Crime : मानवी तस्करी प्रकरणी ८ अटकेत, १६३ मुलांची सुटका

कटनी : बिहारमधून महाराष्ट्रात नेण्यात येत असलेल्या १६३ मुलांना मध्य प्रदेशातील कटनी रेल्वे स्थानकावर रविवारी रेल्वे थांबवून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही सर्व मुले गरीब मुस्लिम कुटुंबातील आहेत. या मुलांना घेऊन जाणाऱ्या आठ जणांना पोलिसांनी मानवी तस्करीच्या गुन्ह्याखाली अटक केली आहे. बऱ्याच काळापासून बिहारमधील अशा मुलांना महाराष्ट्र, कर्नाटक आणि गुजरातच्या मदरसांमध्ये नेऊन त्यांना धार्मिक कट्टरतेचे शिक्षण दिले जात असल्याचे चौकशीतून पुढे आले आहे. या प्रकरणात आता भारतीय गुप्तचर संघटना (आयबी) तपास करीत आहे. सोमवारी आयबीच्या एका पथकाने अटक केलेल्या आरोपींची चौकशी केली.


पोलिस संरक्षणात घेतलेली ही मुले बिहारच्या अररिया जिल्ह्यातील आहेत. कटनी जीआरपीने या मुलांच्या पालकांना चौकशीसाठी बिहारहून बोलावले होते. सध्या मुलांचे समुपदेशन केले जात आहे. दरम्यान, बिहारमधून चार मुलांचे पालक कटनीला पोहोचले आहेत. रेल्वे पोलिसांनी दिलेल्या निवेदनात पालकांनी आपल्या मुलांना धार्मिक शिक्षणासाठी मदरशात पाठवल्याचे म्हटले आहे. तर बिहारमध्ये मोठे मदरसे असताना मुलांना दुसऱ्या राज्यात का पाठवले जात होते, या बाजुनेही पोलीस तपास करत आहेत. पोलिसांच्या या प्रश्नाचे उत्तर ना आरोपी व पालकांना देता आले नाही.


पाटणा-पुणे एक्सप्रेसने अररिया येथील मुलांना महाराष्ट्रातील लातूर आणि कर्नाटकात येथे नेले जात होते. रेल्वेतील सद्दाम नावाच्या व्यक्तीसोबत १०० मुले होती. जीआरपीने बाल कल्याण समितीच्या तक्रारीवरून सद्दामसह त्याचे साथीदार अमान उल्ला, मो. जाहिर, आमिर खान, हाफिज अबू तालिम, मो. इस्लाम, नौसाद आणि राशिद यांच्यावर मानवी तस्करीचा गुन्हा दाखल केला आहे. जीआरपीने सांगितले की आरोपींचे जबाब नोंदवण्यात आले आहेत; मात्र, हे आरोपी कोणत्या धार्मिक संस्थेशी संबंधित आहेत, हा तपासाचा विषय आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाटणा-पुणे एक्सप्रेसमधून उतरवण्यात आलेल्या मुलांचे वय ७ ते १५ वर्षांच्या दरम्यान आहे. या मुलांना सध्या कटनी आणि जबलपूर येथील बाल संरक्षण गृहात ठेवण्यात आले आहे.

Comments
Add Comment

Fadnavis : 'माझा पुतण्या आज ना उद्या भारताचा पंतप्रधान होईल'

पुणे : माझा पुतण्या आज ना उद्या भारताचा पंतप्रधान होईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे काका बाळासाहेब

Nalasopara News : नागेला तलाव पुन्हा ठरला जीवघेणा! 18 वर्षीय तरुणाचा बळी, सुरक्षेअभावी नागरिक आक्रमक

नालासोपारा : नालासोपारा पूर्व भागातील नागेला तलावात (Nagela Lake) बुडून १८ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक

Hrithik Roshan : ऑफिससाठी जागा भाड्याने देऊन अभिनेता हृतिक रोशन कमावतो अफाट पैसा

मुंबई : बॉलिवूडचे अनेक कलाकार सिनेसृष्टीतील अस्थिरतेचा विचार करून आर्थिक सुरक्षेसाठी विविध क्षेत्रांमध्ये

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार! 'या' ६ जिल्ह्यांना यलो अलर्ट; विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा

मुंबई : महाराष्ट्रातील हवामानात पुन्हा एकदा मोठा बदल पाहायला मिळत आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) राज्यातील काही

US Visa Bond Rule : ट्रम्प प्रशासनाचा मोठा निर्णय! आता US Visa साठी भरावा लागू शकतो १७ लाखांचा बॉण्ड

नवी दिल्ली : अमेरिकेत प्रवासाचे नियोजन करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

Private Detectives : खासगी गुप्तहेरांवर येणार कायद्याचा वॉच! सर्वोच्च न्यायालयाचे केंद्राला मोठे निर्देश

नवी दिल्ली : देशभरात कार्यरत असलेल्या खासगी गुप्तहेर (Private Detectives) संस्थांवर कायदेशीर नियंत्रण आणण्याची गरज व्यक्त