भोंदू अशोक खरात प्रकरणात नवी तक्रार; बीडमधील व्यक्तीचा 'एसआयटी'कडे खळबळजनक दावा
मुंबई : नाशिकमधील भोंदू अशोक खरात प्रकरणाने आता अनपेक्षित आणि धक्कादायक वळण घेतले आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाकडे (एसआयटी) बीड जिल्ह्यातील एका व्यक्तीने एक गंभीर तक्रार दाखल केली असून, त्यात राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या जीवाला धोका असल्याचा खळबळजनक दावा करण्यात आला आहे.
नाशिक : नाशिकमध्ये चर्चेत असलेल्या स्वयंघोषित कॅप्टन भोंदू अशोक खरात प्रकरणात नवे धक्कादायक प्रकरणे समोर येत आहेत. तपास यंत्रणांनी तब्बल १६० जीबी ...
पीडितांच्या तक्रारींचा ओघ वाढला
अशोक खरात याने स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचे भासवून अनेकांची आर्थिक फसवणूक केल्याचे आणि धार्मिक विधीच्या नावाखाली महिलांचे शोषण केल्याचे आरोप आहेत. 'एसआयटी'ने सुरू केलेल्या हेल्पलाईनवर दररोज तक्रारींचा ओघ वाढत असून, त्यात आर्थिक फसवणुकीसह कौटुंबिक वादांचेही अनेक धागेदोरे समोर येत आहेत. खरातवर आतापर्यंत १५ गुन्हे दाखल झाले असून, सध्या तिसऱ्या गुन्ह्याच्या चौकशीवर विशेष भर दिला जात आहे. एका फसवणुकीच्या गुन्ह्याची कबुली त्याने दिल्याचेही समजते.
- कोट्यवधींच्या व्यवहारांचा तपास तीव्र भोंदू अशोक खरात (Ashok Kharat) प्रकरणात मोठी घडामोड समोर आली असून रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांच्या कुटुंबाच्या अडचणीत ...
'माझं मरण इथेच...'; खरात मानसिकदृष्ट्या खचला
सततची चौकशी आणि गुन्ह्यांचा वाढता आकडा यामुळे अशोक खरात मानसिकदृष्ट्या खचल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. "मी इथून बाहेर पडेन असे वाटत नाही, माझं मरण इथेच आहे," असे उद्गार त्याने चौकशीदरम्यान काढल्याचे समजते. खरातने विणलेले जाळे नेमके किती खोलवर आहे, हे शोधण्यासाठी 'एसआयटी' आता तांत्रिक पुराव्यांची मदत घेत आहे.