Mumbai International Airport : २४ महिलांकडून ३० किलो सोने जप्त; विमानतळावर तपास यंत्रणांची मोठी कामगिरी

मुंबई : मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) मोठी कारवाई करत सोन्याच्या तस्करीचा पर्दाफाश केला आहे. सुमारे ३८ कोटी रुपयांचे जवळपास ३० किलो सोने तस्करीच्या मार्गाने आणताना २४ महिलांना अटक करण्यात आली आहे.



DRIची गुप्त कारवाई


गुप्त माहितीच्या आधारे DRIने विशेष मोहीम राबवत या महिलांना ताब्यात घेतले. ‘ऑपरेशन’ अंतर्गत केलेल्या कारवाईत एकूण २९.३७ किलो सोने जप्त करण्यात आले, ज्याची किंमत सुमारे ३७.७४ कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे.



जप्त करण्यात आलेला माल


या कारवाईत २५.१० किलो सोन्याच्या लड्या आणि ४.२७ किलो सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. सर्व आरोपी महिलांना अटक करून पुढील कारवाई सुरू करण्यात आली आहे.



धक्कादायक माहिती समोर


तपासात धक्कादायक माहिती समोर आली असून, महिलांनी सोने अत्यंत कौशल्याने लपवले होते. काहींनी बुटांमध्ये, तर काहींनी कपड्यांच्या आत विशेष तयार केलेल्या पाऊचमध्ये सोने ठेवले होते. काही प्रकरणांमध्ये शरीरावर लपवण्याचे प्रकारही आढळले आहेत. या महिलांना सोने लपवण्याचे आणि तपास यंत्रणांची दिशाभूल करण्याचे प्रशिक्षण देण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे ही कारवाई एका संघटित टोळीशी संबंधित असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट होत आहे.


अटक करण्यात आलेल्या सर्व महिलांना न्यायालयात हजर केले जाणार असून, या प्रकरणातील मुख्य सूत्रधाराचा शोध घेण्यासाठी तपास यंत्रणांनी चौकशी अधिक तीव्र होणार आहे.

Comments
Add Comment

Mumbai Rain : मुंबईत वर्षभराच्या तुलनेत सरासरी ७६ टक्के पडला पाऊस

मुंबई : मुंबईत (Mumbai) आतापर्यंत वर्षभराच्या तुलनेत सरासरी ७५ ते ७६ टक्के एवढ्या पावसाची (Rain) नोंद झाल्याची आकडेवारी

BMC Schools : महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना ३१ जुलैपर्यंत ८० टक्के शालेय साहित्याचे वाटप

मुंबई : मुंबई महापालिकेच्या (BMC) शाळांमध्ये (Schools) शालेय विद्यार्थ्यांना (Students) दरवर्षी २७ शैक्षणिक वस्तुंचे मोफत वाटप

BMC : तब्बल १२७८ महिलांमध्ये स्तन कर्करोगाची आढळली लक्षणे, महापालिकेच्यावतीने केला जाणार मोफत उपचार

महापालिका सार्वजनिक आरोग्य समिती अध्यक्ष हरिष भांदिर्गे यांनी दिली माहिती मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री

Mumbai Water Supply : मुंबईकरांचा पाणी साठा सुस्थितीत, आता प्रतीक्षा ऑगस्टमधील पावसाची

मुंबई : मुंबईला (Mumbai) पाणी पुरवठा (Water Supply) करणाऱ्या सर्व धरणांमधील पाणी साठा आता चांगल्याप्रकारे वाढू लागला असून

Ashadhi Ekadashi : वडाळा येथील 'प्रतिपंढरपूर' विठ्ठल मंदिरात मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांच्या हस्ते महापूजा आणि महाअभिषेक संपन्न

मुंबईकरांच्या सुख-समृद्धीसह महानगराच्या सर्वांगीण विकासासाठी विठुरायाच्या चरणी प्रार्थना वडाळा : आषाढी

Eknath Shinde : विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी सरकार कटिबद्ध, नीट पेपर लीक प्रकरणात केंद्राच्या ऐतिहासिक निर्णयाला महाराष्ट्राचा पाठिंबा

विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी सरकार कटिबद्ध – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पेपर लीक रोखण्यासाठी फास्ट ट्रॅक