Ashok Kharat Case : नाशिकमध्ये ईडीची मोठी कारवाई; भोंदू खरातची लक्झरी कार जप्त, मालमत्ता संलग्नीत

नाशिकमध्ये भोंदूगिरी करून लोकांची फसवणूक केल्याच्या आरोपातील अशोक खरात प्रकरणात अंमलबजावणी संचालनालय (ईडी) ने मोठी कारवाई करत त्याच्या लक्झरी कारची जप्ती केली असून इतर मालमत्ताही त्याला अटॅच करण्यात आली आहे. सोमवारी सकाळपासून रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती.


एका पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीपासून चौकशीला सुरुवात :


या प्रकरणाची सुरुवात १८ मार्च रोजी एका पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीपासून झाली होती. त्यानंतर संदीप कर्णिक, पोलीस आयुक्त, नाशिक यांनी हा तपास गुन्हे शाखेकडे सोपवला होता. पोलिसांनी कारवाई करत अशोक खरात यांना अटक केली होती. स्वतःला “कॅप्टन” आणि भविष्यवेत्ता असल्याचा दावा करणाऱ्या खरात याच्यावर फसवणुकीचे गंभीर आरोप आहेत.



चौकशीसाठी स्वतंत्र एसआयटीची स्थापना :


तपासादरम्यान न्यायालयाने आठ दिवसांची पोलीस कोठडी दिली होती. त्यानंतर या प्रकरणाची गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार स्वतंत्र एसआयटी स्थापन करण्यात आली होती. या एसआयटीचे नेतृत्व आयपीएस अधिकारी सातपुते यांच्याकडे सोपवण्यात आले.


दरम्यान, सुमारे दीड महिन्याच्या तपासानंतर ईडीने प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात केली. सोमवारी १३ एप्रिल रोजी अशोक खरात यांच्या नाशिक येथील निवासस्थानी तसेच सिन्नर येथील आश्रमावर छापे टाकण्यात आले.



या छाप्यांदरम्यान ईडीने खरात यांची लक्झरी कार जप्त केली असून इतर काही मालमत्तांवरही अटॅचमेंटची कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे प्रकरणातील तपास अधिक वेगाने पुढे जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.


नाशिक शहरात मागील महिन्यात, १८ मार्च २०२६ रोजी नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिलेल्या आदेशानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मुदगल यांनी खरात यांच्यावर कारवाई केली होती. धर्माच्या नावावर महिलांचे लैंगिक शोषण व आर्थिक फसवणूक केल्याच्या आरोपांवरून अशोक खरात याच्या गोविंदनगरजवळील कर्मयोगी नगर येथील घरावर पहाटे छापा टाकण्यात आला होता. या कारवाईत अशोक खरात याला अटक करण्यात आली होती. एका महिलेने तक्रार दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याचे पोलीस प्रशासनाने अधिकृतरित्या सांगितले होते. त्यानंतर नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात एकूण सहा गुन्हे दाखल करण्यात आले होते.

Comments
Add Comment

Ahilyanagar : नीट परीक्षेत कमी गुण मिळाले अन् विद्यार्थिनीने टोकाचे पाऊल उचलले ; सुसाईड नोटमध्ये लिहिलं आत्महत्येचं कारण

Ahilyanagar : नीट परीक्षेत अपेक्षित गुण न मिळाल्याच्या नैराश्यातून १९ वर्षीय विद्यार्थिनीने टोकाचे पाऊल उचलल्याची

BENDUR FESTIVAL : सर्जा-राजाप्रती कृतज्ञतेचा उत्सव; महाराष्ट्रातील पारंपरिक 'बेंदूर' सणाची परंपरा आणि महत्त्व

भारतीय संस्कृती ही कृषीसंस्कृतीवर आधारलेली असून, या मातीतील प्रत्येक सण-उत्सव हा थेट प्रकृती आणि

Shahapur Rain : शहापूरात पावसाचा कहर! हनुमान धबधब्यावर भीषण दुर्घटना; ५ पर्यटक वाहून गेले

शहापूर : ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात (Shahapur Rain) झालेल्या ढगफुटीसदृश मुसळधार पावसामुळे हनुमान धबधब्यावर मोठी

Maharashtra Monsoon Weather : पावसाचा पुन्हा जोर! पुढील २४ तास अतिमहत्त्वाचे; महाराष्ट्रातील २२ जिल्ह्यांना हवामान खात्याचा इशारा

मुंबई : जुलैच्या अखेरच्या आठवड्यात महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाने जोरदार पुनरागमन केले आहे. उत्तर-पश्चिम

Dam Water Level : राज्यात ५६ टक्के उपयुक्त पाणीसाठा, मराठवाड्यात मात्र चिंता कायम

पुणे : जुलै महिन्यात झालेल्या समाधानकारक पावसामुळे राज्यातील धरणांमधील उपयुक्त पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली

Dog Attack : रेबीजमुळे चिमुकल्या समर्थ स्वामीचा दुर्दैवी मृत्यू; भटक्या कुत्र्यांवर कारवाईची मागणी

सोलापूर : भवानी पेठ परिसरातील घोंगडे वस्ती येथे कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या समर्थ स्वामी या