणखी वाढल्या असून,

Crime : मानवी तस्करी प्रकरणी ८ अटकेत, १६३ मुलांची सुटका

कटनी : बिहारमधून महाराष्ट्रात नेण्यात येत असलेल्या १६३ मुलांना मध्य प्रदेशातील कटनी रेल्वे स्थानकावर रविवारी

पर्यावरणप्रेमी की पर्यावरणाला हानीकारक आहे EV ?

नवी दिल्ली : दिल्ली सरकारने ‘ईव्ही धोरण २.०’ अंतर्गत विद्युत वाहनांना प्रदूषणाविरुद्ध प्रभावी पर्याय म्हणून

US-Iran Tensions : अमेरिका-इराण तणावात फ्रान्सची मध्यस्थी, पॅरिसमध्ये होणार मोठी बैठक

पॅरिस : पश्चिम आशियामध्ये युद्धाचे ढग दाटून आले असताना कूटनीतीची एक नवी किरण दिसू लागली आहे. फ्रान्सचे