Mumbai International Airport : २४ महिलांकडून ३० किलो सोने जप्त; विमानतळावर तपास यंत्रणांची मोठी कामगिरी

मुंबई : मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) मोठी कारवाई करत सोन्याच्या तस्करीचा पर्दाफाश केला आहे. सुमारे ३८ कोटी रुपयांचे जवळपास ३० किलो सोने तस्करीच्या मार्गाने आणताना २४ महिलांना अटक करण्यात आली आहे.



DRIची गुप्त कारवाई


गुप्त माहितीच्या आधारे DRIने विशेष मोहीम राबवत या महिलांना ताब्यात घेतले. ‘ऑपरेशन’ अंतर्गत केलेल्या कारवाईत एकूण २९.३७ किलो सोने जप्त करण्यात आले, ज्याची किंमत सुमारे ३७.७४ कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे.



जप्त करण्यात आलेला माल


या कारवाईत २५.१० किलो सोन्याच्या लड्या आणि ४.२७ किलो सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. सर्व आरोपी महिलांना अटक करून पुढील कारवाई सुरू करण्यात आली आहे.



धक्कादायक माहिती समोर


तपासात धक्कादायक माहिती समोर आली असून, महिलांनी सोने अत्यंत कौशल्याने लपवले होते. काहींनी बुटांमध्ये, तर काहींनी कपड्यांच्या आत विशेष तयार केलेल्या पाऊचमध्ये सोने ठेवले होते. काही प्रकरणांमध्ये शरीरावर लपवण्याचे प्रकारही आढळले आहेत. या महिलांना सोने लपवण्याचे आणि तपास यंत्रणांची दिशाभूल करण्याचे प्रशिक्षण देण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे ही कारवाई एका संघटित टोळीशी संबंधित असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट होत आहे.


अटक करण्यात आलेल्या सर्व महिलांना न्यायालयात हजर केले जाणार असून, या प्रकरणातील मुख्य सूत्रधाराचा शोध घेण्यासाठी तपास यंत्रणांनी चौकशी अधिक तीव्र होणार आहे.

Comments
Add Comment

Nitin Gadkari : विदर्भात साकारणार देशातील पहिले आदिवासी विद्यापीठ

५०० कोटींच्या प्रकल्पातून शैक्षणिक क्रांतीचे नवे पर्व मुंबई : गेल्या तीन दशकांपासून आदिवासी आणि दुर्गम भागात

Workers Day : कामगार दिनानिमित्त महापालिका सफाई कामगारांचा गौरव महापालिकेचा डी विभागाने घेतला पुढाकार

मुंबई : महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या निमित्ताने मुंबई महानगरपालिकेच्या डी विभाग, घन कचरा

बारावी निकालात नाशिक विभाग कितव्या स्थानावर ?, मुलींचे वर्चस्व कायम

नाशिक (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या इयत्ता १२ वीच्या

Women's T20 World Cup : महिला टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघ जाहीर; प्रतीका रावलचा समावेश नाही

मुंबई : बीसीसीआयने १२ जून २०२६ पासून सुरू होणाऱ्या २०२६ च्या महिला टी-२० विश्वचषकासाठी भारतीय महिला संघाची घोषणा

नाशिक : लग्नाचे आमिष आणि फोटोंचा धाक दाखवून तरुणीवर अत्याचार

त्र्यंबकेश्वर : लग्नाचे आमिष दाखवून २४ वर्षीय तरुणीवर वारंवार अत्याचार केल्याप्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलीस

Chhattisgarh Soldier News : छत्तीसगडमधील जवान शहीद; सुरुंग निकामी करण्याच्या कामादरम्यान मोठा स्फोट

छत्तीसगड : एकेकाळी नक्षलवाद्यांचा परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भागात सुरुंग निकामी करण्याचे काम सुरू असताना