Nashik : नाशिक आणि जळगावच्या शेतकऱ्यांना शासनाचा मदतीचा हात

नाशिक : अवकाळी पावसाच्या तडाख्याने उध्वस्त झालेल्या नाशिक आणि जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने दिलासा देणारा मोठा निर्णय घेतला आहे. शासनाने अवकाळीचा तडाखा बसलेल्या शेतकऱ्यांना सतरा कोटी आठ लाख नव्वद हजार रुपयांची मदत मंजूर केली आहे.


सप्टेंबर २०२४ ते ऑगस्ट २०२५ या कालावधीत, विशेषतः नोव्हेंबर २०२५ मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे नाशिक आणि जळगाव जिल्ह्यांतील शेतीपिकांचे प्रचंड नुकसान झाले होते. हातात आलेले पीक वाया गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले होते. या गंभीर परिस्थितीची दखल घेत आमदार मकरंद पाटील यांनी तात्काळ प्रशासनाला सतर्क करत नुकसानग्रस्त भागांचा सखोल आढावा घेण्याचे आदेश दिले आणि मदत प्रस्ताव जलदगतीने मंजूर करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. शासन यंत्रणा वेगाने कार्यरत झाली आणि अल्पावधीतच मदत मंजूर होऊन शेतकऱ्यांना आधार मिळण्याचा मार्ग खुला झाला. ही मदत केवळ आर्थिक सहाय्य नसून संकटातून सावरण्याची नवी उमेद देणारी ठरत आहे. बियाणे, शेतीची पुनर्बांधणी आणि पुढील हंगामासाठी आवश्यक असलेला खर्च भागवण्यासाठी ही रक्कम शेतकऱ्यांसाठी जीवनरेखा ठरणार आहे.

Comments
Add Comment

TET exam : टीईटी परीक्षेत सीसीटीव्हीमध्ये चेहरा दिसणे बंधनकारक

टीईटी परीक्षेत सीसीटीव्हीमध्ये चेहरा दिसणे बंधनकारक बुरखा, दुपट्टा किंवा ओढणीला बंदी नाही- राज्य परीक्षा

Vilas Ghule : विलास घुले हत्या प्रकरणावरून धनंजय मुंडेंचा सवाल; निष्पक्ष तपासाची मागणी

बीड : बीड (Beed) जिल्ह्यातील केज तालुक्यातील विलास घुले (Vilas Ghule) हत्या प्रकरणावरून (Murder) माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे

Monsoon Update : जून महिन्यात पाऊस पडणार नाही ; या तारखेपासून कोसळणार मुसळधार पाऊस

महाराष्ट्र : महाराष्ट्रामध्ये काही भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. २३ आणि २५ जूनला मुंबईसह इतर शहरात मुसळधार

Ketan Agarwal Murder Case: "म्हणून मी त्याला लोहगडावरून खाली ढकललं..." सियाने पोलिसांसमोर सर्वचं सांगितलं

केतनच्या हत्येमागचं सर्वात भयंकर कारण आलं समोर Ketan Agarwal Murder Case : पुणे : पुण्यातील उद्योगपती केतन अग्रवाल (Ketan Agarwal Murder)

आषाढी वारीसाठी रेल्वेची खास भेट; पंढरपूरसाठी धावणार विशेष गाड्या, जाणून घ्या वेळापत्रक

आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी मध्य रेल्वेने विशेष गाड्यांची घोषणा केली

Maharashtra Infrastructure : मुंबई आणि नागपूरसाठी मोठा निर्णय; दोन महत्त्वाच्या वाहतूक प्रकल्पांना राज्य सरकारची मंजुरी

राज्यातील वाहतूक व्यवस्था अधिक वेगवान आणि सुलभ करण्यासाठी राज्य सरकारने दोन महत्त्वाच्या पायाभूत सुविधा