Ashok Kharat Case, Rupali Chakankar : रुपाली चाकणकरांकडून सुनेत्रा पवारांच्या जीवाला धोका?

 भोंदू अशोक खरात प्रकरणात नवी तक्रार; बीडमधील व्यक्तीचा 'एसआयटी'कडे खळबळजनक दावा


मुंबई : नाशिकमधील भोंदू अशोक खरात प्रकरणाने आता अनपेक्षित आणि धक्कादायक वळण घेतले आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाकडे (एसआयटी) बीड जिल्ह्यातील एका व्यक्तीने एक गंभीर तक्रार दाखल केली असून, त्यात राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या जीवाला धोका असल्याचा खळबळजनक दावा करण्यात आला आहे.


अशोक खरात याच्याविरोधात लैंगिक शोषण आणि आर्थिक फसवणूक प्रकरणी गुन्हे दाखल झाल्यानंतर 'एसआयटी'मार्फत सखोल चौकशी सुरू आहे. या तपासादरम्यान बीडमधील एका व्यक्तीने थेट 'एसआयटी'कडे धाव घेत ही लेखी तक्रार नोंदवली. या तक्रारीतील आरोपांमध्ये नेमकी तथ्य किती आणि राजकीय खोडसाळपणा किती, याची पडताळणी करण्याचे मोठे आव्हान आता तपास यंत्रणेसमोर उभे ठाकले आहे. या प्रकरणाला आता राजकीय पदर प्राप्त झाल्याने पोलीस वर्तुळातही चर्चांना उधाण आले आहे.



पीडितांच्या तक्रारींचा ओघ वाढला


अशोक खरात याने स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचे भासवून अनेकांची आर्थिक फसवणूक केल्याचे आणि धार्मिक विधीच्या नावाखाली महिलांचे शोषण केल्याचे आरोप आहेत. 'एसआयटी'ने सुरू केलेल्या हेल्पलाईनवर दररोज तक्रारींचा ओघ वाढत असून, त्यात आर्थिक फसवणुकीसह कौटुंबिक वादांचेही अनेक धागेदोरे समोर येत आहेत. खरातवर आतापर्यंत १५ गुन्हे दाखल झाले असून, सध्या तिसऱ्या गुन्ह्याच्या चौकशीवर विशेष भर दिला जात आहे. एका फसवणुकीच्या गुन्ह्याची कबुली त्याने दिल्याचेही समजते.



'माझं मरण इथेच...'; खरात मानसिकदृष्ट्या खचला


सततची चौकशी आणि गुन्ह्यांचा वाढता आकडा यामुळे अशोक खरात मानसिकदृष्ट्या खचल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. "मी इथून बाहेर पडेन असे वाटत नाही, माझं मरण इथेच आहे," असे उद्गार त्याने चौकशीदरम्यान काढल्याचे समजते. खरातने विणलेले जाळे नेमके किती खोलवर आहे, हे शोधण्यासाठी 'एसआयटी' आता तांत्रिक पुराव्यांची मदत घेत आहे.

Comments
Add Comment

Rahul Narvekar : शिक्षक केवळ वाचायला शिकवत नाही, तर समाज घडवतो आणि वाचवतो" - राहुल नार्वेकर यांचे गौरवोद्गार

मुंबई : "शिक्षक हा केवळ अक्षरांची ओळख करून देणारा घटक नाही, तर तो खऱ्या अर्थाने समाज घडवणारा आणि संकटाच्या काळात

Mohan Bhagwat : अस्थिर जगाचा आधार केवळ भारतच; पण त्यासाठी शेवटच्या घटकाचा विकास हवा" – डॉ. मोहन भागवत

आदिवासी अस्मिता हीच देशाची ओळख"; कर्मयोगी एकल शिक्षक मेळाव्यात डॉ. मोहन भागवत यांचे प्रेरक उद्गार सत्ता नव्हे, तर

First Tribal University : विदर्भात साकारणार देशातील पहिले आदिवासी विद्यापीठ

५०० कोटींच्या प्रकल्पातून शैक्षणिक क्रांतीचे नवे पर्व मुंबई : गेल्या तीन दशकांपासून आदिवासी आणि दुर्गम भागात

BMC News : मुंबईच्या महापौर रस्ते आणि नालेसफाईच्या पाहणी मोहिमेवर

रस्ते कामांचा वेग वाढवताना बांधकामात आणि दर्जा राखण्यात हयगय नको; प्रशासनाला दिले निर्देश मुंबई : रस्त्यांची

HSC Result : बारावीचा निकाल जाहीर झाला पण टक्क्यांना लागलेली गळती कायम राहिली

मुंबई : महाराष्ट्र उच्च माध्यमिक आणि महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने बारावीची

Mumbai Crime : आधी विटेने वार, मग गळा आवळला...वांद्र्यातील ७८ वर्षीय वृद्धेची निर्घृण हत्या

मुंबई : मुंबईतील वांद्रे (पूर्व) भागात उघडकीस आलेल्या एका खळबळजनक हत्याकांडाचा छडा लावण्यात खेरवाडी पोलिसांना