नांदेड : विदर्भ आणि मराठवाड्याच्या सीमावर्ती भागात आज सकाळी ८:४६ च्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. परभणी, नांदेड, हिंगोली, वाशिम आणि यवतमाळ या पाच जिल्ह्यांमध्ये जमिनीखालील हालचालींमुळे नागरिकांमध्ये मोठी घबराट पसरली. काही ठिकाणी धक्क्यांची तीव्रता इतकी होती की घरांवरील पत्रे उडाले असून जुन्या घरांच्या भिंतींना तडे गेल्याच्या घटना समोर आल्या आहेत. सकाळच्या वेळी अचानक आलेल्या या संकटामुळे नागरिक घरातून बाहेर पडले असून प्रशासनाकडून खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
भांडीकुंडी कोसळली, घरांना तडे
हिंगोली जिल्ह्याला आज सकाळी ८:४७ च्या सुमारास भूकंपाच्या तीव्र धक्क्याने हादरवून सोडले. हिंगोलीत वारंवार जाणवणाऱ्या धक्क्यांच्या तुलनेत आजचा हादरा अत्यंत मोठा असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे. धक्क्याची तीव्रता इतकी होती की घराघरातील भांडी आणि जीवनावश्यक वस्तू जमिनीवर कोसळल्या, तर अनेक कच्च्या व पक्क्या घरांच्या भिंतींना मोठे तडे गेले आहेत. हिंगोलीसह शेजारील नांदेड आणि परभणी जिल्ह्यांतही हे हादरे जाणवले असून, सध्या संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण आहे.
मुंबई : मुंबईच्या महापौरांच्या संकल्पनेतून मुंबईतील प्रवेशद्वाराचे सुशोभीकरण आणि घड्याळ बसण्याचे काम हाती घेण्यात येत आहे. यातील वाशी ...
हिंगोलीत ४.७ रिश्टर स्केलचा मोठा भूकंप
हिंगोलीतील 'पांगरा शिंदे' ठरले भूकंपाचे केंद्रबिंदू
मराठवाडा आणि विदर्भाच्या सीमेवर आज सकाळी भूकंपाचा मोठा धक्का बसला असून, त्याचे केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे हे गाव असल्याचे समोर आले आहे. जमिनीच्या १० किमी खोलीवर हालचाली झाल्याने ४.७ रिश्टर स्केल तीव्रतेचा हा भूकंप नोंदवला गेला. या भूकंपाचे पडसाद शेजारील जिल्ह्यांतही उमटले. नांदेड शहरातील सिडको, वजीराबाद आणि तरोडा सांगावी भागात सकाळी ८:४५ च्या सुमारास धक्के जाणवले. तसेच, यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील शेबाळपिंपरी परिसरातही नागरिकांना भूकंपाचे सौम्य हादरे जाणवल्याने नागरिकांमध्ये भीती पसरली आहे.