Ashok Kharat, Rupali Chakankar : खरात प्रकरणात माझ्या बदनामीचा डाव - रुपाली चाकणकर

मुंबई : "गेल्या २८ दिवसांपासून माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर होणारे सर्व आरोप हे केवळ हेतूपुरस्सर आणि बदनामी करण्यासाठी केले जात आहेत. केवळ तर्कवितर्क आणि रंजक अफवांच्या आधारावर बदनामी करण्याचा हा नवा आणि चुकीचा पायंडा पाडला जात आहे", अशा शब्दांत राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी आपली भूमिका मांडली आहे. खरात प्रकरणात आपला कोणताही आर्थिक किंवा जमीन व्यवहार नसल्याचा पुनरुच्चार करतानाच, या प्रकरणातील 'सत्य' लवकरच समोर येईल, असा दावाही त्यांनी केला.



रूपाली चाकणकर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली सविस्तर बाजू मांडली आहे. राजकीय क्षेत्रात आरोप-प्रत्यारोप होत असतात, मात्र सध्याच्या प्रकरणात आरोप करणाऱ्यांनी कोणतेही पुरावे दिलेले नाहीत. निनावी पत्राचा आधार घेऊन केवळ कपोलकल्पित कथा रंगवल्या जात असल्याचा दावा चाकणकर यांनी केला.



पोलीस प्रशासनाला प्राप्त झालेले एक निनावी पत्र माध्यमांपर्यंत पोहोचवून दिवसभर चर्चासत्रे घडवून आणली गेली. या बदनामीच्या कुटील डावामागे नेमके कोणाचे ‘सौजन्य’ आहे, हे समोर आले पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे. बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनीही ज्या पत्रावर नाव आणि पत्ता नाही, अशा पत्राला कायदेशीरदृष्ट्या महत्त्व देता येत नाही, असे स्पष्ट केले असतानाही हे पत्र कोठून आले आणि कोणी लिहिले याची चौकशी होणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.



खरातच्या दुष्कृत्यात दुरान्वयेही संबंध नाही


गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या एकतर्फी बातम्यांवर प्रतिक्रिया का दिली नाही, याचे कारणही चाकणकर यांनी स्पष्ट केले. "एसआयटी आणि तपास यंत्रणांना निष्पक्षपातीपणे चौकशी करता यावी, हाच माझा हेतू होता. खरात प्रकरणात कोणत्याही दुष्कृत्यात आमचा दुरान्वयेही संबंध नाही," असे त्यांनी सांगितले.

Comments
Add Comment

Chakan-Talegaon Industrial Belt : चाकण-तळेगाव औद्योगिक पट्ट्याचा कायापालट होणार? खड्ड्यांसाठी प्री-कास्ट, जिओ पॉलिमर टेक्नो पॅचचा वापर

मुंबई : चाकण-तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील उद्योग आणि स्थानिक नागरिकांच्या समस्यांवर तातडीने उपाययोजना

BJP Yuva Morcha : ‘वंदे मातरम्’च्या अवमानाच्या निषेधार्थ भाजयुमो मुंबईचे जोरदार आंदोलन

मुंबई : १५ ऑगस्ट रोजी झालेल्या ध्वजारोहण कार्यक्रमादरम्यान काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी

Maharashtra New Doctors Appointed : राज्यात १,४४० डॉक्टरांची लवकरच नियुक्ती - आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

- आरोग्यमंत्र्यांनी साधला सहा लाखाहून अधिक नागरिकांची जनसंवाद मुंबई : राज्यात उपलब्ध झालेल्या १,४४० डॉक्टरांची

Prakash Abitkar : आरोग्य समित्यांच्या माध्यमातून जनतेच्या आरोग्य समस्या जाणून घेणार

मुंबई : राज्यातील आरोग्य व्यवस्था अधिक लोकाभिमुख, पारदर्शक आणि उत्तरदायी करण्यासाठी आरोग्य विभागाच्या विविध

Maharashtra Agriculture Department : महाराष्ट्राच्या कृषी विभागाची दमदार कामगिरी; केंद्र सरकारकडून राष्ट्रीय पुरस्काराने होणार सन्मान

- कृषीमंत्री दत्तात्रय भरणे स्वीकारणार पुरस्कार मुंबई : प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME)

FDA Notice to SRK : ‘विमल इलायची’ जाहिरातीवर FDAचा दणका; अजय, शाहरुख आणि टायगरला नोटीस

मुंबई : बॉलिवूड अभिनेते अजय देवगण, शाहरुख खान आणि टायगर श्रॉफ यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राचे