Mumbai Local : आता लोकलमध्ये लटकून प्रवास करता येणार नाही , लवकरच...

मुंबई : मुंबईकरांना लोकलमधून प्रवास करताना अनेक समस्यांना सामोर जावं लागतं. नुकताच मुंब्रा स्थानक परिसरात ९ जून २०२५ मध्ये सीएसएमटी-कर्जत आणि कसारा-सीएसएमटी लोकलमधून १३ प्रवासी पडले. या दुर्घटनेत ४ प्रवाशांचा मृत्यू झाला होता.


या दुर्घटनेनंतर धावत्या लोकलमधून लटकून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा चर्चेत आला. प्रवाशांचा रोष कमी करण्यासाठी विनावातानुकूलित, स्वयंचलितपणे दरवाजे उघड-बंद होणाऱ्या लोकलची बांधणी करण्याचा निर्णय घेण्यात आला.


आता मध्य रेल्वेवरील सर्वसामान्य प्रवाशांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. स्वयंचलितपणे दरवाजे उघड-बंद होणारी बारा डब्यांची विनावातानुकूलित लोकल चेन्नईच्या इंटिग्रल कोच फॅक्टरीमधून (आयसीएफ) मुंबईच्या दिशेनं रवाना झाली आहे.


मुंब्रा दुर्घटनेनंतर रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मुंबईसाठी या लोकलची घोषणा केली होती. नोव्हेंबर २०२५ मध्ये मुंबईत लोकल दाखल होणं अपेक्षित असताना एप्रिल २०२६ मध्ये ही लोकल येत आहे. ही लोकल मुंबईत आल्यानंतर तिची चाचणी घेण्यात येणार आहे. त्यानंतर लोकल प्रवासी सेवेत दाखल करण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.


मुंबई लोकलमधील गर्दी लक्षात घेता दरवाजे बंद केल्यानंतर प्रवासी गुदमरण्याची शक्यता आहे. यामुळे नव्या लोकलमध्ये वायुविजन यंत्रणेची विशेष व्यवस्था असेल. नव्या लोकलमध्ये दरवाजातून हवा खेळती राहण्यासाठी सछिद्र आणि पट्ट्यांचे दरवाजे असणार आहेत. एका डब्याची अन्य डब्यांना जोडणी असल्यानं त्यामुळे गर्दी विभागणं शक्य होणार आहे.



मध्य रेल्वेवरील सर्वसामान्य प्रवाशांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. स्वयंचलितपणे दरवाजे उघड-बंद होणारी बारा डब्यांची विनावातानुकूलित लोकल चेन्नईच्या इंटिग्रल कोच फॅक्टरीमधून (आयसीएफ) मुंबईच्या दिशेने रवाना झाली आहे.


मुंब्रा दुर्घटनेनंतर रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मुंबईसाठी या लोकलची घोषणा केली होती. नोव्हेंबर २०२५ मध्ये मुंबईत लोकल दाखल होणे अपेक्षित असताना एप्रिल २०२६ मध्ये ही लोकल येत आहे. ही लोकल मुंबईत आल्यानंतर तिची चाचणी घेण्यात येणार आहे. त्यानंतर लोकल प्रवासी सेवेत दाखल करण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.

Comments
Add Comment

Weather Update : महाराष्ट्रातील विविध भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज

मुंबई : राज्यात श्रावणाचं आगमन धो धो पावसानं होणार आहे. महाराष्ट्रातील विविध भागांत गुरुवार १३ ते शनिवार १५ ऑगस्ट

Nitesh Rane : मच्छीमार बांधवांसाठी आधुनिक व सर्व सुविधांयुक्त वास्तू उभारणार – मंत्री नितेश राणे

· मरोळ मच्छी मार्केटच्या विकासकामांना गती देणार मुंबई, दि. 12: मुंबईतील मच्छीमार बांधवांसाठी महत्त्वपूर्ण

Water Metro : महाराष्ट्र सागरी मंडळाच्या अर्थसंकल्पाला मंजुरी; वॉटर मेट्रोसह विविध प्रकल्पांना मिळणार गती

मुंबई : महाराष्ट्राच्या सागरी क्षेत्रातील पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र सागरी मंडळाने अनेक

Chandrashekhar Bawankule : राज्यात 60 ‘आदर्श दुय्यम निबंधक’ कार्यालये उभारणार; पुण्यातील कोथरूडमध्ये पहिले कार्यालय

मुंबई : राज्यातील दुय्यम निबंधक कार्यालयांचे आधुनिकीकरण करण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. नोंदणी

Jalgaon Crime : कंटाळा आला आहे, आता मी निघतो...; सुसाईड नोट लिहून तरुणाची आत्महत्या

Jalgaon Crime : राजस्थानमध्ये पाठविलेल्या मालाचे ७ लाख रुपये मिळत नसल्याने एका तरुण उद्योजकाने आपली जीवनयात्रा संपवली

Ayurvedic products : राज्यातील १३५ आयुर्वेदिक उत्पादकांना कारणे दाखवा नोटीस

१० उत्पादकांचे परवाने कायमस्वरूपी रद्द; अन्न व औषध प्रशासनाची कारवाई मुंबई : राज्यात हॉटेल्स आणि औषध