Ashok Kharat Case, Rupali Chakankar : रुपाली चाकणकरांकडून सुनेत्रा पवारांच्या जीवाला धोका?

 भोंदू अशोक खरात प्रकरणात नवी तक्रार; बीडमधील व्यक्तीचा 'एसआयटी'कडे खळबळजनक दावा


मुंबई : नाशिकमधील भोंदू अशोक खरात प्रकरणाने आता अनपेक्षित आणि धक्कादायक वळण घेतले आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाकडे (एसआयटी) बीड जिल्ह्यातील एका व्यक्तीने एक गंभीर तक्रार दाखल केली असून, त्यात राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या जीवाला धोका असल्याचा खळबळजनक दावा करण्यात आला आहे.


अशोक खरात याच्याविरोधात लैंगिक शोषण आणि आर्थिक फसवणूक प्रकरणी गुन्हे दाखल झाल्यानंतर 'एसआयटी'मार्फत सखोल चौकशी सुरू आहे. या तपासादरम्यान बीडमधील एका व्यक्तीने थेट 'एसआयटी'कडे धाव घेत ही लेखी तक्रार नोंदवली. या तक्रारीतील आरोपांमध्ये नेमकी तथ्य किती आणि राजकीय खोडसाळपणा किती, याची पडताळणी करण्याचे मोठे आव्हान आता तपास यंत्रणेसमोर उभे ठाकले आहे. या प्रकरणाला आता राजकीय पदर प्राप्त झाल्याने पोलीस वर्तुळातही चर्चांना उधाण आले आहे.



पीडितांच्या तक्रारींचा ओघ वाढला


अशोक खरात याने स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचे भासवून अनेकांची आर्थिक फसवणूक केल्याचे आणि धार्मिक विधीच्या नावाखाली महिलांचे शोषण केल्याचे आरोप आहेत. 'एसआयटी'ने सुरू केलेल्या हेल्पलाईनवर दररोज तक्रारींचा ओघ वाढत असून, त्यात आर्थिक फसवणुकीसह कौटुंबिक वादांचेही अनेक धागेदोरे समोर येत आहेत. खरातवर आतापर्यंत १५ गुन्हे दाखल झाले असून, सध्या तिसऱ्या गुन्ह्याच्या चौकशीवर विशेष भर दिला जात आहे. एका फसवणुकीच्या गुन्ह्याची कबुली त्याने दिल्याचेही समजते.



'माझं मरण इथेच...'; खरात मानसिकदृष्ट्या खचला


सततची चौकशी आणि गुन्ह्यांचा वाढता आकडा यामुळे अशोक खरात मानसिकदृष्ट्या खचल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. "मी इथून बाहेर पडेन असे वाटत नाही, माझं मरण इथेच आहे," असे उद्गार त्याने चौकशीदरम्यान काढल्याचे समजते. खरातने विणलेले जाळे नेमके किती खोलवर आहे, हे शोधण्यासाठी 'एसआयटी' आता तांत्रिक पुराव्यांची मदत घेत आहे.

Comments
Add Comment

Mumbai Water Storage : मुंबईवर पाणीटंचाईचं सावट गडद: तलावांत १८.८६ टक्के साठा

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमध्ये सध्या केवळ १८.८६% पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे पाणीटंचाईची

BMC अभियंत्यांसाठी पाच दिवसांचा आठवडा ?

मुंबई : महानगरपालिकेच्या मध्यवर्ती अभियांत्रिकी विभागामध्ये पाच दिवसांचा कामकाजाचा आठवडा लागू असला तरीही

MSRTC : ST BUS साठी उड्डाणपुलांखाली चार्जिंग स्टेशन उभारणार

मुंबई : राज्यमार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) इलेक्ट्रिक बस अर्थात ‘लालपरी’साठी पुलांखालच्या मोकळ्या जागांचा

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर गोमातेच्या अवैध वाहतुकीविरोधात राज्य सरकारचा बुलडोझर; कठोर कारवाईचे आदेश— परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा

मुंबई : आगामी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर राज्यात गोमातेची अवैध वाहतूक, बेकायदेशीर कत्तलखाने आणि जनावरांवर

IPL प्रसारणामधील “सलाम मुंबई” ऐवजी “नमस्कार मुंबई” प्रदर्शित करण्याची भाजयुमो, मुंबई अध्यक्ष दिपक सिंह यांची मागणी

IPL  2026 : भारतीय जनता युवा मोर्चा, मुंबईचे अध्यक्ष श्री दिपक सिंह यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष श्री

लॉजिस्टिक्स आणि कनेक्टिव्हिटीचे नवे पॉवरहाऊस - नागपूर!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते 'गोदाम लॉजिस्टिक्स पार्क'चा भव्य