Mumbai Local : आता लोकलमध्ये लटकून प्रवास करता येणार नाही , लवकरच...

मुंबई : मुंबईकरांना लोकलमधून प्रवास करताना अनेक समस्यांना सामोर जावं लागतं. नुकताच मुंब्रा स्थानक परिसरात ९ जून २०२५ मध्ये सीएसएमटी-कर्जत आणि कसारा-सीएसएमटी लोकलमधून १३ प्रवासी पडले. या दुर्घटनेत ४ प्रवाशांचा मृत्यू झाला होता.


या दुर्घटनेनंतर धावत्या लोकलमधून लटकून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा चर्चेत आला. प्रवाशांचा रोष कमी करण्यासाठी विनावातानुकूलित, स्वयंचलितपणे दरवाजे उघड-बंद होणाऱ्या लोकलची बांधणी करण्याचा निर्णय घेण्यात आला.


आता मध्य रेल्वेवरील सर्वसामान्य प्रवाशांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. स्वयंचलितपणे दरवाजे उघड-बंद होणारी बारा डब्यांची विनावातानुकूलित लोकल चेन्नईच्या इंटिग्रल कोच फॅक्टरीमधून (आयसीएफ) मुंबईच्या दिशेनं रवाना झाली आहे.


मुंब्रा दुर्घटनेनंतर रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मुंबईसाठी या लोकलची घोषणा केली होती. नोव्हेंबर २०२५ मध्ये मुंबईत लोकल दाखल होणं अपेक्षित असताना एप्रिल २०२६ मध्ये ही लोकल येत आहे. ही लोकल मुंबईत आल्यानंतर तिची चाचणी घेण्यात येणार आहे. त्यानंतर लोकल प्रवासी सेवेत दाखल करण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.


मुंबई लोकलमधील गर्दी लक्षात घेता दरवाजे बंद केल्यानंतर प्रवासी गुदमरण्याची शक्यता आहे. यामुळे नव्या लोकलमध्ये वायुविजन यंत्रणेची विशेष व्यवस्था असेल. नव्या लोकलमध्ये दरवाजातून हवा खेळती राहण्यासाठी सछिद्र आणि पट्ट्यांचे दरवाजे असणार आहेत. एका डब्याची अन्य डब्यांना जोडणी असल्यानं त्यामुळे गर्दी विभागणं शक्य होणार आहे.



मध्य रेल्वेवरील सर्वसामान्य प्रवाशांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. स्वयंचलितपणे दरवाजे उघड-बंद होणारी बारा डब्यांची विनावातानुकूलित लोकल चेन्नईच्या इंटिग्रल कोच फॅक्टरीमधून (आयसीएफ) मुंबईच्या दिशेने रवाना झाली आहे.


मुंब्रा दुर्घटनेनंतर रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मुंबईसाठी या लोकलची घोषणा केली होती. नोव्हेंबर २०२५ मध्ये मुंबईत लोकल दाखल होणे अपेक्षित असताना एप्रिल २०२६ मध्ये ही लोकल येत आहे. ही लोकल मुंबईत आल्यानंतर तिची चाचणी घेण्यात येणार आहे. त्यानंतर लोकल प्रवासी सेवेत दाखल करण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.

Comments
Add Comment

BMC : मुंबई महानगरपालिका मुख्यलयात मंत्रालयाच्या धर्तीवर प्रवेश

मुंबई  : मुंबई महापालिका मुख्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी प्राप्त झाल्यानंतर पुन्हा एकदा महापालिका

BMC मुख्यालय उडवून देण्याची धमकी, महापौरांसह इमारतीच्या सुरक्षेत वाढ

महापािलका मुख्यालय उडवून देण्याची धमकी ; महापौरांसह इमारतीच्या सुरक्षेत वाढ अशा धमक्यांना मी मुळीच घाबरत नाही-

अवकाळी पावसाने बाधित फळपिकांचे पंचनामे पूर्ण करा, कृषिमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : 'राज्यात मे आणि जून २०२६ या कालावधीत अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीमुळे बाधित झालेल्या फळपिकांच्या

Verification of Street Vendors : मुंबईत २० हजार फेरीवाल्यांची पडताळणी पूर्ण

येत्या २६ जून पर्यंत पडताळणी न झालेल्यांना मिळणार नाही क्यू आर कोड ओळखपत्र मुंबई (विशेष प्रतिनिधी ) : उच्‍च

Devendra Fadnavis : समर्थ भारत ते विकसित भारत’ पंतप्रधान मोदींमुळेच शक्य

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; महाराष्ट्र राज्याच्या वतीने पत्र लिहून केले अभिनंदन मुंबई : देशाच्या इतिहासात

Panvel-Karjat Corridor : रेल्वेला नवी लाइफलाइन! लवकरच धावणार उपनगरी रेल्वे; पनवेल-कर्जत कॉरिडॉरचे ९८ टक्के काम पूर्ण

MUMBAI : मुंबई उपनगरी रेल्वे नेटवर्कसाठी महत्त्वाचा ठरणारा बहुप्रतीक्षित पनवेल-कर्जत रेल्वे कॉरिडॉर आता