Mumbai Local : आता लोकलमध्ये लटकून प्रवास करता येणार नाही , लवकरच...

मुंबई : मुंबईकरांना लोकलमधून प्रवास करताना अनेक समस्यांना सामोर जावं लागतं. नुकताच मुंब्रा स्थानक परिसरात ९ जून २०२५ मध्ये सीएसएमटी-कर्जत आणि कसारा-सीएसएमटी लोकलमधून १३ प्रवासी पडले. या दुर्घटनेत ४ प्रवाशांचा मृत्यू झाला होता.


या दुर्घटनेनंतर धावत्या लोकलमधून लटकून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा चर्चेत आला. प्रवाशांचा रोष कमी करण्यासाठी विनावातानुकूलित, स्वयंचलितपणे दरवाजे उघड-बंद होणाऱ्या लोकलची बांधणी करण्याचा निर्णय घेण्यात आला.


आता मध्य रेल्वेवरील सर्वसामान्य प्रवाशांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. स्वयंचलितपणे दरवाजे उघड-बंद होणारी बारा डब्यांची विनावातानुकूलित लोकल चेन्नईच्या इंटिग्रल कोच फॅक्टरीमधून (आयसीएफ) मुंबईच्या दिशेनं रवाना झाली आहे.


मुंब्रा दुर्घटनेनंतर रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मुंबईसाठी या लोकलची घोषणा केली होती. नोव्हेंबर २०२५ मध्ये मुंबईत लोकल दाखल होणं अपेक्षित असताना एप्रिल २०२६ मध्ये ही लोकल येत आहे. ही लोकल मुंबईत आल्यानंतर तिची चाचणी घेण्यात येणार आहे. त्यानंतर लोकल प्रवासी सेवेत दाखल करण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.


मुंबई लोकलमधील गर्दी लक्षात घेता दरवाजे बंद केल्यानंतर प्रवासी गुदमरण्याची शक्यता आहे. यामुळे नव्या लोकलमध्ये वायुविजन यंत्रणेची विशेष व्यवस्था असेल. नव्या लोकलमध्ये दरवाजातून हवा खेळती राहण्यासाठी सछिद्र आणि पट्ट्यांचे दरवाजे असणार आहेत. एका डब्याची अन्य डब्यांना जोडणी असल्यानं त्यामुळे गर्दी विभागणं शक्य होणार आहे.



मध्य रेल्वेवरील सर्वसामान्य प्रवाशांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. स्वयंचलितपणे दरवाजे उघड-बंद होणारी बारा डब्यांची विनावातानुकूलित लोकल चेन्नईच्या इंटिग्रल कोच फॅक्टरीमधून (आयसीएफ) मुंबईच्या दिशेने रवाना झाली आहे.


मुंब्रा दुर्घटनेनंतर रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मुंबईसाठी या लोकलची घोषणा केली होती. नोव्हेंबर २०२५ मध्ये मुंबईत लोकल दाखल होणे अपेक्षित असताना एप्रिल २०२६ मध्ये ही लोकल येत आहे. ही लोकल मुंबईत आल्यानंतर तिची चाचणी घेण्यात येणार आहे. त्यानंतर लोकल प्रवासी सेवेत दाखल करण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.

Comments
Add Comment

Cyber Crime : मुंबईत सायबर गुन्ह्यातील १०० कोटी वाचविण्यात यश

मुंबई : गेल्या काही वर्षांत सायबर फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून सायबर पोलिसांनी

आता गावकऱ्यांना मिळणार मोफत मिळकत पत्रिका

सनद फी माफ करण्याची महसूलमंत्री बावनकुळेंची घोषणा; ग्रामविकास विभाग प्रस्ताव तयार करणार मुंबई : ग्रामपंचायत

वाई येथे लघुकुंभमेळ्याचा शुभारंभ ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते संपन्न

वाईच्या लघुकुंभ मेळ्याची महती संपूर्ण राज्यात पसरणार:-जयकुमार गोरे सातारा वाई नगरीला “दक्षिण काशी” अशी ओळख

गोवंशाची अवैध वाहतूक करणाऱ्यांना आता 'मकोका' लागणार!

गृह विभागाकडून मार्गदर्शक सूचना जारी; बेकायदेशीर कत्तलखान्यांवर कारवाईसाठी संयुक्त भरारी पथके आणि सीमांवर

वरिष्ठांनी भाजपसोबत जायचे ठरवल्यास दुसरा पर्याय निवडेन!

आ. रोहित पवार यांचा दावा; आजोबा आणि आत्याला दिला इशारा मुंबई : सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय

एकनाथ शिंदेंकडून २०२९ साठी स्वबळाची चाचपणी?

२०० मतदारसंघात संघटनात्मक बांधणी सुरू; मंत्री उदय सामंत आणि श्रीकांत शिंदेंवर सोपवली मोठी जबाबदारी मुंबई :