Crime : मानवी तस्करी प्रकरणी ८ अटकेत, १६३ मुलांची सुटका

कटनी : बिहारमधून महाराष्ट्रात नेण्यात येत असलेल्या १६३ मुलांना मध्य प्रदेशातील कटनी रेल्वे स्थानकावर रविवारी रेल्वे थांबवून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही सर्व मुले गरीब मुस्लिम कुटुंबातील आहेत. या मुलांना घेऊन जाणाऱ्या आठ जणांना पोलिसांनी मानवी तस्करीच्या गुन्ह्याखाली अटक केली आहे. बऱ्याच काळापासून बिहारमधील अशा मुलांना महाराष्ट्र, कर्नाटक आणि गुजरातच्या मदरसांमध्ये नेऊन त्यांना धार्मिक कट्टरतेचे शिक्षण दिले जात असल्याचे चौकशीतून पुढे आले आहे. या प्रकरणात आता भारतीय गुप्तचर संघटना (आयबी) तपास करीत आहे. सोमवारी आयबीच्या एका पथकाने अटक केलेल्या आरोपींची चौकशी केली.


पोलिस संरक्षणात घेतलेली ही मुले बिहारच्या अररिया जिल्ह्यातील आहेत. कटनी जीआरपीने या मुलांच्या पालकांना चौकशीसाठी बिहारहून बोलावले होते. सध्या मुलांचे समुपदेशन केले जात आहे. दरम्यान, बिहारमधून चार मुलांचे पालक कटनीला पोहोचले आहेत. रेल्वे पोलिसांनी दिलेल्या निवेदनात पालकांनी आपल्या मुलांना धार्मिक शिक्षणासाठी मदरशात पाठवल्याचे म्हटले आहे. तर बिहारमध्ये मोठे मदरसे असताना मुलांना दुसऱ्या राज्यात का पाठवले जात होते, या बाजुनेही पोलीस तपास करत आहेत. पोलिसांच्या या प्रश्नाचे उत्तर ना आरोपी व पालकांना देता आले नाही.


पाटणा-पुणे एक्सप्रेसने अररिया येथील मुलांना महाराष्ट्रातील लातूर आणि कर्नाटकात येथे नेले जात होते. रेल्वेतील सद्दाम नावाच्या व्यक्तीसोबत १०० मुले होती. जीआरपीने बाल कल्याण समितीच्या तक्रारीवरून सद्दामसह त्याचे साथीदार अमान उल्ला, मो. जाहिर, आमिर खान, हाफिज अबू तालिम, मो. इस्लाम, नौसाद आणि राशिद यांच्यावर मानवी तस्करीचा गुन्हा दाखल केला आहे. जीआरपीने सांगितले की आरोपींचे जबाब नोंदवण्यात आले आहेत; मात्र, हे आरोपी कोणत्या धार्मिक संस्थेशी संबंधित आहेत, हा तपासाचा विषय आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाटणा-पुणे एक्सप्रेसमधून उतरवण्यात आलेल्या मुलांचे वय ७ ते १५ वर्षांच्या दरम्यान आहे. या मुलांना सध्या कटनी आणि जबलपूर येथील बाल संरक्षण गृहात ठेवण्यात आले आहे.

Comments
Add Comment

Maharashtra Sadan : 'दिल्लीतील महाराष्ट्र सदनातील प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा'

नवी दिल्ली : सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिल्ली दौऱ्यादरम्यान नवीन व जुने

Mhada : म्हाडाच्या घरांसाठी शुक्रवारपर्यंत अर्ज करता येणार

आतापर्यंत ८७ हजार २३९ अर्ज, तर ६१,१५३ अनामत रक्कमेसह अर्ज दाखल मुंबई : म्हाडाच्या २६४० घरांसाठी अर्ज करण्याची

Water Management : तलावांमध्ये १७ टक्केच पाणीसाठा शिल्लक

पाणी जपून वापरण्याचे मुंबईकरांना आवाहन मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमध्ये फक्त २,५८,४१० द. श. लि.

Wrestling : भारतीय मल्लांचे आशियाई कुस्तीत वर्चस्व, २७ पदकांसह पटकावले सांघिक विजेतेपद

नवी दिल्ली : व्हिएतनाममधील दा नांग येथे पार पडलेल्या २३ वर्षांखालील आशियाई कुस्ती स्पर्धेत भारतीय पुरुष

Heatwave : उष्णतेच्या लाटेत विशेष खबरदारी घ्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून आवाहन

नवी दिल्ली : दिल्ली, हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश आणि पंजाबसह अनेक राज्यांमध्ये तापमान ४५ अंश सेल्सिअसच्या

Modi : मोदी सरकारने केलेल्या ३ सुधारणांमुळे ८० कोटी रेशनधारकांना होणार फायदा

नवी दिल्ली : पंतप्रधान गरीब कल्याण योजनेच्या अंतर्गत केंद्र सरकार दर महिन्याला ८० कोटी लोकांना अन्नधान्याचा