Kalyan-Ahilyanagar Highway Accident : कल्याण अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार तर एक गंभीर जखमी

कल्याण-अहिल्यानगर (Kalyan-Ahilyanagar Highway Accident) महामार्गावर आज म्हणजेच सोमवार १३ एप्रिल रोजी अत्यंत भीषण अपघात घडला. या अपघातात एका ईको कार आणि सिमेंट मिक्सर ट्रकची समोरासमोर जोरदार धडक झाली. या दुर्घटनेत ८ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे.



ईको कारचा पूर्णपणे चक्काचूर :


मिळालेल्या माहितीनुसार, अपघाताची (Kalyan-Ahilyanagar Highway Accident) तीव्रता इतकी होती की ईको कारचा पूर्णपणे चक्काचूर झाला. धडक इतकी जोरदार होती की कारमधील प्रवाशांना बाहेर पडण्याची कोणतीही संधी मिळाली नाही. मृतांमध्ये कल्याण ते मुरबाड दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.



स्थानिक नागरिकांकडून मदतकार्य सुरु :


अपघाताचा (Kalyan-Ahilyanagar Highway Accident) आवाज होताच स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. माहिती मिळताच महामार्ग पोलीस आणि स्थानिक पोलीस प्रशासनही घटनास्थळी दाखल झाले. नागरिकांच्या मदतीने कारमध्ये अडकलेल्या मृतदेहांना बाहेर काढण्यात आले, तर गंभीर जखमी व्यक्तीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


प्राथमिक तपासानुसार हा अपघात (Kalyan-Ahilyanagar Highway Accident) महामार्गावरील एका पुलावर घडल्याचे सांगितले जात आहे. सध्या पोलिसांकडून मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. तसेच या अपघाताचे नेमके कारण शोधण्यासही सुरुवात झाली आहे. या भीषण अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Comments
Add Comment

Monsoon Update : देशात पावसाची 64 टक्के तूट; महाराष्ट्रासह 16 राज्यांत पावसाची प्रतीक्षा

मुंबई : भारतात नैऋत्य मोसमी पावसाचा वेग मंदावला आहे. सोमवार, 15 जून रोजीच्या उपग्रह प्रतिमांमध्ये देशाच्या मोठ्या

Census : राज्यातील जनगणनेचा पहिला टप्पा यशस्वी

मुंबई : जनगणना 2027 साठी महाराष्ट्रात गृहसूची आणि गृह गणनेचा पहिला टप्पा यशस्वी पूर्ण; राज्यभरात 16 मे ते 14 जून 2026 या

Pre-Monsoon Preparations : ठाणे जिल्ह्यातील रस्ते कामांना गती देण्याचे निर्देश

सर्व मनपानी आपापल्या क्षेत्रातील क्लस्टर पुनर्विकासाला प्राधान्य द्यावे एमएसईबीची प्रलंबित कामे तत्काळ

Eknath Shinde : मुंबईतील पावसाळापूर्व तयारीचा उपमुख्यमंत्री शिंदेंनी घेतला आढावा

मुंबई परिसरात ‘शून्य जीवितहानी’ उद्दिष्ट ठेवून यंत्रणांनी समन्वयातून काम करावे: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Mumbai Metropolitan Region : आता एकाच तिकिटावर करा संपूर्ण 'एमएमआर'मध्ये बस प्रवास!

राज्य सरकारकडून अभ्यास गट स्थापन; मार्गांचे सुसूत्रीकरण आणि ‘टेलिस्कोपिक भाडे’ रचनेवर होणार काम मुंबई : मुंबई

Smart Meter : स्मार्ट मीटरवर मोठा निर्णय येणार? जयंत पाटील-फडणवीस भेट चर्चेत

मुंबई : राज्यात जुन्या मीटरच्या जागी बसवण्यात आलेल्या स्मार्ट मीटरमुळे सर्वसामान्य घरगुती ग्राहक आणि