Crime : मानवी तस्करी प्रकरणी ८ अटकेत, १६३ मुलांची सुटका

कटनी : बिहारमधून महाराष्ट्रात नेण्यात येत असलेल्या १६३ मुलांना मध्य प्रदेशातील कटनी रेल्वे स्थानकावर रविवारी रेल्वे थांबवून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही सर्व मुले गरीब मुस्लिम कुटुंबातील आहेत. या मुलांना घेऊन जाणाऱ्या आठ जणांना पोलिसांनी मानवी तस्करीच्या गुन्ह्याखाली अटक केली आहे. बऱ्याच काळापासून बिहारमधील अशा मुलांना महाराष्ट्र, कर्नाटक आणि गुजरातच्या मदरसांमध्ये नेऊन त्यांना धार्मिक कट्टरतेचे शिक्षण दिले जात असल्याचे चौकशीतून पुढे आले आहे. या प्रकरणात आता भारतीय गुप्तचर संघटना (आयबी) तपास करीत आहे. सोमवारी आयबीच्या एका पथकाने अटक केलेल्या आरोपींची चौकशी केली.


पोलिस संरक्षणात घेतलेली ही मुले बिहारच्या अररिया जिल्ह्यातील आहेत. कटनी जीआरपीने या मुलांच्या पालकांना चौकशीसाठी बिहारहून बोलावले होते. सध्या मुलांचे समुपदेशन केले जात आहे. दरम्यान, बिहारमधून चार मुलांचे पालक कटनीला पोहोचले आहेत. रेल्वे पोलिसांनी दिलेल्या निवेदनात पालकांनी आपल्या मुलांना धार्मिक शिक्षणासाठी मदरशात पाठवल्याचे म्हटले आहे. तर बिहारमध्ये मोठे मदरसे असताना मुलांना दुसऱ्या राज्यात का पाठवले जात होते, या बाजुनेही पोलीस तपास करत आहेत. पोलिसांच्या या प्रश्नाचे उत्तर ना आरोपी व पालकांना देता आले नाही.


पाटणा-पुणे एक्सप्रेसने अररिया येथील मुलांना महाराष्ट्रातील लातूर आणि कर्नाटकात येथे नेले जात होते. रेल्वेतील सद्दाम नावाच्या व्यक्तीसोबत १०० मुले होती. जीआरपीने बाल कल्याण समितीच्या तक्रारीवरून सद्दामसह त्याचे साथीदार अमान उल्ला, मो. जाहिर, आमिर खान, हाफिज अबू तालिम, मो. इस्लाम, नौसाद आणि राशिद यांच्यावर मानवी तस्करीचा गुन्हा दाखल केला आहे. जीआरपीने सांगितले की आरोपींचे जबाब नोंदवण्यात आले आहेत; मात्र, हे आरोपी कोणत्या धार्मिक संस्थेशी संबंधित आहेत, हा तपासाचा विषय आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाटणा-पुणे एक्सप्रेसमधून उतरवण्यात आलेल्या मुलांचे वय ७ ते १५ वर्षांच्या दरम्यान आहे. या मुलांना सध्या कटनी आणि जबलपूर येथील बाल संरक्षण गृहात ठेवण्यात आले आहे.

Comments
Add Comment

FIFA WORLDCUP 2026 : नवा नियम ठरला पॅराग्वेच्या खेळाडूला महागात! मिगेल अल्मिरॉनला दाखवले थेट रेड कार्ड

Santa Clara, California : विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत एका नवीन आणि कडक नियमामुळे पॅराग्वेचा मिडफिल्डर मिगेल अल्मिरॉन चर्चेत आला

Agriculture Minister Dattatray Bharne : राज्यातील ९० लाखांहून अधिक शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर मोठा दिलासा मिळणार

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या २३ व्या हप्त्याचे वितरणः कृषी मंत्री दत्तात्रय भरणे राज्यातील ९०.८५

FIFA World Cup 2026 : 10 खेळाडूंनीच केला पराक्रम! तुर्कीला हरवत पॅराग्वेची मोठी कामगिरी

Santa Clara, California: विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत शुक्रवारी झालेल्या थरारक सामन्यात पॅराग्वेने १० खेळाडूंसह खेळून तुर्कीचा

Ahilyanagar : धरणांतील पाणी ३० सप्टेंबरपर्यंत पिण्यासाठी राखीव; बेकायदा पाणीउपसा तात्काळ बंद करण्याचे आदेश

Ahilyanagar :  एल-निनोच्या संभाव्य परिणामांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पाणीटंचाईची स्थिती लक्षात घेऊन धरणांतील

FIFA World Cup 2026 : ख्रिश्चन पुलिसिकच्या अनुपस्थितीतही ऑस्ट्रेलियावर मात, बाद फेरीत धडक

Seattle: विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत अमेरिकेने आपला विजयी रथ कायम राखला आहे. शुक्रवारी झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियावर

Ahilyanagar : वारीच्या नियोजनासाठी दिंड्यांची माहिती २५ जूनपर्यंत द्या; पाणी बचतीचे मंत्री विखे पाटील यांचे आवाहन

Ahilyanagar : आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर दिंड्या आणि वारकऱ्यांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येक